शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 22:33 IST

सुप्रीम कोर्टामधील वाढत्या जामीन अर्जांवर न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी चिंता व्यक्त केली.

Justice Nagarathna on Supreme Court: सुप्रीम कोर्टात वाढत्या जामीन अर्जांबद्दल गंभीर चिंता व्यक्त करताना न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी सुप्रीम कोर्ट अक्षरशः जामीनासाठीचे न्यायालय झाल्याचे म्हटलं. गुन्हेगारी वाढत असल्याने न्यायालयीन परिणामांचे मूल्यांकन आवश्यक असल्याचे न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना म्हणाल्या. शुक्रवारी फक्त एकाच दिवसात २५ जामीन प्रकरणांची सुनावणी झाली आणि आज १९ प्रकरणे सुनावणी आणि निर्णयासाठी आल्याचे न्यायमूर्ती नागरत्ना यांनी सांगितले. 

जामीन अर्जांच्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या की, जर कनिष्ठ न्यायालयांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन केले तर खटल्यांची संख्या कमी होऊ शकते. न्यायमूर्ती नागरत्ना यांनी यापूर्वीही अशा प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली होती. सुप्रीम कोर्टाला आता फॅमिली कोर्टा, ट्रायल कोर्ट, बेल कोर्ट आणि अगदी हायकोर्टाची भूमिका बजावावी लागत असल्याचे  न्यायमूर्ती नागरत्ना त्यावेळी म्हणाल्या होत्या.

विविध प्रकरणांच्या दिवशी, न्यायमूर्ती नागरत्ना यांचे खंडपीठ वकिलांनाही थोडी विश्रांती मिळावी म्हणून जेवणाची सुट्टी घेते, या ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांच्या निरीक्षणाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले. ज्या प्रकरणांमध्ये उच्च न्यायालये आणि कनिष्ठ न्यायालये जामीन देण्यास नकार देतात, अशा प्रकरणांमध्येही सुप्रीम कोर्ट जामीन देते.इतर न्यायालयांनाही जामीन देण्यास प्रोत्साहित केले पाहिजे, कारण न्यायाधीशांना जामीन देण्याबाबत खूप शंका असते, असं शंकरनारायणन म्हणाले.

न्यायमूर्ती नागरत्ना काय म्हणाल्या?

"किरकोळ मुद्द्यांवर अपील दाखल करण्याची प्रवृत्ती सुप्रीम कोर्टाचे संवैधानिक बाबींवरील मूळ लक्ष कमकुवत करत आहे. आजच्या सुनावणीसाठी १९ जामीन प्रकरणे सूचीबद्ध करण्यात आली होती. उच्च न्यायालयांना अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार दिले पाहिजेत आणि जामीनासारख्या बाबींमुळे कनिष्ठ न्यायालयांना भीती वाटू नये याची खात्री करायला हवी," असं न्यायमूर्ती नागरत्ना यांनी म्हटलं.

"गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे आणि समाजातील बदलत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन परिणामांचे मूल्यांकन आवश्यक आहे. जर कनिष्ठ न्यायालये आणि उच्च न्यायालये सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे अधिक पालन करत असत किंवा अधिक खंडपीठे असती तर सर्वोच्च न्यायालयात जामीन प्रकरणांची संख्या कमी होऊ शकते," असेही न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय