शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 22:33 IST

सुप्रीम कोर्टामधील वाढत्या जामीन अर्जांवर न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी चिंता व्यक्त केली.

Justice Nagarathna on Supreme Court: सुप्रीम कोर्टात वाढत्या जामीन अर्जांबद्दल गंभीर चिंता व्यक्त करताना न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी सुप्रीम कोर्ट अक्षरशः जामीनासाठीचे न्यायालय झाल्याचे म्हटलं. गुन्हेगारी वाढत असल्याने न्यायालयीन परिणामांचे मूल्यांकन आवश्यक असल्याचे न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना म्हणाल्या. शुक्रवारी फक्त एकाच दिवसात २५ जामीन प्रकरणांची सुनावणी झाली आणि आज १९ प्रकरणे सुनावणी आणि निर्णयासाठी आल्याचे न्यायमूर्ती नागरत्ना यांनी सांगितले. 

जामीन अर्जांच्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या की, जर कनिष्ठ न्यायालयांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे काटेकोरपणे पालन केले तर खटल्यांची संख्या कमी होऊ शकते. न्यायमूर्ती नागरत्ना यांनी यापूर्वीही अशा प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली होती. सुप्रीम कोर्टाला आता फॅमिली कोर्टा, ट्रायल कोर्ट, बेल कोर्ट आणि अगदी हायकोर्टाची भूमिका बजावावी लागत असल्याचे  न्यायमूर्ती नागरत्ना त्यावेळी म्हणाल्या होत्या.

विविध प्रकरणांच्या दिवशी, न्यायमूर्ती नागरत्ना यांचे खंडपीठ वकिलांनाही थोडी विश्रांती मिळावी म्हणून जेवणाची सुट्टी घेते, या ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांच्या निरीक्षणाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले. ज्या प्रकरणांमध्ये उच्च न्यायालये आणि कनिष्ठ न्यायालये जामीन देण्यास नकार देतात, अशा प्रकरणांमध्येही सुप्रीम कोर्ट जामीन देते.इतर न्यायालयांनाही जामीन देण्यास प्रोत्साहित केले पाहिजे, कारण न्यायाधीशांना जामीन देण्याबाबत खूप शंका असते, असं शंकरनारायणन म्हणाले.

न्यायमूर्ती नागरत्ना काय म्हणाल्या?

"किरकोळ मुद्द्यांवर अपील दाखल करण्याची प्रवृत्ती सुप्रीम कोर्टाचे संवैधानिक बाबींवरील मूळ लक्ष कमकुवत करत आहे. आजच्या सुनावणीसाठी १९ जामीन प्रकरणे सूचीबद्ध करण्यात आली होती. उच्च न्यायालयांना अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार दिले पाहिजेत आणि जामीनासारख्या बाबींमुळे कनिष्ठ न्यायालयांना भीती वाटू नये याची खात्री करायला हवी," असं न्यायमूर्ती नागरत्ना यांनी म्हटलं.

"गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे आणि समाजातील बदलत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन परिणामांचे मूल्यांकन आवश्यक आहे. जर कनिष्ठ न्यायालये आणि उच्च न्यायालये सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचे अधिक पालन करत असत किंवा अधिक खंडपीठे असती तर सर्वोच्च न्यायालयात जामीन प्रकरणांची संख्या कमी होऊ शकते," असेही न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय