शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
2
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; वयाच्या 43व्या घेतला अखेरचा श्वास
3
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
4
महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?
5
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
6
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
7
बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड!
8
‘गझनीपासून औरंगजेबापर्यंत इतिहासात गडप झाले, पण सोमनाथ…’, मोदींचं मोठं विधान
9
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
10
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
11
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
12
Exclusive: महेश मांजरेकरांकडून अमित ठाकरेंना होती 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची ऑफर, स्वत:च केला खुलासा
13
इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; आंदोलकांना थेट मृत्युदंडाचा इशारा
14
महिलांना आत्मनिर्भर करणारी योजना! ४,४५० रुपयांच्या योजनेवर मिळवा १६ लाखांचा निधी
15
IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
16
“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
17
चक्क साडी नेसून मैदानात उतरल्या महिला; फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ!
18
SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
19
पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
20
IND vs NZ 1st ODI : नव्या वर्षात टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत! डावखुऱ्या हाताने नाणे उंचावत गिल ठरला 'उजवा' अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जन्मठेप माफ करण्यास राज्यांना सुप्रीम कोर्टाची मनाई

By admin | Updated: July 10, 2014 02:52 IST

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची राहिलेली शिक्षा माफ करून त्यांना सोडून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना मनाई केली

नवी दिल्ली : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची राहिलेली शिक्षा माफ करून त्यांना सोडून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना मनाई  केली असून, सीबीआयसारख्या केंद्रीय तपासी यंत्रणोने अभियोग चालविलेल्या खटल्यांमधील जन्मठेपेच्या कैद्यांना अशी शिक्षामाफी देण्यापूर्वी केंद्र सरकारची संमती घेणो गरजचेचे आहे की नाही, यावर राज्यांना उत्तर देण्यास सांगितले आहे.
सरन्यायाधीश न्या. आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने या संदर्भात सर्व राज्यांना बुधवारी नोटिसा जारी केल्या व पुढील सुनावणी 22 जुलैला होण्यापूर्वी 18 जुलैर्पयत उत्तराची प्रतिज्ञापत्रे सादर करण्याचे निर्देश दिले. सीबीआयने तपास केलेल्या व अभियोग केलेल्या खटल्यांमधील आरोपींच्या बाबतीत राज्य सरकार शिक्षामाफीचा अधिकार केंद्राच्या संमतीविना, स्वतंत्रपणो वापरू शकतात का, या मुद्दय़ावर राज्यांनी आपली भूमिका नि:संदिग्धपणो मांडावी, असे घटनापीठाने स्पष्ट केले.
राजीव गांधी हत्या खटल्यात जन्मठेप भोगत असलेल्या सर्व सातही आरोपींच्या राहिलेल्या शिक्षा माफ करून त्यांना सोडून देण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेच्या निमित्ताने राज्यांच्या शिक्षामाफीच्या अधिकारांचा विषय घटनापीठाकडे सोपविण्यात आला आहे. या घटनापीठावर सरन्यायाधीश न्या. लोढा यांच्याखेरीज न्या. जे. एस. केहार, न्या. जे. चेलमेश्वर, न्या. ए. के. सिक्री आणि न्या. रोहिंग्टन नरिमन यांचाही समावेश आहे.
राजीव गांधींच्या खुन्यांपैकी मुरुगन, संथान आणि अरिवु या तिघांची फाशी रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने 18 पेब्रुवारी रोजी ती जन्मठेपेत परिवर्तित केल्यानंतर 2क् फेब्रुवारीला तामिळनाडू सरकारने त्यांच्यासह जन्मठेप भोगत असलेल्या राजीव गांधीच्या सातही खुन्यांची राहिलेली शिक्षा माफ करून त्यांना सोडून देण्याचा निर्णय घेतला होता.
नंतर लाल किल्ला हल्ला खटल्यातील आरोपींच्या निमित्तानेही हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांनी असा मुद्दा मांडला की, सीबीआयसारख्या केंद्रीय तपासी यंत्रणोने चालविलेल्या खटल्यातील आरोपींना परस्पर शिक्षामाफी देण्याचा अधिकार राज्यांना नाही. याचा अंतिम निर्णय केंद्राच्या संमतीनेच होऊ शकतो. शिवाय असा निर्णय घेताना गुन्ह्याने बाधीत झालेल्यांचाही विचार केला जाणो गरजेचे आहे. त्यानंतर न्यायालयाने हा विषय 29 एप्रिल रोजी घटनापीठाकडे वर्ग केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क) 
 
घटनापीठापुढील मुद्दे
च्राज्यघटनेच्या अनुच्छेद 72 अन्वये राष्ट्रपतींनी किंवा अनुच्छेद 161 अन्वये राज्यपालांनी कोणाही आरोपीची फाशी रद्द करून त्यास जन्मठेप दिल्यानंतर, सरकार पुन्हा त्याच कैद्याच्या बाबतीत दंड प्रक्रिया संहितेतील अधिकार वापरून त्याची राहिलेली जन्मठेपेची शिक्षाही माफ करू शकते का?
च्न्यायालयाने ज्याची फाशीची शिक्षा रद्द करून त्यास जन्मठेप दिली आहे अशा कैद्याची शिक्षा सरकार माफ करू शकते का?
च्सीबीआय अथवा अन्य केंद्रीय तपासी यंत्रणोने चालविलेल्या खटल्यात झालेली जन्मठेपेची शिक्षा, केंद्र सरकारची संमती न घेता राज्य सरकार परस्पर आपला अधिकार वापरून माफ करू शकते का?