शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

जन्मठेप माफ करण्यास राज्यांना सुप्रीम कोर्टाची मनाई

By admin | Updated: July 10, 2014 02:52 IST

जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची राहिलेली शिक्षा माफ करून त्यांना सोडून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना मनाई केली

नवी दिल्ली : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची राहिलेली शिक्षा माफ करून त्यांना सोडून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना मनाई  केली असून, सीबीआयसारख्या केंद्रीय तपासी यंत्रणोने अभियोग चालविलेल्या खटल्यांमधील जन्मठेपेच्या कैद्यांना अशी शिक्षामाफी देण्यापूर्वी केंद्र सरकारची संमती घेणो गरजचेचे आहे की नाही, यावर राज्यांना उत्तर देण्यास सांगितले आहे.
सरन्यायाधीश न्या. आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने या संदर्भात सर्व राज्यांना बुधवारी नोटिसा जारी केल्या व पुढील सुनावणी 22 जुलैला होण्यापूर्वी 18 जुलैर्पयत उत्तराची प्रतिज्ञापत्रे सादर करण्याचे निर्देश दिले. सीबीआयने तपास केलेल्या व अभियोग केलेल्या खटल्यांमधील आरोपींच्या बाबतीत राज्य सरकार शिक्षामाफीचा अधिकार केंद्राच्या संमतीविना, स्वतंत्रपणो वापरू शकतात का, या मुद्दय़ावर राज्यांनी आपली भूमिका नि:संदिग्धपणो मांडावी, असे घटनापीठाने स्पष्ट केले.
राजीव गांधी हत्या खटल्यात जन्मठेप भोगत असलेल्या सर्व सातही आरोपींच्या राहिलेल्या शिक्षा माफ करून त्यांना सोडून देण्याच्या तामिळनाडू सरकारच्या निर्णयाच्या विरोधात केंद्र सरकारने दाखल केलेल्या याचिकेच्या निमित्ताने राज्यांच्या शिक्षामाफीच्या अधिकारांचा विषय घटनापीठाकडे सोपविण्यात आला आहे. या घटनापीठावर सरन्यायाधीश न्या. लोढा यांच्याखेरीज न्या. जे. एस. केहार, न्या. जे. चेलमेश्वर, न्या. ए. के. सिक्री आणि न्या. रोहिंग्टन नरिमन यांचाही समावेश आहे.
राजीव गांधींच्या खुन्यांपैकी मुरुगन, संथान आणि अरिवु या तिघांची फाशी रद्द करून सर्वोच्च न्यायालयाने 18 पेब्रुवारी रोजी ती जन्मठेपेत परिवर्तित केल्यानंतर 2क् फेब्रुवारीला तामिळनाडू सरकारने त्यांच्यासह जन्मठेप भोगत असलेल्या राजीव गांधीच्या सातही खुन्यांची राहिलेली शिक्षा माफ करून त्यांना सोडून देण्याचा निर्णय घेतला होता.
नंतर लाल किल्ला हल्ला खटल्यातील आरोपींच्या निमित्तानेही हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांनी असा मुद्दा मांडला की, सीबीआयसारख्या केंद्रीय तपासी यंत्रणोने चालविलेल्या खटल्यातील आरोपींना परस्पर शिक्षामाफी देण्याचा अधिकार राज्यांना नाही. याचा अंतिम निर्णय केंद्राच्या संमतीनेच होऊ शकतो. शिवाय असा निर्णय घेताना गुन्ह्याने बाधीत झालेल्यांचाही विचार केला जाणो गरजेचे आहे. त्यानंतर न्यायालयाने हा विषय 29 एप्रिल रोजी घटनापीठाकडे वर्ग केला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क) 
 
घटनापीठापुढील मुद्दे
च्राज्यघटनेच्या अनुच्छेद 72 अन्वये राष्ट्रपतींनी किंवा अनुच्छेद 161 अन्वये राज्यपालांनी कोणाही आरोपीची फाशी रद्द करून त्यास जन्मठेप दिल्यानंतर, सरकार पुन्हा त्याच कैद्याच्या बाबतीत दंड प्रक्रिया संहितेतील अधिकार वापरून त्याची राहिलेली जन्मठेपेची शिक्षाही माफ करू शकते का?
च्न्यायालयाने ज्याची फाशीची शिक्षा रद्द करून त्यास जन्मठेप दिली आहे अशा कैद्याची शिक्षा सरकार माफ करू शकते का?
च्सीबीआय अथवा अन्य केंद्रीय तपासी यंत्रणोने चालविलेल्या खटल्यात झालेली जन्मठेपेची शिक्षा, केंद्र सरकारची संमती न घेता राज्य सरकार परस्पर आपला अधिकार वापरून माफ करू शकते का?