शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

ब्रेकअपनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल व्हायला नको; सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:03 IST

कोर्टात एका व्यक्तीने त्याच्यावरील बलात्काराचे गुन्हे रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने हे मत व्यक्त केले.

नवी दिल्ली - अलीकडच्या काळात लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केलेल्या वाढत्या प्रकरणांवर सुप्रीम कोर्टानं चिंता व्यक्त केली आहे. जे नाते लग्नापर्यंत पोहचत नाही, त्यात अशाप्रकारे गुन्हे दाखल केले जात आहेत. हे चुकीचे आहे. नातेसंबंधात राहणे हे गुन्ह्यासारखे झाले आहे. एखाद्याशी ब्रेकअप झालं त्याचा अर्थ बलात्कार झाला असं होत नाही. प्रेम संबंध बिघडणे, वेगळे राहणे त्यानंतर बलात्काराचा गुन्हा करायला नको असं सुप्रीम कोर्टाच्या न्या.एमएम सुंदरेश आणि न्या. राजेश बिंदल यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे.

कोर्टात एका व्यक्तीने त्याच्यावरील बलात्काराचे गुन्हे रद्द करण्याची मागणी केली होती. त्याच्या जोडीदार महिलेने आरोप केला होता की, लग्नाचे आमिष दाखवून त्याने मला शारीरिक संबंध ठेवण्यास मजबूर केले. वरिष्ठ वकील माधवी दीवान यांनी पीडितेची बाजू कोर्टात मांडली. त्यावर कोर्टाने म्हटलं की, पीडितेने इतकी सीनिअर वकील नियुक्त केली आहे त्यामुळे ती निष्पाप आहे असं मानलं नाही जाऊ शकत. तुम्ही वयस्क आहात. त्यामुळे तुम्हाला फसवून लग्नाचं वचन देऊन विश्वास संपादन केला गेला असं सांगू शकत नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच रोमान्स संपला अथवा ब्रेकअप झाला याचा अर्थ बलात्काराचा गुन्हा झाला असं नाही. समाज ज्यारितीने बदलत चालला आहे त्यातून आपल्याला समजायला हवं रिलेशनशिप तुटणे म्हणजे रेपचा गुन्हा बनायला नको. आज नैतिकता आणि मूल्ये बदलली आहेत. विशेषत: युवा पिढी बदलत आहे. जर आम्ही हे मान्य केले तर कॉलेजमध्ये मुला-मुलींमधील नातेसंबंध दंडनीय होतील. समजा, कॉलेजमधील २ विद्यार्थ्यांचे प्रेम असेल. मुलाने मुलीला मी तुझ्याशी लग्न करतो असं म्हटलं, त्यानंतर त्याने केले नाही तर तेदेखील गुन्हा मानला जाईल का असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले.

दरम्यान, हे प्रकरण अँरेंज मॅरेजचं आहे. युवतीला वाटले जर तिने साथीदाराला खुश केले नाही तर तो तिच्याशी लग्न करणार नाही. या दोघांचा साखरपुडा झाला होता. युवकासाठी हे कॅज्युअल सेक्स असेल परंतु मुलीसाठी ते तसं नव्हते असं पीडितेच्या वकिलाने कोर्टात युक्तिवाद केला. त्यावर सुप्रीम कोर्ट सहमत झाले नाही. केवळ लग्न न होणे म्हणजे बलात्कार मानला जाईल का असा सवाल कोर्टाने विचारला. आम्ही एकाच दृष्टीकोनातून हे पाहू शकत नाही. आमचीही मुलगी आहे. जर तीदेखील या परिस्थितीत असती तरीही व्यापकदृष्टीने आम्ही याकडे पाहिले असते. तक्रारदार महिलेला हे नाते संपू शकते हे माहिती असतानाही तिने संबंध ठेवले असं कोर्टाने म्हटलं. त्यानंतर या प्रकरणावर पुढील तारीख दिली. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय