शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ब्रेकअपनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल व्हायला नको; सुप्रीम कोर्टानं व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:03 IST

कोर्टात एका व्यक्तीने त्याच्यावरील बलात्काराचे गुन्हे रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने हे मत व्यक्त केले.

नवी दिल्ली - अलीकडच्या काळात लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केलेल्या वाढत्या प्रकरणांवर सुप्रीम कोर्टानं चिंता व्यक्त केली आहे. जे नाते लग्नापर्यंत पोहचत नाही, त्यात अशाप्रकारे गुन्हे दाखल केले जात आहेत. हे चुकीचे आहे. नातेसंबंधात राहणे हे गुन्ह्यासारखे झाले आहे. एखाद्याशी ब्रेकअप झालं त्याचा अर्थ बलात्कार झाला असं होत नाही. प्रेम संबंध बिघडणे, वेगळे राहणे त्यानंतर बलात्काराचा गुन्हा करायला नको असं सुप्रीम कोर्टाच्या न्या.एमएम सुंदरेश आणि न्या. राजेश बिंदल यांच्या खंडपीठाने म्हटलं आहे.

कोर्टात एका व्यक्तीने त्याच्यावरील बलात्काराचे गुन्हे रद्द करण्याची मागणी केली होती. त्याच्या जोडीदार महिलेने आरोप केला होता की, लग्नाचे आमिष दाखवून त्याने मला शारीरिक संबंध ठेवण्यास मजबूर केले. वरिष्ठ वकील माधवी दीवान यांनी पीडितेची बाजू कोर्टात मांडली. त्यावर कोर्टाने म्हटलं की, पीडितेने इतकी सीनिअर वकील नियुक्त केली आहे त्यामुळे ती निष्पाप आहे असं मानलं नाही जाऊ शकत. तुम्ही वयस्क आहात. त्यामुळे तुम्हाला फसवून लग्नाचं वचन देऊन विश्वास संपादन केला गेला असं सांगू शकत नाही असं त्यांनी म्हटलं.

तसेच रोमान्स संपला अथवा ब्रेकअप झाला याचा अर्थ बलात्काराचा गुन्हा झाला असं नाही. समाज ज्यारितीने बदलत चालला आहे त्यातून आपल्याला समजायला हवं रिलेशनशिप तुटणे म्हणजे रेपचा गुन्हा बनायला नको. आज नैतिकता आणि मूल्ये बदलली आहेत. विशेषत: युवा पिढी बदलत आहे. जर आम्ही हे मान्य केले तर कॉलेजमध्ये मुला-मुलींमधील नातेसंबंध दंडनीय होतील. समजा, कॉलेजमधील २ विद्यार्थ्यांचे प्रेम असेल. मुलाने मुलीला मी तुझ्याशी लग्न करतो असं म्हटलं, त्यानंतर त्याने केले नाही तर तेदेखील गुन्हा मानला जाईल का असं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले.

दरम्यान, हे प्रकरण अँरेंज मॅरेजचं आहे. युवतीला वाटले जर तिने साथीदाराला खुश केले नाही तर तो तिच्याशी लग्न करणार नाही. या दोघांचा साखरपुडा झाला होता. युवकासाठी हे कॅज्युअल सेक्स असेल परंतु मुलीसाठी ते तसं नव्हते असं पीडितेच्या वकिलाने कोर्टात युक्तिवाद केला. त्यावर सुप्रीम कोर्ट सहमत झाले नाही. केवळ लग्न न होणे म्हणजे बलात्कार मानला जाईल का असा सवाल कोर्टाने विचारला. आम्ही एकाच दृष्टीकोनातून हे पाहू शकत नाही. आमचीही मुलगी आहे. जर तीदेखील या परिस्थितीत असती तरीही व्यापकदृष्टीने आम्ही याकडे पाहिले असते. तक्रारदार महिलेला हे नाते संपू शकते हे माहिती असतानाही तिने संबंध ठेवले असं कोर्टाने म्हटलं. त्यानंतर या प्रकरणावर पुढील तारीख दिली. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय