शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
7
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
9
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
10
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
11
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
12
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
13
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
14
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
15
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
16
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
17
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
18
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
19
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान
20
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

Farmers Protest: सुप्रीम कोर्टाच्या समितीची शेतकरी संघटनांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 3:38 AM

आठ राज्यांमधील शेतकरी सहभागी

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीने शुक्रवारी आठ राज्यांतील १२ शेतकरी संघटनांच्या सदस्यांशी केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांबाबत चर्चा केली. कोर्टाने नियुक्त केलेल्या या समितीत तीन सदस्य आहेत. हे सदस्य शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष भेटून चर्चा करीत आहेत. समितीने शेतकऱ्यांसोबत आजवर सात बैठका घेतल्या आहेत.समितीने माहिती दिली की, आंध्र प्रदेश, बिहार, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या आठ राज्यातील १२ शेतकरी संघटनांच्या सदस्यांशी शुक्रवारी समितीने चर्चा केली. यावेळी संघटनांच्या सदस्यांनी तीन कृषी कायद्यांबाबत त्यांचे म्हणणे सविस्तरपणे मांडले. समिती शेतकरी, त्यांच्या संघटना आणि शेतमाल उत्पादकांच्या संघटनांशीही चर्चा करीत आहे.१२ जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना स्थगिती देत समिती नियुक्त केली होती. या समितीला कायद्यांबाबत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून दोन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार समिती शेतकरी संघटना तसेच प्रतिनिधींची चर्चा करीत आहे. कायदे भांडवलधार्जिणेदोन महिन्यांहून अधिक काळ पंजाब, हरयाणा तसेच उत्तर प्रदेशातील हजारो शेतकरी दिल्लीच्या विविध सीमांवर केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करीत आहेत. हे कायदे भांडवलदार धार्जिणे असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी ते मागे घेण्याची मागणी केली आहे. या कायद्यांमळे देशातील सध्याच्या बाजारसमित्या उद्ध्वस्त होतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.११ फेऱ्याही निष्फ‌ळया आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी सरकार आणि शेतकरी संघटनांचे ४१ प्रतिनिधी यांच्यात चर्चेच्या ११ फेऱ्या झाल्या परंतु यातून काहीही साध्य होऊ शकले नाही. सरकारने शेतकऱ्यांना या कायद्यांवर दीड वर्षांसाठी स्थगिती आणण्याचे आश्वासनही दिले होते परंतु यातून शेतकऱ्यांचे समाधान होऊ शकले नाही. हे कायदे मागे जावे आणि शेतमालाच्या हमी भावासाठी कायदा करण्यात यावा, या मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन