शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

Farmers Protest: सुप्रीम कोर्टाच्या समितीची शेतकरी संघटनांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 03:39 IST

आठ राज्यांमधील शेतकरी सहभागी

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेल्या समितीने शुक्रवारी आठ राज्यांतील १२ शेतकरी संघटनांच्या सदस्यांशी केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांबाबत चर्चा केली. कोर्टाने नियुक्त केलेल्या या समितीत तीन सदस्य आहेत. हे सदस्य शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष भेटून चर्चा करीत आहेत. समितीने शेतकऱ्यांसोबत आजवर सात बैठका घेतल्या आहेत.समितीने माहिती दिली की, आंध्र प्रदेश, बिहार, जम्मू आणि काश्मीर, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या आठ राज्यातील १२ शेतकरी संघटनांच्या सदस्यांशी शुक्रवारी समितीने चर्चा केली. यावेळी संघटनांच्या सदस्यांनी तीन कृषी कायद्यांबाबत त्यांचे म्हणणे सविस्तरपणे मांडले. समिती शेतकरी, त्यांच्या संघटना आणि शेतमाल उत्पादकांच्या संघटनांशीही चर्चा करीत आहे.१२ जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना स्थगिती देत समिती नियुक्त केली होती. या समितीला कायद्यांबाबत शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून दोन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार समिती शेतकरी संघटना तसेच प्रतिनिधींची चर्चा करीत आहे. कायदे भांडवलधार्जिणेदोन महिन्यांहून अधिक काळ पंजाब, हरयाणा तसेच उत्तर प्रदेशातील हजारो शेतकरी दिल्लीच्या विविध सीमांवर केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करीत आहेत. हे कायदे भांडवलदार धार्जिणे असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी ते मागे घेण्याची मागणी केली आहे. या कायद्यांमळे देशातील सध्याच्या बाजारसमित्या उद्ध्वस्त होतील, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.११ फेऱ्याही निष्फ‌ळया आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी सरकार आणि शेतकरी संघटनांचे ४१ प्रतिनिधी यांच्यात चर्चेच्या ११ फेऱ्या झाल्या परंतु यातून काहीही साध्य होऊ शकले नाही. सरकारने शेतकऱ्यांना या कायद्यांवर दीड वर्षांसाठी स्थगिती आणण्याचे आश्वासनही दिले होते परंतु यातून शेतकऱ्यांचे समाधान होऊ शकले नाही. हे कायदे मागे जावे आणि शेतमालाच्या हमी भावासाठी कायदा करण्यात यावा, या मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन