शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान; केंद्राला ६ आठवड्यांत बाजू मांडण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 06:23 IST

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यातील एका तरतुदीत न्यायालयाने केलेला बदल कायदादुरुस्तीने रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यातील एका तरतुदीत न्यायालयाने केलेला बदल कायदादुरुस्तीने रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यास स्थगिती देण्यास न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. मात्र, न्यायालयाने त्याबाबत केंद्र सरकारकडून सहा आठवड्यांत स्पष्टीकरण मागितले आहे.संसदेने कायद्यात १८-अ हे कलम घालून दुरुस्ती केली असली, तरी त्याचा पुनर्विचार करावा, अशा चार याचिका आज न्यायालयात आल्या. त्यापैकी एक अहमदनगरच्या संजीव भोर यांची असून, त्यांची बाजू मांडताना अ‍ॅड. दिलीप तौर यांनी १८-अ तरतुदीमुळे आरोपींना लगेच अटक होईल व त्यांना जामीनही मिळणार नाही, असे सांगून ती रद्द करावी आणि २0 मार्च २0१८ रोजीचा आदेश पुन्हा लागू करावा, अशी विनंती केली.मात्र, कायद्यामध्ये बदल करण्यास वा तरतुदीस स्थगिती देण्यास नकार देतानाच, न्यायालयाने केंदाला बाजू मांडण्यास सांगितले. मूळ कायद्यातही अटक झालेल्या व्यक्तीस जामीन मिळत नव्हता. त्या तरतुदींना महाराष्ट्रातील एका सरकारी अधिकाऱ्याने आव्हान दिले होते. त्यावर निकाल देताना न्यायालयाने लगेचच अटक करण्याची गरज नाही, वरिष्ठ अधिकाºयाने अशा प्रकरणाची चौकशी करावी आणि पुढील निर्णय घ्यावा, असे म्हटले होते.सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेबद्दल अनुसूचित जाती व जमातींच्या लोकांनी आपला संताप व्यक्त केला होता. त्यामुळे लगेच अटकेची तरतूद कायम ठेवण्यासाठी सरकारने संसदेत दुरुस्ती विधेयक मांडले, ते मान्यही झाले. आता त्यालाच पुन्हा आव्हान देण्यात आले आहे. कायद्यात करण्यात आलेली दुरुस्ती घटनाबाह्य असल्याचे लगेच जाहीर करावे, अशी याचिकाकर्त्यांची विनंती न्या. ए. के. सिकरी व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने अमान्य केली.कायदा दुरुस्तीमुळे भाजपा अडचणीतकायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीच्या विरोधात अनेक सवर्ण संघटनांनी गुरुवारी भारत बंदचे आवाहन केले होते. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार व छत्तीसगड या राज्यांत या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.मात्र, त्यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांत या वर्षीच विधानसभा निवडणुका होणार असून, सवर्णांची ही नाराजी भाजपाला परवडणारी नाही. त्यामुळे अनुसूचित जाती-जमाती कायद्याची अंमलबजावणी राज्यांनी विचारपूर्वक व संथ गतीने करावी, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना सुचविले आहे.सवर्णांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना २५% आरक्षण द्यासवर्णांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना २५ टक्के आरक्षण देण्यात यावे. त्यामुळे दलितांवरील अत्याचारांचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होईल, असे केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय