शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान; केंद्राला ६ आठवड्यांत बाजू मांडण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 06:23 IST

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यातील एका तरतुदीत न्यायालयाने केलेला बदल कायदादुरुस्तीने रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

नवी दिल्ली : अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यातील एका तरतुदीत न्यायालयाने केलेला बदल कायदादुरुस्तीने रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीला पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यास स्थगिती देण्यास न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. मात्र, न्यायालयाने त्याबाबत केंद्र सरकारकडून सहा आठवड्यांत स्पष्टीकरण मागितले आहे.संसदेने कायद्यात १८-अ हे कलम घालून दुरुस्ती केली असली, तरी त्याचा पुनर्विचार करावा, अशा चार याचिका आज न्यायालयात आल्या. त्यापैकी एक अहमदनगरच्या संजीव भोर यांची असून, त्यांची बाजू मांडताना अ‍ॅड. दिलीप तौर यांनी १८-अ तरतुदीमुळे आरोपींना लगेच अटक होईल व त्यांना जामीनही मिळणार नाही, असे सांगून ती रद्द करावी आणि २0 मार्च २0१८ रोजीचा आदेश पुन्हा लागू करावा, अशी विनंती केली.मात्र, कायद्यामध्ये बदल करण्यास वा तरतुदीस स्थगिती देण्यास नकार देतानाच, न्यायालयाने केंदाला बाजू मांडण्यास सांगितले. मूळ कायद्यातही अटक झालेल्या व्यक्तीस जामीन मिळत नव्हता. त्या तरतुदींना महाराष्ट्रातील एका सरकारी अधिकाऱ्याने आव्हान दिले होते. त्यावर निकाल देताना न्यायालयाने लगेचच अटक करण्याची गरज नाही, वरिष्ठ अधिकाºयाने अशा प्रकरणाची चौकशी करावी आणि पुढील निर्णय घ्यावा, असे म्हटले होते.सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेबद्दल अनुसूचित जाती व जमातींच्या लोकांनी आपला संताप व्यक्त केला होता. त्यामुळे लगेच अटकेची तरतूद कायम ठेवण्यासाठी सरकारने संसदेत दुरुस्ती विधेयक मांडले, ते मान्यही झाले. आता त्यालाच पुन्हा आव्हान देण्यात आले आहे. कायद्यात करण्यात आलेली दुरुस्ती घटनाबाह्य असल्याचे लगेच जाहीर करावे, अशी याचिकाकर्त्यांची विनंती न्या. ए. के. सिकरी व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाने अमान्य केली.कायदा दुरुस्तीमुळे भाजपा अडचणीतकायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीच्या विरोधात अनेक सवर्ण संघटनांनी गुरुवारी भारत बंदचे आवाहन केले होते. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार व छत्तीसगड या राज्यांत या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.मात्र, त्यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांत या वर्षीच विधानसभा निवडणुका होणार असून, सवर्णांची ही नाराजी भाजपाला परवडणारी नाही. त्यामुळे अनुसूचित जाती-जमाती कायद्याची अंमलबजावणी राज्यांनी विचारपूर्वक व संथ गतीने करावी, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना सुचविले आहे.सवर्णांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना २५% आरक्षण द्यासवर्णांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना २५ टक्के आरक्षण देण्यात यावे. त्यामुळे दलितांवरील अत्याचारांचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होईल, असे केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय