शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कुंभ मेळ्यावर कोट्यवधींचा खर्च, पण...; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 14:00 IST

ममता बॅनर्जी सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान म्हणाल्या, "केंद्र सरकार कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देते. दरवर्षी एक कोटीहून अधिक लोक गंगासागर यात्रेला येतात. या यात्रेला राष्ट्रीय यात्रा म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी मी वारंवार केली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जाते."

कुंभ मेळ्याची तयारी सुरू असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकार गंगासागर यात्रेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. केंद्र सरकार कुंभ मेळ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र, गंगासागर तीर्थाकडे दुर्लक्ष करत आहे, असे ममता बॅनर्जी यानी म्हटले आहे. गंगासागरला दरवर्षी एक कोटीहून अधिक यात्रेकरू भेट देतात, असा दावा करत ममता यांनी सोमवारी केंद्राकडे गंगासागर यात्रेला राष्ट्रीय यात्रा म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.

ममता बॅनर्जी सोमवारी एका कार्यक्रमादरम्यान म्हणाल्या, "केंद्र सरकार कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देते. दरवर्षी एक कोटीहून अधिक लोक गंगासागर यात्रेला येतात. या यात्रेला राष्ट्रीय यात्रा म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी मी वारंवार केली आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जाते." त्या पुढे म्हणाल्या, "कुंभमेळ्याला अनेक मार्गांनी लोक जाऊ शकतात, मात्र, गंगासागर येत्रेसाठी संबंधित बेटापर्यंत पोहोचणे अवघड काम आहे. यात्रेकरूंना समुद्र बेटावर सहज पोहोचता यावे यासाठी पूल बांधण्याचे आश्वासन पूर्ण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत आहे."

ममता बॅनर्जी म्हणाल्या, "हे ठिकाण पुलाने जोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मी एकदा केंद्र सरकारशी बोलले होते. संबंधित मंत्र्यांनी पूल बांधण्याचे आश्वासन दिले होते. मी तीन ते चार वर्षे वाट बघितली. मात्र, त्यांनी काहीच केले नाही. आता राज्य सरकार स्वखर्चाने हा पूल बांधणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या पुलाला पूर्ण होण्यासाठी सुमारे 1,500 कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे. गंगासागर जत्रेसाठी पायाभूत सुविधा सुधारण्यात आल्या असून एक हेलिपॅडही तयार करण्यात आले आहे," असेही ममता यावेळी म्हणाल्या.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालKumbh Melaकुंभ मेळा