शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : रिल लाईफमधील सुपरस्टार; राजकारणात 'फ्लॉप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 18:54 IST

अनेक कलाकार अखेरच्या क्षणापर्यंत राजकारणात सक्रिय राहिले, परंतु काही कलाकरांनी राजकारणाला अलविदा करून, आपल्या क्षेत्रात पुनरागमन केले आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सर्व राजकीय पक्षातील नाराज नेत्यांचे पक्षांतरही जोरदार सुरू असताना अनेक ठिकाणी सिने कलाकारांना अनेक पक्ष उमेदवारी देत आहेत. महाराष्ट्रात देखील उर्मिला मांतोडकर या अभिनेत्रीला उमेदवारी मिळणार असल्याचे वृत्त आहे. परंतु, निवडणुकीत निवडून येणारे कलाकार राजकारणात रमतात की, आपल्या क्षेत्रात परतात हे पाहणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. अनेक कलाकार अखेरच्या क्षणापर्यंत राजकारणात सक्रिय राहिले, परंतु काही कलाकरांनी राजकारणाला अलविदा करून, आपल्या क्षेत्रात पुनरागमन केले आहे. यामध्ये असलेले कालाकार :

अमिताभ बच्चन 

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी १९८४ मध्ये अलाहाबादमधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी हेमवती नंदन बहुगुना यांच्याविरुद्ध १ लाख ८७ हजार मतांनी विजय मिळवला होता. परंतु, त्यांनी अर्ध्यातच राजकारण सोडून पुन्हा चित्रपट सृष्टीचा मार्ग धरला होता.

सुनील दत्त 

सुनील दत्त यांनी काँग्रेसकडून १९८४ मध्ये उत्तर मध्य मुंबईतून राम जेठमलानी यांच्याविरुद्ध विजय मिळवला होता. सुनील दत्त अखेरपर्यंत राजकारणात सक्रिय राहिले. तसेच त्यांनी केंद्रीय मंत्रीपद देखील उपभोगले होते.

राजेश खन्ना

राजेश खन्ना यांच्यासारखा स्टारडम त्यावेळी हिंदी सिनेमात कोणत्याच स्टारला नव्हतं. काँग्रेसच्या तिकीटावर राजेश खन्ना १९९२ आणि १९९६ मध्ये लोकसभेवर निवडून आले होते. परंतु त्यांची राजकीय इनिंग अधिककाळ चालली नाही. त्यांनी लवकरच राजकारणाला अलविदा केले होते.

धर्मेंद्र

अभिनेते धर्मेंद्र यांनी एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवली होती. परंतु, राजकारणात त्यांची जादू चालली नाही. २००४ मध्ये बिकानेरमधून धर्मेंद्र निवडून आले होते. मात्र संसदेतील गैरहजरीमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर धर्मेंद्र यांनी राजकारण सोडले होते.

गोविंदा

गोविंदाने आपल्या चित्रपटातून चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. त्याने २००४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळवला होता. परंतु त्याची राजकीय कारकिर्द वादग्रस्त ठरली. अखेर गोविंदाने २००८ मध्ये राजकारण सोडून पुन्हा चित्रपटसृष्टीचा मार्ग धरला.

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तला २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी समाजवादी पक्षाकडून तिकीट मिळाले होते. परंतु, न्यायालयाने संजय दत्तवर निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती. त्यानंतर संजय दत्तने २०१० मध्ये समावादी पक्ष सोडला होता. अखेरीस राजकारणात त्याची कारकिर्द सुरू होण्यापूर्वीच संपली होती.

परेश रावल

अभिनेते परेश रावल यांनी २००९ मध्ये भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा विजय झाला होता. परंतु, परेश रावल यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. कार्यकर्ता म्हणून आपण भाजपचे काम करू, असंही त्यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले.

या व्यतिरिक्त राजकारणात अनेक अभिनेते-अभिनेत्री यशस्वी झाले आहेत. यामध्ये स्मृती इराणी, राज बब्बर, शत्रुघ्न सिन्हा, किरण खैर, हेमा मालिनी यांनी राजकारणात आपले एक स्थान निर्माण केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसAmitabh Bachchanअमिताभ बच्चन