शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

Lok Sabha Election 2019 : रिल लाईफमधील सुपरस्टार; राजकारणात 'फ्लॉप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 18:54 IST

अनेक कलाकार अखेरच्या क्षणापर्यंत राजकारणात सक्रिय राहिले, परंतु काही कलाकरांनी राजकारणाला अलविदा करून, आपल्या क्षेत्रात पुनरागमन केले आहे.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सर्व राजकीय पक्षातील नाराज नेत्यांचे पक्षांतरही जोरदार सुरू असताना अनेक ठिकाणी सिने कलाकारांना अनेक पक्ष उमेदवारी देत आहेत. महाराष्ट्रात देखील उर्मिला मांतोडकर या अभिनेत्रीला उमेदवारी मिळणार असल्याचे वृत्त आहे. परंतु, निवडणुकीत निवडून येणारे कलाकार राजकारणात रमतात की, आपल्या क्षेत्रात परतात हे पाहणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. अनेक कलाकार अखेरच्या क्षणापर्यंत राजकारणात सक्रिय राहिले, परंतु काही कलाकरांनी राजकारणाला अलविदा करून, आपल्या क्षेत्रात पुनरागमन केले आहे. यामध्ये असलेले कालाकार :

अमिताभ बच्चन 

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी १९८४ मध्ये अलाहाबादमधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी हेमवती नंदन बहुगुना यांच्याविरुद्ध १ लाख ८७ हजार मतांनी विजय मिळवला होता. परंतु, त्यांनी अर्ध्यातच राजकारण सोडून पुन्हा चित्रपट सृष्टीचा मार्ग धरला होता.

सुनील दत्त 

सुनील दत्त यांनी काँग्रेसकडून १९८४ मध्ये उत्तर मध्य मुंबईतून राम जेठमलानी यांच्याविरुद्ध विजय मिळवला होता. सुनील दत्त अखेरपर्यंत राजकारणात सक्रिय राहिले. तसेच त्यांनी केंद्रीय मंत्रीपद देखील उपभोगले होते.

राजेश खन्ना

राजेश खन्ना यांच्यासारखा स्टारडम त्यावेळी हिंदी सिनेमात कोणत्याच स्टारला नव्हतं. काँग्रेसच्या तिकीटावर राजेश खन्ना १९९२ आणि १९९६ मध्ये लोकसभेवर निवडून आले होते. परंतु त्यांची राजकीय इनिंग अधिककाळ चालली नाही. त्यांनी लवकरच राजकारणाला अलविदा केले होते.

धर्मेंद्र

अभिनेते धर्मेंद्र यांनी एकेकाळी चित्रपटसृष्टी गाजवली होती. परंतु, राजकारणात त्यांची जादू चालली नाही. २००४ मध्ये बिकानेरमधून धर्मेंद्र निवडून आले होते. मात्र संसदेतील गैरहजरीमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर धर्मेंद्र यांनी राजकारण सोडले होते.

गोविंदा

गोविंदाने आपल्या चित्रपटातून चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. त्याने २००४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळवला होता. परंतु त्याची राजकीय कारकिर्द वादग्रस्त ठरली. अखेर गोविंदाने २००८ मध्ये राजकारण सोडून पुन्हा चित्रपटसृष्टीचा मार्ग धरला.

संजय दत्त

अभिनेता संजय दत्तला २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी समाजवादी पक्षाकडून तिकीट मिळाले होते. परंतु, न्यायालयाने संजय दत्तवर निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती. त्यानंतर संजय दत्तने २०१० मध्ये समावादी पक्ष सोडला होता. अखेरीस राजकारणात त्याची कारकिर्द सुरू होण्यापूर्वीच संपली होती.

परेश रावल

अभिनेते परेश रावल यांनी २००९ मध्ये भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा विजय झाला होता. परंतु, परेश रावल यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. कार्यकर्ता म्हणून आपण भाजपचे काम करू, असंही त्यांनी पक्ष नेतृत्वाला सांगितले.

या व्यतिरिक्त राजकारणात अनेक अभिनेते-अभिनेत्री यशस्वी झाले आहेत. यामध्ये स्मृती इराणी, राज बब्बर, शत्रुघ्न सिन्हा, किरण खैर, हेमा मालिनी यांनी राजकारणात आपले एक स्थान निर्माण केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसAmitabh Bachchanअमिताभ बच्चन