शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मुलाने केलेल्या कृत्याची लाज वाटते, आत्मघाती हल्लेखोर आदिल दारच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 13:15 IST

सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आले होते. हा हल्ला घडवून आणणारा आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दार याच्या कुटुंबीयांना त्याने केलेल्या क्रूर कृत्यामुळे धक्का बसला आहे.

ठळक मुद्दे मुलाने केलेल्या कृत्याची लाज वाटते, अशी प्रतिक्रिया आदिलच्या कुटुंबीयांनी दिलीपुलवामा येथील आत्मघाती ह्ल्ला घडवून आणणार आदिल अहमद दार हा काश्मीरमधील एका गावातील रहिवासी होता2016 मध्ये बुऱ्हाण वानीच्या मृत्यूनंतर दगडफेक करत असताना त्याच्या पायात पेलेट गनची गोळी लागली होती. त्यानंतर तो कट्टक दहशतवादाकडे वळला

श्रीनगर -  सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर गुरुवारी पुलवामा येथे झालेल्या भीषण आत्मघाती हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आले होते. हा हल्ला घडवून आणणारा आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दार याच्या कुटुंबीयांना त्याने केलेल्या क्रूर कृत्यामुळे धक्का बसला असून, मुलाने केलेल्या कृत्याची लाज वाटते, अशी प्रतिक्रिया आदिलच्या कुटुंबीयांनी दिली आहे. पुलवामा येथील आत्मघाती ह्ल्ला घडवून आणणार आदिल अहमद दार हा काश्मीरमधील एका गावातील रहिवासी होता.त्याने केलेल्या या कृत्याबाबत प्रतिक्रिया देताना त्याचा नातेवाईक अब्दुल रशिद म्हणला की, ''कुठल्याही व्यक्तीचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यावर कुणाला आनंद होईल. आदिल याने लहानपणीच आपले शिक्षण सोडले होते. तो मोलमजुरी करत असे. गेल्यावर्ष मार्च महिन्यात तो भाऊ समीर दारसह मित्रांना भेटायला जातो असे सांगून, बेपत्ता झाला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या आई-वडलांनी पोलिसांत माहिती दिली होती. तसेच दहशतवादाचा मार्ग सोडून परत येण्याचे आवाहनही केले होते. मात्र तो माघारी फिरला नाही.'' आदिल हा एवढा कट्टर दहशतवादी बनेल असे वाटले नव्हते. 2016 मध्ये बुऱ्हाण वानीच्या मृत्यूनंतर दगडफेक करत असताना त्याच्या पायात पेलेट गनची गोळी लागली होती. त्यानंतर तो कट्टक दहशतवादाकडे वळला, असेही आदिलच्या या नातेवाईकाने सांगितले. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndiaभारत