शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

अपमान झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:28 IST

गावातील एका विवाहीत महिलेची छेड काढून मुलगा पळून गेल्याने गावातील लोकांनी त्याच्या ५५ वर्षांच्या बापाला झाडाला बांधून मारहाण व शिवीगाळ केली. त्यामुळे दुखावलेल्या बापाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार पश्चिम गोदावरी जिल्ह्यात घडला.

पश्चिम गोदावरी (आंध्र प्रदेश) - गावातील एका विवाहीत महिलेची छेड काढून मुलगा पळून गेल्याने गावातील लोकांनी त्याच्या ५५ वर्षांच्या बापाला झाडाला बांधून मारहाण व शिवीगाळ केली. त्यामुळे दुखावलेल्या बापाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार पश्चिम गोदावरी जिल्ह्यात घडला. त्या बापाला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्याचे प्राण वाचले.संजीवा राव हे सायमपालेम गावात कुटुंबीयांसह राहतात. त्यांचा मुलगा नागेंद्र याने गावातील एका विवाहित महिलेची छेड काढली. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांना गाव पंचायतीकडे तक्रार केली. पंचायतीने मुलाला बोलावून घेतले, पण तिथे जाण्याऐवजी तो गावाबाहेर पळून गेला. त्याचा शोध न लागल्याने पंचायतीने संजीवा राव यांना बोलावून घेतले.त्यांनी मुलाला पंचायतीसमोर आणू, असे सांगितले, पण मुलगा कुठे गेला, हे त्यांनाही माहीत नव्हते. त्यामुळे गावातील लोकांनी राव यांना एका झाडाला बांधून टाकले. अनेकांनी त्यांना शिवीगाळ केली, तर काहींनी त्यांना मारहाणही केली. काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली.मानसिक धक्कामात्र, आपला हा अपमान त्यांना सहन झाला नाही. त्यामुळे त्यांनी कीटकनाशक प्राशन केले. ते लक्षात येताच काहींनी त्यांना जवळच्या जंगारेड्डी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वेळेत उपचार झाल्याने त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, ते मानसिक धक्क्यातून बाहेर आलेले नसून, त्यासाठी बराच काळ लागेल, असे डॉक्टर म्हणाले. मुलाच्या गुन्ह्याची शिक्षा आपणास भोगावी लागल्याने, ते अस्वस्थ आहेत. (वृत्तसंस्था) 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCrimeगुन्हा