शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

सूधा मुर्ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर, हूमायूं आणि कर्णावतीच्या गोष्टीने नवा वाद; पाहा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 18:46 IST

रक्षाबंधन सणाची सुरुवात मुघल सम्राट हुमायून आणि राणी कर्णावतीमुळे झाल्याचे सुधा मूर्ती यांनी म्हटले आहे.

Sudha Murty : राज्यसभा खासदार सुधा मूर्ती (Sudha Murty) नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी मुघल सम्राट हुमायून आणि चित्तोडच्या राणी कर्णावती यांची गोष्ट सांगितली आहे. या व्हिडिओमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. नेटीझन्स सुधा मूर्तींना या व्हिडिओमुळे प्रचंड ट्रोल करत आहेत.

पोस्टमध्ये नेमके काय आहे?सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधन सुरू करण्यामागे मुघल सम्राट हुमायून आणि राणी कर्णावती असल्याचे म्हटले. सुधा मूर्ती त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहितात, "16 व्या शतकात राणी कर्णावती संकटात होत्या, तेव्हा त्यांनी मदतीसाठी मुघल सम्राट हुमायूंकडे एक धागा पाठवला होता. येथूनच राखी पाठवण्याची परंपरा सुरू झाली आणि ती आजही सुरू आहे." या पोस्टमुळे सोशल मीडिया यूजर्स त्यांना ट्रोल करत आहेत.

सुधा मूर्तींनी सांगितली ती गोष्ट...सुधा मूर्तींनी या पोस्टमध्ये एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. त्या म्हणतात की, "रक्षाबंधन हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा सण आहे. एक बहीण तिच्या भावाला रक्षासूत्र बांधते. आपल्या अडचणीच्या काळात भाऊ मदतीसाठी यावा, यासाठी हा धागा बांधला जातो. आपण इतिहासात डोकावून बघितले, तर जेव्हा राणी कर्णावतीच्या राज्यावर दुसऱ्याने आक्रमण केले होते, तेव्हा तिने मुघल सम्राट हुमायूनला धागा पाठवून रक्षण करण्याची विनंती केली होती."

"हुमायून दुसऱ्या देशातून आलेला असल्याने त्याला या धाग्याचा आणि संदेशाचा अर्थ समजला नाही. मग त्याने आपल्या लोकांना याबद्दल विचारले. त्याच्या लोकांनी हुमायूनला सांगितले की, हा बहिणीचा भावाला आलेला संदेश आहे.  जेव्हा हुमायूला याचा अर्थ कळला, तेव्हा त्याने कर्णावतीच्या रक्षणासाठी ताबडतोब दिल्ली सोडली. पण त्याला तिथे पोहोचायला थोडा वेळ लागला, तोपर्यंत राणी कर्णावती मरण पावली होती. पण या कथेतून आपल्याला शिकायला मिळालेला धडा म्हणजे, बहीण अडचणीत असेल, तर ती आपल्या भावाला धागा पाठवून मदतीसाठी बोलावू शकते," अशी माहिती सुधा मूर्तांनी या व्हिडिओतून दिली. 

नेटकऱ्यांनी धरले धारेवर...सुधा मूर्तींच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. नेटकरी म्हणाले की, रक्षाबंधनाची सुरुवात महाभारत काळापासून झाली आहे. कृष्ण आणि द्रौपदी चांगले मित्र होते. युद्धात कृष्णाचे बोट कापले गेले, तेव्हा द्रौपदीने तिची साडी फाडून कृष्णाच्या बोटावर बांधली. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिला आपली बहीण मानले आणि तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. महाभारत युद्ध झाले, तेव्हा युद्धात जाण्यापूर्वी द्रौपदीने कृष्णाच्या मनगटावर राखी बांधली होती. 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनSudha Murtyसुधा मूर्तीSocial Viralसोशल व्हायरल