शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

अचानक आग लागली, बसचा मेन दरवाजा लॉक होता, खिडकी तोडली; जयपूर आग घटनेतील प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 10:58 IST

जयपूरमध्ये बस आणि ट्रकच्या धडक झाली असून मोठा अपघात झाला आहे, या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

राजस्थानमधील जयपूरमध्ये पेट्रोल पंपाजवळ एलपीजी ट्रक आणि सीएनजीच्या ट्रकची भीषण धडक होऊन अपघात झाला. यामुळे मोठी  आग लागली,या आगीत ४० हून अधिक गाड्या सापडल्या. यात प्रवाशांनी भरलेली एक बस सापडली. या बसला आग लागली. या आगीत ६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या बसमधील एका प्रत्यक्षदर्शीने सर्व आपबिती सांगितली आहे. 

मोठी बातमी! धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव नोटीस फेटाळली; उप सभापतींनी दिली ही कारणे...

जयपूरमधील मान सिंह रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३७ जण जखमी झाले. या दुर्घटनेचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या प्रवासी सुनील यांनी सांगितले की, "आम्ही राजसमंदहून जयपूरला येत होतो. अचानक आमच्या बसजवळ स्फोट झाला. आमच्या आजूबाजूला आग लागली होती आणि बसमध्येही आग लागली होती.

सुनील म्हणाले की, आग लागल्याचे समजल्यानंतर आम्ही वाचण्यासठी बसचा मेन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो दरवाजा लॉक होता. यानंतर आम्ही खिडकी तोडून बाहेर आलो. आमच्यासोबत आणखी ८ ते १० लोक बाहेर आले. काही लोक आतच राहिले तर काही जणांचा मृत्यू झाला.

आगीच्या घटनेबाबत जयपूरचे डीएम जितेंद्र सोनी म्हणाले, "सुमारे ४० गाड्या आगीत अडकल्या. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. मदतकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आणण्यात आली आहे आणि आता फक्त १-२ वाहने उरली असून या घटनेत सुमारे २३-२४ जण जखमी झाले आहेत.

राजस्थानमधून जाणाऱ्या जयपूर-अजमेर महामार्गावर आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २०-२२ गाड्या तैनात करण्यात आल्या, मात्र अडीच तास उलटूनही आग पूर्णपणे आटोक्यात येऊ शकली नाही. यावरून हा अपघात किती भीषण झाला असेल याचा अंदाज बांधता येतो. दोन्ही ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, अनेक वाहनांना त्याचा फटका बसला. महामार्गाच्या सुमारे एक किलोमीटर परिसरात ही आग दिसत होती.

टॅग्स :Accidentअपघात