शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अचानक आग लागली, बसचा मेन दरवाजा लॉक होता, खिडकी तोडली; जयपूर आग घटनेतील प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 10:58 IST

जयपूरमध्ये बस आणि ट्रकच्या धडक झाली असून मोठा अपघात झाला आहे, या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

राजस्थानमधील जयपूरमध्ये पेट्रोल पंपाजवळ एलपीजी ट्रक आणि सीएनजीच्या ट्रकची भीषण धडक होऊन अपघात झाला. यामुळे मोठी  आग लागली,या आगीत ४० हून अधिक गाड्या सापडल्या. यात प्रवाशांनी भरलेली एक बस सापडली. या बसला आग लागली. या आगीत ६ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या बसमधील एका प्रत्यक्षदर्शीने सर्व आपबिती सांगितली आहे. 

मोठी बातमी! धनखड यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव नोटीस फेटाळली; उप सभापतींनी दिली ही कारणे...

जयपूरमधील मान सिंह रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३७ जण जखमी झाले. या दुर्घटनेचा प्रत्यक्षदर्शी असलेल्या प्रवासी सुनील यांनी सांगितले की, "आम्ही राजसमंदहून जयपूरला येत होतो. अचानक आमच्या बसजवळ स्फोट झाला. आमच्या आजूबाजूला आग लागली होती आणि बसमध्येही आग लागली होती.

सुनील म्हणाले की, आग लागल्याचे समजल्यानंतर आम्ही वाचण्यासठी बसचा मेन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो दरवाजा लॉक होता. यानंतर आम्ही खिडकी तोडून बाहेर आलो. आमच्यासोबत आणखी ८ ते १० लोक बाहेर आले. काही लोक आतच राहिले तर काही जणांचा मृत्यू झाला.

आगीच्या घटनेबाबत जयपूरचे डीएम जितेंद्र सोनी म्हणाले, "सुमारे ४० गाड्या आगीत अडकल्या. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. मदतकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आणण्यात आली आहे आणि आता फक्त १-२ वाहने उरली असून या घटनेत सुमारे २३-२४ जण जखमी झाले आहेत.

राजस्थानमधून जाणाऱ्या जयपूर-अजमेर महामार्गावर आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या २०-२२ गाड्या तैनात करण्यात आल्या, मात्र अडीच तास उलटूनही आग पूर्णपणे आटोक्यात येऊ शकली नाही. यावरून हा अपघात किती भीषण झाला असेल याचा अंदाज बांधता येतो. दोन्ही ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की, अनेक वाहनांना त्याचा फटका बसला. महामार्गाच्या सुमारे एक किलोमीटर परिसरात ही आग दिसत होती.

टॅग्स :Accidentअपघात