शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नोकरी सोडून स्टार्टअप सुरू, आईचं निधन झालं; पार्टनर पैसे घेऊन पळाला, आता 5 कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 11:08 IST

स्टार्टअपसाठी त्यांचा एक पार्टनर होता. तो पैसे घेऊन पळून गेला आणि गुंतवणूकदाराने गुंतवणूक करण्यास नकार दिला.

शक्तीस्टेलर कंपनी यशस्वी करणाऱ्या अंकित रॉय यांची प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. अंकित रॉय यांचा फक्त त्याच्या बिझनेस आयडियावर विश्वास होता. या विश्वासामुळे आज त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल 5 कोटी रुपयांची होत आहे. त्याची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. ते मुंबईत कामाला होते. याच दरम्यान, आईच्या आजारपणामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यांनी स्टार्टअप सुरू केल्यावर आईचं निधन झालं आणि अंकित डिप्रेशनमध्ये गेले. 

स्टार्टअपसाठी त्यांचा एक पार्टनर होता. तो पैसे घेऊन पळून गेला आणि गुंतवणूकदाराने गुंतवणूक करण्यास नकार दिला. पण तरीही अंकित खचले नाहीत. पुढे मेहनतीने यशस्वी झाले. अंकित यांनी 2009 मध्ये भोपाळच्या राजीव गांधी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीटेक केले. बी.टेक केल्यानंतर त्यांना नोकरी लागली आणि ते मुंबईला आले. पाच वर्षे मुंबईत काम केले. पण, नंतर त्याच्या आईला कॅन्सर झाला. आईच्या उपचारासाठी ते नोकरी सोडून भोपाळला आले.

स्टार्टअप सुरू करण्यासाठी अंकित यांच्याकडे जास्त पैसे नव्हते. तरीही, ते कामाला लागले. अंकित सांगतात की, पहिली ऑर्डर त्यांच्या वडिलांच्या मित्राकडून मिळाली. त्यांच्या घरी सोलर पॅनल बसवून 6,000 रुपयांचे उत्पन्न मिळाले. अंकित यांच्या आईचे कर्करोगाने निधन झाले तेव्हाच त्याचे काम सुरू झाले होते. आईच्या निधनामुळे अंकित डिप्रेशनमध्ये गेले. पण नंतर 6 महिन्यांनी त्यातून बाहेर आली.

अंकित सांगतात की, त्यांनी पैसे उभे करण्यासाठी खूप संघर्ष केला. एका मित्राने त्यांची ओळख एका माणसाशी करून दिली. त्याने पैसे गुंतवण्याचे मान्य केले. यानंतर त्यांनी एका कंपनीसोबत 6 कोटींचा प्रकल्प करार केला. पण, अखेरच्या क्षणी गुंतवणूकदाराने पैसे गुंतवण्यास नकार दिला. या अडचणींमुळे अंकित खचले नाहीत आणि त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. आतापर्यंत त्यांनी 400 हून अधिक साइट्सवर सोलार पॅनेल बसवले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी