शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

'संसदेचा वेळ माझ्यामुळे वाया गेला नाही, मी वेतनावर पाणी सोडणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 11:34 IST

संसदेचे कामकाज चालले नाही. यामध्ये माझा काय दोष?, असा प्रश्न स्वामी उपस्थित केला आहे.

संसदेच्या अधिवेशनाचा वेळ गदारोळामुळे वाया गेल्याने एनडीएच्या सर्व खासदारांनी वेतन आणि भत्ते न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मात्र अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी वेगळा सूर आळवला आहे. संसदेचे कामकाज चालले नाही. यामध्ये माझा काय दोष?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.संसदेच्या अधिवेशनात विविध मुद्यांवरुन मोठा गदारोळ झाला. त्यामुळे संसदेचे कामकाज होऊ शकलेले नाही. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांनी २३ दिवसांचे वेतन न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी याबद्दलची माहिती दिली. मात्र सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. 'संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. यामध्ये माझी काय चूक?,' असा प्रश्न स्वामी यांनी विचारला आहे.'मला राष्ट्रपतींनी खासदारपदी नियुक्त केले आहे. त्यामुळे जोपर्यंत राष्ट्रपती याविषयी काही भाष्य करत नाहीत, तोपर्यंत वेतन न स्वीकारण्याबद्दल मी काही बोलू शकत नाही,' असे स्वामी यांनी म्हटले. गदारोळामुळे संसदेचे कामकाज होऊ न शकल्याने अधिवेशनाचा अमूल्य वेळ वाया गेल्याचे पडसाद कॅबिनेटच्या बैठकीत उमटले. या बैठकीत बहुतांश खासदारांनी वेतन न स्वीकारण्याची भूमिका मांडली. यामुळे जनतेमध्ये चांगला संदेश जाईल, असे मत अनेक खासदारांनी मांडले. त्यामुळे एनडीएचे खासदार २३ दिवसांचे वेतन आणि भत्ते स्वीकारणार नसल्याचा निर्णय संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी जाहीर केला. मात्र सुब्रमण्यम स्वामी यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली आहे. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाParliamentसंसद