शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

पी. व्ही. नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ द्या!, सुब्रह्मण्यम स्वामींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 09:18 IST

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पी.व्ही. नरसिंह राव यांनी घेतलेल्या निर्णयांची आठवण करुन दिली.

नवी दिल्ली :  माजी पंतप्रधान दिवंगत पी. व्ही. नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी किताबाने सन्मानित करावे, अशी मागणी भाजपाचे वरिष्ठ नेता सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली आहे. 

पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना अर्थव्यवस्था, काश्मीर आणि राम मंदिर मुद्यावर घेतलेल्या निर्णयांची आठवण करुन देत येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी त्यांना केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, असे  सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, "पी. व्ही. नरसिंह राव यांनी फक्त अर्थव्यवस्था सुधारली नाही तर संसदेत काश्मीर मुद्यावर प्रस्ताव पारित केला. तसेच, सुप्रीम कोर्टात सांगितले की, जर वादग्रस्त जमिनीवर पहिल्यांदा मंदिर होते. त्यानंतर त्याठिकाणी बाबरी मशिद बांधण्यात आले. तर सरकार हिंदुना जमीन देईल."

दरम्यान, याआधीही तेलंगण सरकार पी. व्ही. नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकली. भारताला 1990 साली आपले सोने गहाण टाकून परकीय चलनाची गरज भागवावी लागली होती. त्यामुळे पी. व्ही. नरसिंह राव यांनी ही अर्थव्यवस्था बदलून मुक्त अर्थव्यवस्था आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री करून त्यांना पूर्ण राजकीय संरक्षण दिले. 25 जुलै 1991रोजी त्यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात बदललेल्या अर्थव्यवस्थेचे दर्शन घडले. तो दिवस देशात आर्थिक परिवर्तनाचा दिवस म्हणून साजरा होत आहे.

(नरसिंहरावांचा पंतप्रधानपदाचा किस्सा)

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी