शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कुणाचा काउंटरवर चढून थयथयाट, तर कुणाला अश्रू अनावर... IndiGo पाहतंय प्रवाशांचा अंत
2
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
3
हृदयद्रावक! पाणी प्यायला, पेपर दिला अन्...; शिक्षकांसमोरच सहावीच्या विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू
4
Fraud: सरकारी नोकरीचे आमिष, जॉइनिंग लेटरही दिलं; लिव्ह- इन जोडप्यानं केला मोठा झोल!
5
IND vs SA : दोन वर्षांनी टीम इंडियाच्या बाजूनं लागला नाणेफेकीचा कौल! या खास Trick सह KL राहुल ठरला टॉसचा बॉस!
6
असं काय झालं की 'या' देशाने तालिबानी अधिकाऱ्यांना थेट आपल्या देशात 'नो एन्ट्री' म्हटलं?
7
भाचीने बॉयफ्रेंडसाठी मामाच्या घरी केली ३० लाखांच्या दागिन्यांची चोरी, त्यानंतर...  
8
Nagpur Crime : स्टोरी एकदम वेगळी ! लग्नाच्या वादातून प्रेयसीनेच संपवले 'त्याला', तिने केलेला बनाव उघड, मोबाइल फॉरमॅट करून गुन्हा लपवण्याचा प्रयत्न
9
डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत
10
बाजारात एन्ट्री घेताच ₹२०० च्या वर जाऊ शकतो 'हा' शेअर; GMP सुस्साट, ४३७ पट झालेला सबस्क्राईब
11
दुसरं लग्न करायला उभा राहिला नवरदेव; भर मांडवात कडेवर मूल घेऊन पोहोचली पहिली पत्नी अन्...
12
कुटुंबाला भेटायला निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याला वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार अपघातात पेटली अन् जागीच...
13
फडणवीस म्हणाले,१० फेऱ्या सुरू, रेल्वेला आयोगाची परवानगी हवी; उरण-नेरूळ-बेलापूर फेऱ्या वाढणार
14
माजी आमदार कदम यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी आरोप निश्चित, गुन्हेगारी प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात होणार
15
पुतिन यांच्या भारत भेटीने का खूश झाला आहे पाकिस्तानचा 'हा' शेजारी देश? काय फायदा होणार?
16
गुरवली रेल्वे स्टेशन होऊ शकत नाही; रेल्वेनेच केले स्पष्ट, वेळापत्रकावर  परिणाम
17
बाबरी मशिदीच्या पायाभरणीवरून बंगालमध्ये वाद, विटा घेऊन निघाले हुमायूं कबीर यांचे समर्थक  
18
अनिल अंबानी यांची आणखी १,१२० कोटींची मालमत्ता जप्त; मुदत ठेवी, शेअर्सचाही समावेश
19
SMAT 2025 : डॉक्टरांमुळे इंदूरमध्ये क्रिकेटर्सची गैरसोय! आता पुण्यात रंगणार टी-२० चा थरार; कारण...
20
संबंध नसलेल्यांचे एसआरएवर नियंत्रण, राजकारण्यांना उच्च न्यायालयाचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

पी. व्ही. नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ द्या!, सुब्रह्मण्यम स्वामींची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 09:18 IST

सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पी.व्ही. नरसिंह राव यांनी घेतलेल्या निर्णयांची आठवण करुन दिली.

नवी दिल्ली :  माजी पंतप्रधान दिवंगत पी. व्ही. नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी किताबाने सन्मानित करावे, अशी मागणी भाजपाचे वरिष्ठ नेता सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केली आहे. 

पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना अर्थव्यवस्था, काश्मीर आणि राम मंदिर मुद्यावर घेतलेल्या निर्णयांची आठवण करुन देत येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी त्यांना केंद्र सरकारने ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, असे  सुब्रह्मण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, "पी. व्ही. नरसिंह राव यांनी फक्त अर्थव्यवस्था सुधारली नाही तर संसदेत काश्मीर मुद्यावर प्रस्ताव पारित केला. तसेच, सुप्रीम कोर्टात सांगितले की, जर वादग्रस्त जमिनीवर पहिल्यांदा मंदिर होते. त्यानंतर त्याठिकाणी बाबरी मशिद बांधण्यात आले. तर सरकार हिंदुना जमीन देईल."

दरम्यान, याआधीही तेलंगण सरकार पी. व्ही. नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी भारताची अर्थव्यवस्था पूर्ण बदलून टाकली. भारताला 1990 साली आपले सोने गहाण टाकून परकीय चलनाची गरज भागवावी लागली होती. त्यामुळे पी. व्ही. नरसिंह राव यांनी ही अर्थव्यवस्था बदलून मुक्त अर्थव्यवस्था आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री करून त्यांना पूर्ण राजकीय संरक्षण दिले. 25 जुलै 1991रोजी त्यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात बदललेल्या अर्थव्यवस्थेचे दर्शन घडले. तो दिवस देशात आर्थिक परिवर्तनाचा दिवस म्हणून साजरा होत आहे.

(नरसिंहरावांचा पंतप्रधानपदाचा किस्सा)

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी