शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

“चीनने भारताचा भूभाग बळकावला, हेही पंतप्रधान मोदी आता कबूल करणार का?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 14:34 IST

चीनच्या ताब्यात असलेली प्रत्येक इंच परत मिळवण्यासाठी मोदी आणि त्यांचे सरकार प्रयत्न करतील का, अशी विचारणा करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तीनही कृषी कायदे रद्द (Farm laws Repeal) करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता देशभरातून प्रतिक्रिया येत आहेत. फारूक अब्दुल्ला यांनी अनुच्छेद ३७० पुन्हा लागू करण्याची मागणी केली असतानाच आता भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भारत आणि चीनच्या सीमा प्रश्नाकडे लक्ष वेधत पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. चीनने भारताचा भूभाग बळकावला, हेही पंतप्रधान मोदी आता कबूल करणार का, असा प्रश्न स्वामी यांनी उपस्थित केला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना केंद्रीय कृषी कायदे रद्द करत असल्याचे जाहीर केले. यानंतर देशातील विरोधक आणि शेतकरी आंदोलकांनी एकच जल्लोष केला. तर हा निर्णय आगामी पाच राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आल्याची टीकाही करण्यात आले आहे. यातच आता भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. 

हेही पंतप्रधान मोदी आता कबूल करणार का?

चीनने भारताचा भूभाग बळकावला, हेही पंतप्रधान मोदी आता कबूल करणार का आणि चीनच्या ताब्यात असलेली प्रत्येक इंच परत मिळवण्यासाठी मोदी आणि त्यांचे सरकार प्रयत्न करतील का?, अशी विचारणा सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटरवरून केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारत आणि चीन सीमा प्रश्नावरून सुब्रमण्यम स्वामी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहे. तसेच नियंत्रण रेषेवरून भारत मागे फिरला चीन नाही, असा दावाही सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी केला होता. 

दरम्यान, शेतकऱ्यांपेक्षा कोणी मोठे नाही, हे उशिरा का होईना पण सरकारला कळले आहे. शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी उभे ठाकतात आणि सत्ताधाऱ्यांना झुकावेच लागते हे सरकारला कळले आहे. याचा आनंद आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक एकवटले याचाही आनंद आहे, असे सांगत पंतप्रधान मोदी एकदाही बॉर्डवर गेले नाहीत. शेतकऱ्यांना भेटले नाहीत. आज अचानक त्यांना कशी काय जाग आली? प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी अध्यादेश काढता. मग कृषी कायदे रद्द करणारा अध्यादेश का काढला नाही. निवडणुका आल्यावरच अध्यादेश काढणार आहात का, केवळ निवडणुकीसाठी निर्णय घेणार आहात का, अशी टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर केली.  

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीNarendra Modiनरेंद्र मोदीindia china faceoffभारत-चीन तणाव