शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Subramanian Swamy: 26/11 दहशतवादी हल्ल्यावर सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक दावा; सूत्रधाराचे सांगितले नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 20:07 IST

Subramaniam Swamy on 26/11 terror attack Mumbai: गुरुवारी या दहशतवादी हल्ल्यांमागे कोणाचे कारस्थान होते, याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे. मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सर्वांना माहिती आहे.

नवी दिल्ली : भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबईत २००८ साली झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. गुरुवारी या दहशतवादी हल्ल्यांमागे कोणाचे कारस्थान होते, याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे. 

स्वामींनी ट्विट केले की, 'हे धक्कादायक आहे. २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी यूपीए सरकारमध्ये गृह मंत्रालयाचे अंडर सेक्रेटरी राहिलेले आरव्हीएस मणी यांनी उघडपणे पाकिस्तानी अजमल कसाब आणि दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यादरम्यान पडद्यामागे काय घडले होते ते सांगितले आहे. हे टीडीकेसह पाकिस्तानचे कृत्य होते.

मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सर्वांना माहिती आहे. मात्र, टीडीकेचे नाव लिहून स्वामींनी अखेर कोणावर निशाना साधला हे स्पष्ट झालेले नाही. स्वामी यांनी ज्या मणी यांचे नाव घेतले आहे, त्यांनी मुंबई हल्ल्याबाबत युपीए सरकारने घेतलेल्या भूमिकांवर या आधीही प्रश्न उपस्थित केले आहेत. दोन वर्षांपूर्वी मणी यांनी हा हल्ला पाकिस्तान आणि तेव्हाच्या युपीए सरकारमधील फिक्स मॅच होती असा आरोप केला आहे. 

लोकसभेचे अधिवेशन सुरु झाले आहे. त्यातच ममता बॅनर्जी यांनी युपीए अस्तित्वात नसल्याचे वक्तव्य केल्याने देशातील विरोधकांमध्ये वाक् युद्ध सुरु झाले आहे. स्वामींनी पुढे म्हटले की, देशहिताचे कारण देत राज्यसभा सचिवालयाने हा प्रश्न राज्यसभेत विचारण्याची परवानगी दिली जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. 

याचबरोबर चीनच्या सैन्याने लडाखमध्ये एलएसी पार केलेली का, हा प्रश्न विचारण्यास परवानगी दिली नसल्याचेही ते म्हणाले. यासाठी देशासाठी महत्वाचा प्रश्न असल्याचे कारण देण्यात आल्याचे स्वामी म्हणाले.  

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान