शहरं
Join us  
Trending Stories
1
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
2
वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
3
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
4
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
5
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
6
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
7
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
8
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
9
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
10
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
12
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
14
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
15
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
16
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
17
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
18
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
19
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
20
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”

राष्ट्रगीतासाठी सक्तीने उभे करणे हा न्यायालयाचा मूर्खपणा!

By admin | Updated: December 28, 2016 02:41 IST

‘चित्रपटगृहांमध्ये प्रत्येक खेळाच्या आधी राष्ट्रगीत वाजविले जावे आणि त्या वेळी प्रत्येकाने आदराने उभे राहावे, अशी सक्ती करणारा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला

नवी दिल्ली : ‘चित्रपटगृहांमध्ये प्रत्येक खेळाच्या आधी राष्ट्रगीत वाजविले जावे आणि त्या वेळी प्रत्येकाने आदराने उभे राहावे, अशी सक्ती करणारा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा मूर्खपणा आहे व ही न्यायालयाने आपले अधिकारक्षेत्र सोडून केलेली ढवळाढवळ आहे,’ अशी टीका ख्यातनाम इतिहासतज्ज्ञ एमजीएस नारायणन यांनी केली आहे.‘मातृभूमी’ या साप्ताहिकास दिलेल्या मुलाखतीत नारायणन म्हणाले की, ‘खरे तर न्यायालयाच्या या आदेशावर टीका करण्याची गरजही नाही. कारण लोकांच्या मनात राष्ट्रभावना नसेल, तर ते हा आदेश पाळणार नाहीत व तो निरर्थक ठरेल हे उघड आहे.’ ते म्हणाले की, ‘लोक चित्रपटगृहांमध्ये मनोरंजनासाठी येतात. तेथे त्यांना राष्ट्रप्रेमाचे डोस बळजबरीने पाजण्याची गरज नाही.’प्राचीन भारतीय इतिहासाचे तज्ज्ञ असलेले नारायणन भारतीय इतिहास संशोधन परिषद या केंद्र सरकारच्या अखत्यारितील संस्थेचे अध्यक्ष होते व राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या या आधीच्या सरकारने त्यांची नेमणूक केली होती.नारायणन म्हणाले की, भारत हे इतिहासात कधी एका विचाराने बांधलेले राष्ट्र होते, असे निदान मी तरी मानत नाही. फार तर आपण भारताला अठरापगड राष्ट्रीयत्वांचा महासंघ, असे म्हणू शकू.राष्ट्रीयता आणि राष्ट्रभक्तीच्या सक्तीचे असे होणारे प्रयत्न हे मूठभरांच्या हुकूमशाहीचे द्योतक आहे व लोकशाहीच्या विरोधी आहे, असेही ते म्हणाले.त्यांचे असेही म्हणणे होते की, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ५१(१) मधील भाषा पाहिली, तर देश आणि राष्ट्रीय प्रतीके यांच्याविषयीचा आदर न्यायालयीन सक्तीने निर्माण केला जाऊ शकत नाही, हे स्पष्ट होईल. स्वत: सर्वोच्च न्यायालयासही याचे भान आहे व म्हणूनच ‘जेओव्हाज विटनेस’ या ख्रिश्चन समाजातील मुलांना शाळेत राष्ट्रगीत म्हणण्याच्या सक्तीच्या विरोधात न्यायालयाने १९८६ मध्ये निकाल दिला होता. एवढेच नव्हे, तर आपली संस्कृती आणि धार्मिक तत्त्वज्ञान आपल्याला सहिष्णुततेची शिकवण देते, हेही न्यायालयोन त्या निकालात अधोरेखित केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)मुळात लोकांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना असेल, तर राष्ट्रगीताला अर्थ आहे. तसे असेल तर राष्ट्रगीताविषयी आदरही आपोआप व्यक्त होईल. राष्ट्रीयत्वाची भावना बळजबरीने निर्माण केली जाऊ शकत नाही. असे सक्तीचे प्रयत्न झाले, तर त्याचा उलटा परिणाम होईल.- एमजीएस नारायणन, प्राचीन भारतीय इतिहासाचे तज्ज्ञ