शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

राष्ट्रगीतासाठी सक्तीने उभे करणे हा न्यायालयाचा मूर्खपणा!

By admin | Updated: December 28, 2016 02:41 IST

‘चित्रपटगृहांमध्ये प्रत्येक खेळाच्या आधी राष्ट्रगीत वाजविले जावे आणि त्या वेळी प्रत्येकाने आदराने उभे राहावे, अशी सक्ती करणारा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला

नवी दिल्ली : ‘चित्रपटगृहांमध्ये प्रत्येक खेळाच्या आधी राष्ट्रगीत वाजविले जावे आणि त्या वेळी प्रत्येकाने आदराने उभे राहावे, अशी सक्ती करणारा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा मूर्खपणा आहे व ही न्यायालयाने आपले अधिकारक्षेत्र सोडून केलेली ढवळाढवळ आहे,’ अशी टीका ख्यातनाम इतिहासतज्ज्ञ एमजीएस नारायणन यांनी केली आहे.‘मातृभूमी’ या साप्ताहिकास दिलेल्या मुलाखतीत नारायणन म्हणाले की, ‘खरे तर न्यायालयाच्या या आदेशावर टीका करण्याची गरजही नाही. कारण लोकांच्या मनात राष्ट्रभावना नसेल, तर ते हा आदेश पाळणार नाहीत व तो निरर्थक ठरेल हे उघड आहे.’ ते म्हणाले की, ‘लोक चित्रपटगृहांमध्ये मनोरंजनासाठी येतात. तेथे त्यांना राष्ट्रप्रेमाचे डोस बळजबरीने पाजण्याची गरज नाही.’प्राचीन भारतीय इतिहासाचे तज्ज्ञ असलेले नारायणन भारतीय इतिहास संशोधन परिषद या केंद्र सरकारच्या अखत्यारितील संस्थेचे अध्यक्ष होते व राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या या आधीच्या सरकारने त्यांची नेमणूक केली होती.नारायणन म्हणाले की, भारत हे इतिहासात कधी एका विचाराने बांधलेले राष्ट्र होते, असे निदान मी तरी मानत नाही. फार तर आपण भारताला अठरापगड राष्ट्रीयत्वांचा महासंघ, असे म्हणू शकू.राष्ट्रीयता आणि राष्ट्रभक्तीच्या सक्तीचे असे होणारे प्रयत्न हे मूठभरांच्या हुकूमशाहीचे द्योतक आहे व लोकशाहीच्या विरोधी आहे, असेही ते म्हणाले.त्यांचे असेही म्हणणे होते की, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ५१(१) मधील भाषा पाहिली, तर देश आणि राष्ट्रीय प्रतीके यांच्याविषयीचा आदर न्यायालयीन सक्तीने निर्माण केला जाऊ शकत नाही, हे स्पष्ट होईल. स्वत: सर्वोच्च न्यायालयासही याचे भान आहे व म्हणूनच ‘जेओव्हाज विटनेस’ या ख्रिश्चन समाजातील मुलांना शाळेत राष्ट्रगीत म्हणण्याच्या सक्तीच्या विरोधात न्यायालयाने १९८६ मध्ये निकाल दिला होता. एवढेच नव्हे, तर आपली संस्कृती आणि धार्मिक तत्त्वज्ञान आपल्याला सहिष्णुततेची शिकवण देते, हेही न्यायालयोन त्या निकालात अधोरेखित केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)मुळात लोकांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना असेल, तर राष्ट्रगीताला अर्थ आहे. तसे असेल तर राष्ट्रगीताविषयी आदरही आपोआप व्यक्त होईल. राष्ट्रीयत्वाची भावना बळजबरीने निर्माण केली जाऊ शकत नाही. असे सक्तीचे प्रयत्न झाले, तर त्याचा उलटा परिणाम होईल.- एमजीएस नारायणन, प्राचीन भारतीय इतिहासाचे तज्ज्ञ