शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विदेशात शिक्षणासाठी न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातच सुविधा देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 03:12 IST

विद्यार्थ्यांच्या कमतरतेच्या समस्येमुळे बंद होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अभियांत्रिकी कॉलेजेसना संजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे.

एस.के. गुप्ता नवी दिल्ली : भारतातून दरवर्षी लाखो विद्यार्थी विदेशात शिकण्यासाठी जातात. त्यात विशेषकरून अमेरिका, रशिया, इंग्लंड, चीन व कॅनडा यांचा समावेश आहे. आता कोरोनाच्या भीतीमुळे विदेशात जाऊ न शकणाºया विद्यार्थ्यांना आपल्याच देशात शिक्षणांची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या कमतरतेच्या समस्येमुळे बंद होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अभियांत्रिकी कॉलेजेसना संजीवनी मिळण्याची अपेक्षा आहे.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयात याबाबत नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक बोलाविण्यात आली होती. त्याबाबत एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, जेईई मेन्स परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख काही काळासाठी वाढविण्यात आली. कोरोनाच्या उद्रेकामुळे विदेशात शिक्षणाची संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याच देशात अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून येथील संस्थांमध्ये प्रवेश घेता यावा, यासाठी ही तरतूद करण्यात आली होती. सध्या जेईई मेन्सच्या परीक्षेसाठी २५ हजार नवीन विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. यामुळे एकूण विद्यार्थ्यांची संख्या ८.५० लाखांवर गेली आहे. यामुळे बंद पडण्याच्या स्थितीत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांनाही संजीवनी मिळणार आहे. अशा महाविद्यालयांना विद्यार्थी मिळतील व विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयांत शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी विदेशी विद्यार्थ्यांना भारतात शिक्षणाची संधी देण्यासाठी ‘स्टडी इन इंडिया’ ही योजना सुरू केली होती. भारत सरकारने दरवर्षी यात ५० हजार विदेशी विद्यार्थ्यांना शिकविण्याची ही योजना बनवली होती.>उच्च गुणवत्तेची विद्यापीठे उघडावी लागतील -पोखरियालकेंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ‘लोकमत’बरोबर केलेल्या विशेष बातचीतमध्ये सांगितले की, भारतातील सुमारे ७.५ लाख विद्यार्थी विदेशात शिकतात. अशा विद्यार्थ्यांना तसेच इतर विद्यार्थ्यांनाही भारतात शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी उच्च गुणवत्तेची खाजगी व सरकारी विद्यापीठे उघडावी लागतील. ‘स्टडी इन इंडिया’ अंतर्गत विदेशी व देशातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणात उत्तमोत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. पोखरियाल यांनी सांगितले की, कोरोना महामारीच्या कठीण स्थितीने प्रत्येक क्षेत्रातील लोकांचे जीवन प्रभावित केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या भूमीत- भारतात- शिक्षण घेण्याची तसेच काम करण्याची इच्छा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत आत्मनिर्भरतेकडे जात आहे.