शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; ‘नीट’,‘जेईई’ घेऊ नका; महाराष्ट्रासह सहा राज्यांची सुप्रीम कोर्टात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 07:23 IST

जेईई (मेन) ही परीक्षा १ ते ६ सप्टेंबर या कालावधीत, तर १३ सप्टेंबर रोजी ‘नीट’ परीक्षा

नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशांसाठी घेतली जाणारी ‘नीट’ व ’आयआयटी’सह प्रमुख अभियांत्रिकी संस्थांमधील प्रवेशांसाठी घेतली जाणारी ‘जेईई’ या देशपातळीवरील प्रवेश परीक्षा सध्याच्या कोरोना महामारीचा जोर कमी होईपर्यंत घेतल्या जाऊ नयेत, यासाठी विरोधी पक्षांची सरकारे असलेल्या सहा राज्यांमधील मंत्र्यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या व्हर्च्यु्अल बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पं. बंगाल, झारखंड, राजस्थान, छत्तीसगढ, पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांमधील प्रत्येकी एक अशा मिळून एकूण सहा मंत्र्यांनी एक सामायिक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री उदय सामंत हे त्यापैकी एक याचिकाकर्ते आहेत. विशेष म्हणजे एक सुजाण व जबाबदार नागरिक या नात्याने आम्ही ही याचिका व्यक्तिगत पातळीवर केली आहे, असे या मंत्र्यांनी आवर्जून नमूद केले आहे.

या प्रवेश परिक्षांना स्थगिती देण्याच्या १७ आॅगस्टच्या निकालाचा न्यायालयाने फेरविचार करावा यासाठी राज्यांनी ही याचिका केली आहे. साथीचे संकट असले तरी दैनंदिन व्यवहार थांबू शकत नाहीत व या प्रवेश परीक्षा वेळÞेवर न घेऊन विद्यार्थ्यांचे बहुमोल वर्षही वाया जाऊ दिले शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने या परिक्षांना हिरवा कंदील दिला होता. त्यानंतर ‘नीट’ ‘जेईई’ व ‘जेईई अ‍ॅडव्हान्स्ड’ या सर्व परीक्षा आधी ठरल्याप्रमाणे सप्टेंबरमध्येच होतील, असे ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ने (एनटीए) जाहीर केले होते.

न्यायालयाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी कळकळीची विनंती करताना ही राज्ये याचिकेत म्हणतात की, या परिक्षांना देशभारातून लाखो उमेदवार बसतात. त्यांचे आरोग्य जपण्यासाठी सध्या परीक्षा न घेणेच इष्ट ठरेल. शिवाय एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवारांच्या प्रवासाची व निवासाची सुरक्षित व्यवस्था करणे हे फार कठीण काम आहे. या राज्यांचा असाही आरोप आहे की, जेव्हा कोरोना साथीचा जोर तुलनेने कमी होता तेव्हा या परीक्षा योग्य ती काळजी घेऊन सुरक्षितपणे घेता आल्या असत्या. आपल्या या नाकर्तेपणाने लाखो विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाईल याची आता जाणीव झाल्याने केंद्र सरकार घाईघाईने परीक्षा घेऊ पाहात आहे.न्यायाधीशांच्या निवृत्तीने निकड1) आधीचा निकाल ज्या खंडपीठाने दिला होता त्याचे प्रमुख न्यायाधीश न्या. अरुण मिश्रा येत्या बुधवारी २ सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. ज्यांनी मूळ निकाल दिला त्यांनीच फेरविचार याचिका ऐकण्याची प्रथा आहे. त्यामुळे या याचिकेवर तातडीने सुनावणी होणे अपेक्षित आहे.2) ते शक्य न झाल्यास मूळच्या खंडपीठावरील बाकीचे दोन न्यायाधीश व तिसरा नवा न्यायाधीश यांना ही सुनावणी घ्यावी लागेल. परीक्षेच्या नियोजित तारखाही सप्टेंबरच्या मध्यात असल्याने त्यादृष्टीनेही लवकरात लवकर सुनावणी होणे गरजेचे आहे. मात्र फेरविचार याचिकेत सुनावणीची कक्षा खूपच मर्यादित असते, हेही लक्षात घ्यायला हवे.3) आधीच्या तुलनेत साथीचा जोर वाढलेला असताना आता परीक्षा घेण्याने केवळ परीक्षा देणाऱ्यांच्याच आरोग्यास धोका संभवेल असे नाही, तर त्याने एकूणच सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होईल, असेही राज्यांचे मत आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय