शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शिक्षणाच्या आयचा घो! NEET परीक्षेत भोपळा तरी मिळाला MBBS ला प्रवेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 11:25 IST

NEET परीक्षेत शून्य तसेच दहापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 

नवी दिल्ली -  आपल्या देशात शिक्षणव्यवस्थेचा मांडला गेलेला बाजार ही आता नवी बाब राहिलेली नाही. त्यामुळे गुणवत्ता नसलेल्यांनाही पैशाच्या बळावर उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळतो. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2017 साली एमबीबीएससाठी झालेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये NEET परीक्षेत शून्य तसेच दहापेक्षा कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित होणाऱ्या NEET परीक्षेत फिजिक्स आणि केमेस्ट्री या विषयांमध्ये सुमारे 400 विद्यार्थ्यांना दहापेक्षा कमी तर 110 विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले. मात्र या सर्व विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांना खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. त्यामुळे जर शून्य गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असेल तर ही परीक्षा आयोजित करण्याचे औचित्यच काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.  टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने  2017 साली वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या आणि 150 हून कमी गुण असलेल्या 1990 विद्यार्थ्यांच्या गुणांचे विश्लेषण केले होते. त्यामधून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी केली असता 530 विद्यार्थ्यांना फिजिक्स आणि केमेस्ट्री किंवा दोन्ही विषयांत दहापेक्षा कमी किंवा शून्य गुण मिळाल्याचे समोर आले आहे.   सुरुवातीला सामुहिक प्रवेश परीक्षेसाठी बनवण्यात आलेल्या नियमानुसार प्रत्येक विषयात किमान 50 टक्के गुण मिळवणे अनिवार्य केले होते. मात्र नव्या नियमावलीमध्ये पर्सेंटाइल सिस्टिमचा स्वीकार करण्यात आला असून, या नियमानुसार अनिवार्य गुणांचा नियम रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये शून्य किंवा एकेरी गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळू लागला आहे.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षाeducationशैक्षणिक