शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

तामिळनाडूमध्ये उपराजधानी स्थापन करण्याची मंत्र्यांकडूनच जोरदार मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 05:33 IST

हे माजी मुख्यमंत्री तथा अद्रमुकचे संस्थापक एम.जी. रामचंद्रन (एमजीआर) यांचेही स्वप्न होते, असे त्यांनी म्हटले आहे.

चेन्नई : तामिळनाडूत उपराजधानी तयार करण्याची मागणी जोर धरीत आहे. अद्रमुक मंत्र्यांकडूनच ही मागणी जोरदारपणे केली जात आहे. शेजारील आंध्र प्रदेशने तीन राजधान्यांचे नियोजन केले असून, त्यानुषंगाने तामिळनाडूत ही मागणी समोर आल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.तामिळनाडूचे पर्यटनमंत्री वेल्लामंडी एन. नटराजन यांनी त्रिचिरापल्लीला दुसऱ्या राजधानीचा मान देण्याची मागणी केली आहे. हे माजी मुख्यमंत्री तथा अद्रमुकचे संस्थापक एम.जी. रामचंद्रन (एमजीआर) यांचेही स्वप्न होते, असे त्यांनी म्हटले आहे. नटराजन हे पूर्व त्रिचिरापल्ली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी सांगितले की, राज्यात उपराजधानी निर्माण करण्याची मागणी समोर येत असेल, तर त्रिची जिल्ह्याच्या वतीने मी मुख्यमंत्री एडाप्पडी के पलानीसामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनीर सेल्वम यांना विनंती करतो की, आमची विनंती मान्य करण्यात यावी. तामिळनाडूची उपराजधानी होण्याचे सगळे गुण त्रिचीमध्ये आहेत. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्रिभुज प्रदेशातील एकमेव जिल्हा असल्यामुळे येथे पाण्याचीही कमी नाही.त्याआधी दोनच दिवसांपूर्वी महसूलमंत्री आर.बी. उदयकुमार यांनी मदुराईला दुसºया राजधानीचा दर्जा देण्याची मागणी केली होती. सहकारमंत्री सेल्लर राजू यांनी त्यांच्या मागणीला समर्थन दिले आहे. मदुराई जिल्ह्यातील अद्रमुक कार्यकर्त्यांनी यासंबंधीचा एक ठराव मंजूर करून पक्षश्रेष्ठींना पाठविला आहे. एक समिती स्थापन करून मदुराईला दुसरी राजधानी बनविणे शक्य आहे का, हे तपासून पाहण्याची मागणी या ठरावात करण्यात आली आहे.एमजीआर यांचे स्वप्नसहकारमंत्री राजू यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी आपले सर्व राजकीय निर्णय मदुराईतूनच घेतले. जागतिक तामिळ परिषद मदुराईत भरलेली आहे. मदुराईला उपराजधानी आणि त्रिचीला राजधानी करणे हे एमजीआर यांचे स्वप्न होते. तथापि, द्रमुक नेते करुणानिधी यांनी यास विरोध केला होता.