शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी द्वेषयुक्त भाषण केल्यास कठोर कारवाई आवश्यक : दिल्ली उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 21:58 IST

द्वेषानं भरलेल्या भाषणांमुळे देशात स्थलांतरासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचीही उदाहरणं असल्याचं न्यायालयानं नोंदवलं निरिक्षण.

‘निवडून आलेले लोकप्रतिनिधी, राजकीय आणि धार्मिक नेत्यांची धर्म आणि जातीच्या आधारावर प्रक्षोभक भाषणे घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन करतात. तसेच घटनात्मक लोकभावना दुखावतात, त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून कठोर कारवाई करणे आवश्यक आहे,’ असे दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले. दरम्यान, द्वेषानं भरलेल्या भाषणांमुळे देशात स्थलांतरासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचीही उदाहरणे आहे, असं न्यायमूर्ती चंद्रधारी सिंह यांनी नमूद केलं. तसंच बडे नेते, उच्च पदांवरील लोकांनी संपूर्ण जबाबदारी आणि प्रामाणिकपणानं वागलं पाहिजे असं म्हणत कानउघडणी केली.

“दोन समुदायांमध्ये दरी निर्माण होईल किंवा तणाव निर्माण होईल, तसंच सामाजिक सलोख्यासाठी धोक्याचं ठरेल असं कोणतंही कृत्य किंवा भाषण नेत्यांनी करू नये. निवडून आलेला नेता हा केवळ आपल्या मतदारांचाच नाही तर संपूर्ण समाज, राष्ट्र आणि संविधानाप्रती आपली जबाबदारी पार पाडत असतात,” असंही न्यायालयानं म्हटलं.

“देशाच्या विविध भागांमध्ये लोकसंख्येच्या रचनेवर आधारित विशिष्ट समुदायातील लोकांविरुद्ध द्वेषयुक्त भाषणाची अनेक उदाहरणे आहेत आणि अशी प्रकरणे सातत्यानं सुरू आहेत. अशा प्रकारच्या भाषणांमुळे डेमोग्राफीक बदलांचीही उदाहरणं आहेत. यापैकी काश्मीर खोऱ्यातील पंडितांचं पलायन हेदेखील प्रमुख उदाहरण आहे,” असं न्यायालयानं स्पष्ट केलं. दरम्यान, न्यायलयानं मार्क्सवादी नेते के.एम. तिवारी आणि वृंदा करात यांनी याची याचिका फेटाळली. यादरम्यान, न्यायालयानं यावर भाष्य केलं. या याचिकेत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि खासदार प्रवेश वर्मा यांच्याविरोधात कथितरित्या द्वेषयुक्त भाषणांसाठी एफआयआर दाखल करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. न्यायालयानं ट्रायल कोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला, कारण कायद्यातील सध्याच्या तथ्यांमुळे एफआयआर नोंदवण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याकडून आवश्यक मंजुरी घेणे आवश्यक आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGovernmentसरकार