शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

देशात मंदी असती तर कोट-जॅकेटऐवजी धोतरावर फिरलो असतो; भाजप खासदाराचा अजब तर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 10:33 IST

विरोधीपक्ष देशातील आर्थिक मंदीवरून सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहे. घसरणारा जीडीपी, वाढती बेरोजगारी, मंदी यासह आर्थिक बाबतीत होत असलेल्या पिछेहटीवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. तर भाजपकडून देशात मंदी नसल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. 

नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी नसून तेजी असल्याचं देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेकदा सांगितले आहे. आता त्यांच्या पक्षाच्या खासदाराने देखील देशात मंदी नसल्याचे सांगत अजब तर्क मांडला आहे.

उत्तर प्रदेशातील बलिया मतदार संघाचे खासदार विरेंद्र सिंह यांच्यानुसार देशात मंदी नाही. देशातील नागरिक पारंपरिक धोतर-कुर्ता परिधान करण्याऐवजी कोट आणि जॅकेट परिधान करत आहेत. मग मंदी कसकाय, असा अजब सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीसह संपूर्ण जगात मंदीवर चर्चा होत असून यात काहीही तथ्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

जगभरात मंदीवर चर्चा होते. परंतु, मंदी असती तर देशात कोट आणि जॅकेटऐवजी लोकांनी धोतर-कुर्ता परिधान केले असते. मंदीत आपण कपडे खरेदी केले नसते. पँट आणि पायजामा खरेदी केला नसता असे सांगत त्यांनी भारत केवळ शहरांचा नव्हे तर खेड्यापाड्यांचा देश असल्याचे नमूद केले. देशात 6.5 लाख गावं आहेत. महत्मा गांधी, डॉक्टर हेडगेवार, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि जयप्रकाश नारायण यांनी देखील ग्रामीण भागावर विश्वास दाखवला होता, याची आठवण विरेंद्र सिंह यांनी करून दिली. 

दरम्यान विरोधीपक्ष देशातील आर्थिक मंदीवरून सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहे. घसरणारा जीडीपी, वाढती बेरोजगारी, मंदी यासह आर्थिक बाबतीत होत असलेल्या पिछेहटीवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. तर भाजपकडून देशात मंदी नसल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे.