शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

देशात मंदी असती तर कोट-जॅकेटऐवजी धोतरावर फिरलो असतो; भाजप खासदाराचा अजब तर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 10:33 IST

विरोधीपक्ष देशातील आर्थिक मंदीवरून सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहे. घसरणारा जीडीपी, वाढती बेरोजगारी, मंदी यासह आर्थिक बाबतीत होत असलेल्या पिछेहटीवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. तर भाजपकडून देशात मंदी नसल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. 

नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी नसून तेजी असल्याचं देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेकदा सांगितले आहे. आता त्यांच्या पक्षाच्या खासदाराने देखील देशात मंदी नसल्याचे सांगत अजब तर्क मांडला आहे.

उत्तर प्रदेशातील बलिया मतदार संघाचे खासदार विरेंद्र सिंह यांच्यानुसार देशात मंदी नाही. देशातील नागरिक पारंपरिक धोतर-कुर्ता परिधान करण्याऐवजी कोट आणि जॅकेट परिधान करत आहेत. मग मंदी कसकाय, असा अजब सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीसह संपूर्ण जगात मंदीवर चर्चा होत असून यात काहीही तथ्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

जगभरात मंदीवर चर्चा होते. परंतु, मंदी असती तर देशात कोट आणि जॅकेटऐवजी लोकांनी धोतर-कुर्ता परिधान केले असते. मंदीत आपण कपडे खरेदी केले नसते. पँट आणि पायजामा खरेदी केला नसता असे सांगत त्यांनी भारत केवळ शहरांचा नव्हे तर खेड्यापाड्यांचा देश असल्याचे नमूद केले. देशात 6.5 लाख गावं आहेत. महत्मा गांधी, डॉक्टर हेडगेवार, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि जयप्रकाश नारायण यांनी देखील ग्रामीण भागावर विश्वास दाखवला होता, याची आठवण विरेंद्र सिंह यांनी करून दिली. 

दरम्यान विरोधीपक्ष देशातील आर्थिक मंदीवरून सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहे. घसरणारा जीडीपी, वाढती बेरोजगारी, मंदी यासह आर्थिक बाबतीत होत असलेल्या पिछेहटीवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. तर भाजपकडून देशात मंदी नसल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे.