शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नरसिंहरावांचा पंतप्रधानपदाचा किस्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 05:18 IST

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत नरसिंह राव यांचीच नेतेपदी निवड झाली.

नवी दिल्ली : १९९१ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीला पी. व्ही. नरसिंह राव उभेच नव्हते. त्या निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत नरसिंह राव पंतप्रधान होतील, असे कोणालाच वाटले नव्हते.

निवडणुकांच्या काळातच राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यामुळे वातावरण बदलले आणि काँग्रेसला २४४ जागा मिळाल्या. म्हणजे बहुमतापेक्षा २९ कमी. पंतप्रधान कोण होणार, अशी चर्चा सुरू होती. एका गटाने शरद पवार यांचे नाव पुढे केले. त्याआधी महाराष्ट्रातील काही मंत्र्यांनी शरद पवार यांच्याविरोधात बंड केले होते. राजीव गांधी यांचाही पवार यांच्यावर विश्वास नसल्याचे बोलले जात होते. तरीही सुरेश कलमाडी यांनी पवार यांच्यासाठी लॉबिंग सुरू केले. विश्वंंभरदास मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी काँग्रेस खासदारांना बोलावून पवार यांना पाठिंबा देण्यासाठी सह्या गोळा करणे सुरू झाले. बऱ्याच खासदारांनी सह्या केल्या. काँग्रेसच्या कट्टर समर्थकांनी मात्र सह्या करण्यास नकारच दिला. शरद पवार यांनी निवडणूक लढवली नव्हती. बारामतीतून अजित पवार विजयी झाले होते. पण शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची इच्छा होती. काँग्रेस श्रेष्ठींनी नरसिंह राव यांना आंध्रातून बोलावून घेतले.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत नरसिंह राव यांचीच नेतेपदी निवड झाली. गांधी घराण्याशी असलेली निष्ठा हेच त्याचे कारण. ते पंतप्रधान झाले. त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री व शरद पवार यांना संरक्षणमंत्री केले. अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून राव यांनी बहुमतही सिद्ध केले. पुढे १९९३ साली राज्यात दंगली झाल्यानंतर राव यांनी पवार यांना पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवले.लोकसभेची १९९१ ची निवडणूक न लढवणारे पी. व््ही. नरसिंह राव हे पंतप्रधान होतील, हे काँग्रेसजनांनाही वाटले नव्हते. त्यांच्या निवडीने सर्वांनाच आश्चर्यच वाटले.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार