शहरं
Join us  
Trending Stories
1
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
2
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
3
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
4
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
5
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
6
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
7
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
8
'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट
9
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
10
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
11
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
12
Travel : लग्नानंतर मालदीवला फिरायला जायचा प्लॅन करताय? राहणं, खाणं आणि फिरण्यासाठी किती खर्च येईल?
13
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
14
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा
15
Zepto IPO ला मिळाला हिरवा झेंडा; शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर कंपनी तयार, केव्हा होणार लिस्टिंग?
16
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
17
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
18
"मला सवत आणलीस...", निमिष कुलकर्णीच्या लग्नानंतर शिवाली परबची प्रतिक्रिया चर्चेत
19
AUS vs ENG 2nd Test : आधी गोलंदाजीत कहर! मग अर्धशतकी खेळीसह मिचेल स्टार्कनं केली विक्रमांची 'बरसात'
20
इन्कम टॅक्स नंतर आता 'या' मोठ्या बदलावर सरकारचा फोकस; अर्थमंत्र्यांनी दिले संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नरसिंहरावांचा पंतप्रधानपदाचा किस्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 05:18 IST

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत नरसिंह राव यांचीच नेतेपदी निवड झाली.

नवी दिल्ली : १९९१ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीला पी. व्ही. नरसिंह राव उभेच नव्हते. त्या निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत नरसिंह राव पंतप्रधान होतील, असे कोणालाच वाटले नव्हते.

निवडणुकांच्या काळातच राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यामुळे वातावरण बदलले आणि काँग्रेसला २४४ जागा मिळाल्या. म्हणजे बहुमतापेक्षा २९ कमी. पंतप्रधान कोण होणार, अशी चर्चा सुरू होती. एका गटाने शरद पवार यांचे नाव पुढे केले. त्याआधी महाराष्ट्रातील काही मंत्र्यांनी शरद पवार यांच्याविरोधात बंड केले होते. राजीव गांधी यांचाही पवार यांच्यावर विश्वास नसल्याचे बोलले जात होते. तरीही सुरेश कलमाडी यांनी पवार यांच्यासाठी लॉबिंग सुरू केले. विश्वंंभरदास मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी काँग्रेस खासदारांना बोलावून पवार यांना पाठिंबा देण्यासाठी सह्या गोळा करणे सुरू झाले. बऱ्याच खासदारांनी सह्या केल्या. काँग्रेसच्या कट्टर समर्थकांनी मात्र सह्या करण्यास नकारच दिला. शरद पवार यांनी निवडणूक लढवली नव्हती. बारामतीतून अजित पवार विजयी झाले होते. पण शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची इच्छा होती. काँग्रेस श्रेष्ठींनी नरसिंह राव यांना आंध्रातून बोलावून घेतले.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत नरसिंह राव यांचीच नेतेपदी निवड झाली. गांधी घराण्याशी असलेली निष्ठा हेच त्याचे कारण. ते पंतप्रधान झाले. त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री व शरद पवार यांना संरक्षणमंत्री केले. अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून राव यांनी बहुमतही सिद्ध केले. पुढे १९९३ साली राज्यात दंगली झाल्यानंतर राव यांनी पवार यांना पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवले.लोकसभेची १९९१ ची निवडणूक न लढवणारे पी. व््ही. नरसिंह राव हे पंतप्रधान होतील, हे काँग्रेसजनांनाही वाटले नव्हते. त्यांच्या निवडीने सर्वांनाच आश्चर्यच वाटले.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार