शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

नरसिंहरावांचा पंतप्रधानपदाचा किस्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 05:18 IST

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत नरसिंह राव यांचीच नेतेपदी निवड झाली.

नवी दिल्ली : १९९१ सालच्या लोकसभेच्या निवडणुकीला पी. व्ही. नरसिंह राव उभेच नव्हते. त्या निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत नरसिंह राव पंतप्रधान होतील, असे कोणालाच वाटले नव्हते.

निवडणुकांच्या काळातच राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यामुळे वातावरण बदलले आणि काँग्रेसला २४४ जागा मिळाल्या. म्हणजे बहुमतापेक्षा २९ कमी. पंतप्रधान कोण होणार, अशी चर्चा सुरू होती. एका गटाने शरद पवार यांचे नाव पुढे केले. त्याआधी महाराष्ट्रातील काही मंत्र्यांनी शरद पवार यांच्याविरोधात बंड केले होते. राजीव गांधी यांचाही पवार यांच्यावर विश्वास नसल्याचे बोलले जात होते. तरीही सुरेश कलमाडी यांनी पवार यांच्यासाठी लॉबिंग सुरू केले. विश्वंंभरदास मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी काँग्रेस खासदारांना बोलावून पवार यांना पाठिंबा देण्यासाठी सह्या गोळा करणे सुरू झाले. बऱ्याच खासदारांनी सह्या केल्या. काँग्रेसच्या कट्टर समर्थकांनी मात्र सह्या करण्यास नकारच दिला. शरद पवार यांनी निवडणूक लढवली नव्हती. बारामतीतून अजित पवार विजयी झाले होते. पण शरद पवार यांची पंतप्रधान होण्याची इच्छा होती. काँग्रेस श्रेष्ठींनी नरसिंह राव यांना आंध्रातून बोलावून घेतले.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत नरसिंह राव यांचीच नेतेपदी निवड झाली. गांधी घराण्याशी असलेली निष्ठा हेच त्याचे कारण. ते पंतप्रधान झाले. त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री व शरद पवार यांना संरक्षणमंत्री केले. अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवून राव यांनी बहुमतही सिद्ध केले. पुढे १९९३ साली राज्यात दंगली झाल्यानंतर राव यांनी पवार यांना पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवले.लोकसभेची १९९१ ची निवडणूक न लढवणारे पी. व््ही. नरसिंह राव हे पंतप्रधान होतील, हे काँग्रेसजनांनाही वाटले नव्हते. त्यांच्या निवडीने सर्वांनाच आश्चर्यच वाटले.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार