शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

मुस्लिमांविरोधातील हिंसाचार थांबवा; १०८ माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे पंतप्रधानांना खुले पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 06:59 IST

भाजपशासित राज्यांतील हिंसाचारामुळे फक्त मुस्लिम नव्हे तर, राज्यघटनेचीही होरपळ होत आहे

नवी दिल्ली : भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये अल्पसंख्याक विशेषत: मुस्लिमांच्या विरोधात हिंसाचार सुरू असून, ती स्थिती चिंताजनक आहे. हा हिंसाचार संपुष्टात आणावा, अशी मागणी १०८ माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या एका खुल्या पत्रात केली आहे. या अधिकाऱ्यांमध्ये ज्युलिओ रिबेरो, मीरा बोरवणकर, रवी बुद्धिराजा, व्ही. पी. राजा आदी मान्यवरांचा समावेश आहे.

या माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोदी यांना लिहिलेल्या तीन पानी पत्रात म्हटले आहे की, भाजपशासित राज्यांतील हिंसाचारामुळे फक्त मुस्लिम नव्हे तर, राज्यघटनेचीही होरपळ होत आहे. राज्यघटनेच्या मूळ ढाच्याला धक्का लावण्याचे प्रयत्न होत आहेत. ही घटना आपल्या देशातील दिग्गजांनी तयार केली आहे. तिचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. मात्र त्याच्या विपरीत स्थिती निर्माण झाली असून, त्याबद्दल आवाज उठविणे आवश्यक आहे. आम्ही माजी सनदी अधिकारी आहोत. त्यामुळे सातत्याने मतप्रदर्शन करत नाही. राज्यघटनेला धक्का लावण्याचे प्रयत्न होत असतील तर त्याबद्दल बोलणे आवश्यक आहे. 

विविधतेतील एकतेला धोकाया पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत आणि महिन्यांमध्ये आसाम, दिल्ली, गुजरात, हरयाणा, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये मुस्लिम समाजाविरोधात हिंसक घटना घडत आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMuslimमुस्लीम