शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा रद्द करा! केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं राहुल गांधी यांना पत्र, कारणही सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 11:14 IST

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून 'भारत जोडो यात्रा' रद्द करण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली-

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून 'भारत जोडो यात्रा' रद्द करण्याची मागणी केली आहे. भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं कडक पालन केलं जावं आणि प्रोटोकॉलचं पालन करणं जमत नसेल तर यात्रा देशाचं हित पाहून यात्रा स्थगित करा, असं मनसुख मांडविय यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 

"राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावं. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केला जावा. तसंच केवळ कोरोना लसीकरण पूर्ण केलेलेच लोक यात्रेत सहभागी होतील याची दक्षता घ्यावी. तसंच यात्रेत सामील होण्याआधी आणि नंतर लोकांचं आयसोलेशन केलं जावं", असं मनसुख मांडविय यांनी पत्रात नमूद केलं आहे. तसंच कोरोना प्रोटोकॉलचं पालन करणं शक्य नसेल तर पब्लिक हेल्थ इमर्जंन्सीची स्थिती लक्षात घेऊन कोरोना महामारीपासून देशाला वाचवण्यासाठी भारत जोडो यात्रा देशहितासाठी स्थगित करावी असंही मांडविय यांनी राहुल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. आता राहुल गांधी यावर काय प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

राजस्थानच्या खासदारांनी केली होती तक्रारराजस्थानचे खासदार पीपी चौधरी, निहाल चंद, देवची पटेल यांनी आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांना पत्र लिहून भारत जोडो यात्रेत कोरोना महामारीचा प्रसार होत असल्याची तक्रार केली होती. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून राजस्थानमध्ये सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. यात देशातील विविध राज्यांचे लोक सहभागी होत आहे. दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांकडून राजस्थानात कोरोना प्रसाराचा धोका आहे. तसंच यात्रेत सामील होणाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं देखील आढळून आली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू देखील यात्रेतून माघारी परतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रा रद्द केली जावी, अशी मागणी खासदारांनी केली आहे. 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcorona virusकोरोना वायरस बातम्या