शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रा रद्द करा! केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं राहुल गांधी यांना पत्र, कारणही सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 11:14 IST

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून 'भारत जोडो यात्रा' रद्द करण्याची मागणी केली आहे.

नवी दिल्ली-

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहून 'भारत जोडो यात्रा' रद्द करण्याची मागणी केली आहे. भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं कडक पालन केलं जावं आणि प्रोटोकॉलचं पालन करणं जमत नसेल तर यात्रा देशाचं हित पाहून यात्रा स्थगित करा, असं मनसुख मांडविय यांनी राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 

"राजस्थानमध्ये सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावं. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केला जावा. तसंच केवळ कोरोना लसीकरण पूर्ण केलेलेच लोक यात्रेत सहभागी होतील याची दक्षता घ्यावी. तसंच यात्रेत सामील होण्याआधी आणि नंतर लोकांचं आयसोलेशन केलं जावं", असं मनसुख मांडविय यांनी पत्रात नमूद केलं आहे. तसंच कोरोना प्रोटोकॉलचं पालन करणं शक्य नसेल तर पब्लिक हेल्थ इमर्जंन्सीची स्थिती लक्षात घेऊन कोरोना महामारीपासून देशाला वाचवण्यासाठी भारत जोडो यात्रा देशहितासाठी स्थगित करावी असंही मांडविय यांनी राहुल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. आता राहुल गांधी यावर काय प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

राजस्थानच्या खासदारांनी केली होती तक्रारराजस्थानचे खासदार पीपी चौधरी, निहाल चंद, देवची पटेल यांनी आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांना पत्र लिहून भारत जोडो यात्रेत कोरोना महामारीचा प्रसार होत असल्याची तक्रार केली होती. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून राजस्थानमध्ये सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. यात देशातील विविध राज्यांचे लोक सहभागी होत आहे. दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या नागरिकांकडून राजस्थानात कोरोना प्रसाराचा धोका आहे. तसंच यात्रेत सामील होणाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं देखील आढळून आली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू देखील यात्रेतून माघारी परतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रा रद्द केली जावी, अशी मागणी खासदारांनी केली आहे. 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcorona virusकोरोना वायरस बातम्या