शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

ठरावांच्या मंजुरीवरून स्थायीत खडाजंगी

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

दर करार की ई-निविदा? - संभ्रम कायम

दर करार की ई-निविदा? - संभ्रम कायम
नाशिक : ठरावाची अंमलबजावणी आणि ठरावांच्या मंजुरीवरून जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत अध्यक्ष विजयश्री चुंबळे व उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्यात तू तू मै मै झाली. झालेल्या ठरावानुसारच इतिवृत्त मंजूर करण्यात आल्याचा दावा चुंबळे यांनी केला, तर ठराव एक आणि इतिवृत्तात भलतेच असल्याचा आरोप वडजे यांनी केला.
दुपारी एक वाजता बोलावलेली स्थायी समितीची सभा चार तासांच्या दीर्घ विलंबानंतर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झाली. सभेच्या सुरुवातीलाच जिल्हा कृषी विकास अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे यांनी टंचाईग्रस्त शेतकर्‍यांसाठी ३०१ कोटी ६७ लाखांचे अनुदान प्राप्त झाले असून, ते थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात येत असल्याचे सांगितले, तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेंद्र महाले यांनी विभागीय आयुक्तांचे पत्र प्राप्त झाले असून, त्यानुसार जलयुक्त शिवार अभियानासाठी सेसच्या निधीतून ७ ते १० टक्के निधी राखून ठेवण्याबाबतची सूचना करण्यात आल्याचे सांगितले. त्यावर उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी हा निधी खर्च करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला असताना हे पत्र बंधनकारक आहे काय, असे विचारले असता महाले यांनी आयुक्तांचे पत्र विनंती स्वरूपाचे असल्याचे सांगितले. प्रकाश वडजे यांनीच ठराव क्रमांक २९४ ची नेमकी अंमलबजावणी काय केली? हा ठराव कसा करण्यात आला? ठरावावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची स्वाक्षरी आहे काय? - असे एकामागून एक प्रश्न उपस्थित करीत कार्यकारी अभियंता गणेश मेहेरखांब यांना धारेवर धरलेे, तर अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी ठरावानुसारच स्थानिक स्तर विभागामार्फत बांधण्यात येणार्‍या देवळा तालुक्यातील उमराणे येथील दोन सीमेंट प्लग बंधारे बांधण्यास मान्यता देण्यात आल्याचे सांगितले. त्यावरून वडजे व चुंबळे यांच्यात काही वेळ शाब्दिक वाद झाले. विजयश्री चुंबळे यांनी यात चूक कार्यकारी अभियंता मेहेरखांब व सचिव संदीप माळोदे यांची असून, त्यांनी त्यात सुधारणा करण्याची सूचना केली, तर प्रकाश वडजे यांनी चुकीचा ठराव झाल्याचे नमूद केले. त्यावर प्रशांत देवरे यांनी सुधारित ठराव मांडला त्यास गोेरख बोडके यांनी अनुमोदन दिले. बैठकीस गटनेते प्रवीण जाधव, शैलेश सूर्यवंशी, बाळासाहेब गुंड, प्रशांत देवरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)