शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बेरोजगारी, महागाई, महिलांवर अत्याचार हेच 'मोदी है तो मुमकिन है'; प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 13:25 IST

आपल्याला न्यायाची लढाई लढायची आहे. भाजपापासून देशाला वाचविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल.

नवी दिल्ली - आज देशात असेल वा वृत्तपत्रात दिसतं की मोदी है तो मुमकिन है मात्र हे खरं आहे. मोदी आहेत म्हणून १०० रुपये किलो कांदा आहे, ४५ वर्षातील सर्वाधिक जास्त बेरोजगारी आहे. ४ कोटी युवक बेरोजगार आहे, १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असा टोला काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. काँग्रेसकडून रामलीला मैदानावर भारत बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात प्रियंका गांधी यांनी भाषण केले. 

यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, आपला देश विविध जाती-धर्माचा आहे, देशात आज जे वातावरण आहे त्याच्याविरोधात आपण आवाज उचलला नाही तर भविष्यात संविधान नष्ट केलं जाईल. धर्माच्या नावावर देशाचं विभाजन केले जाईल. आपल्याला या ताकदीपासून देशाला वाचवायचं आहे. या देशात प्रेम, अहिंसा, बंधुप्रेम आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच उन्नाव येथे झालेल्या पीडितेला जाळण्याचं काम केलं गेले. देशातील मुली सुरक्षित नाही, प्रत्येक माणसाला न्यायासाठी झगडावं लागतं. आपल्याला न्यायाची लढाई लढायची आहे. भाजपापासून देशाला वाचविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. नागरिकत्व सुधारणा विधेयक हे देशासाठी धोकादायक आहे. धर्माच्या नावावर देशाचं विभाजन केलं जात आहे. जे लोक आज आवाज उचलणार नाहीत त्यांना इतिहासात काही स्थान नसेल असं आवाहन प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना केलं. 

महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या, आर्थिक मंदी अशाविविध मुद्द्यावरुन प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केलं. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. मोदींनी जनतेला वचन दिले की २०२४ पर्यंत ते देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर आणतील. आता हे सिद्ध झाले की ही आश्वासने खोटी होती आणि त्यांनी देशातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी जे आश्वासने दिली होती ती ती पूर्ण करण्यात अपयशी ठरले अस आरोप त्यांनी केला.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाRapeबलात्कार