शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारी, महागाई, महिलांवर अत्याचार हेच 'मोदी है तो मुमकिन है'; प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 13:25 IST

आपल्याला न्यायाची लढाई लढायची आहे. भाजपापासून देशाला वाचविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल.

नवी दिल्ली - आज देशात असेल वा वृत्तपत्रात दिसतं की मोदी है तो मुमकिन है मात्र हे खरं आहे. मोदी आहेत म्हणून १०० रुपये किलो कांदा आहे, ४५ वर्षातील सर्वाधिक जास्त बेरोजगारी आहे. ४ कोटी युवक बेरोजगार आहे, १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असा टोला काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. काँग्रेसकडून रामलीला मैदानावर भारत बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात प्रियंका गांधी यांनी भाषण केले. 

यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, आपला देश विविध जाती-धर्माचा आहे, देशात आज जे वातावरण आहे त्याच्याविरोधात आपण आवाज उचलला नाही तर भविष्यात संविधान नष्ट केलं जाईल. धर्माच्या नावावर देशाचं विभाजन केले जाईल. आपल्याला या ताकदीपासून देशाला वाचवायचं आहे. या देशात प्रेम, अहिंसा, बंधुप्रेम आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच उन्नाव येथे झालेल्या पीडितेला जाळण्याचं काम केलं गेले. देशातील मुली सुरक्षित नाही, प्रत्येक माणसाला न्यायासाठी झगडावं लागतं. आपल्याला न्यायाची लढाई लढायची आहे. भाजपापासून देशाला वाचविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. नागरिकत्व सुधारणा विधेयक हे देशासाठी धोकादायक आहे. धर्माच्या नावावर देशाचं विभाजन केलं जात आहे. जे लोक आज आवाज उचलणार नाहीत त्यांना इतिहासात काही स्थान नसेल असं आवाहन प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना केलं. 

महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या, आर्थिक मंदी अशाविविध मुद्द्यावरुन प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केलं. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. मोदींनी जनतेला वचन दिले की २०२४ पर्यंत ते देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर आणतील. आता हे सिद्ध झाले की ही आश्वासने खोटी होती आणि त्यांनी देशातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी जे आश्वासने दिली होती ती ती पूर्ण करण्यात अपयशी ठरले अस आरोप त्यांनी केला.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाRapeबलात्कार