शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

बेरोजगारी, महागाई, महिलांवर अत्याचार हेच 'मोदी है तो मुमकिन है'; प्रियंका गांधी यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 13:25 IST

आपल्याला न्यायाची लढाई लढायची आहे. भाजपापासून देशाला वाचविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल.

नवी दिल्ली - आज देशात असेल वा वृत्तपत्रात दिसतं की मोदी है तो मुमकिन है मात्र हे खरं आहे. मोदी आहेत म्हणून १०० रुपये किलो कांदा आहे, ४५ वर्षातील सर्वाधिक जास्त बेरोजगारी आहे. ४ कोटी युवक बेरोजगार आहे, १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असा टोला काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींना लगावला आहे. काँग्रेसकडून रामलीला मैदानावर भारत बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात प्रियंका गांधी यांनी भाषण केले. 

यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, आपला देश विविध जाती-धर्माचा आहे, देशात आज जे वातावरण आहे त्याच्याविरोधात आपण आवाज उचलला नाही तर भविष्यात संविधान नष्ट केलं जाईल. धर्माच्या नावावर देशाचं विभाजन केले जाईल. आपल्याला या ताकदीपासून देशाला वाचवायचं आहे. या देशात प्रेम, अहिंसा, बंधुप्रेम आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच उन्नाव येथे झालेल्या पीडितेला जाळण्याचं काम केलं गेले. देशातील मुली सुरक्षित नाही, प्रत्येक माणसाला न्यायासाठी झगडावं लागतं. आपल्याला न्यायाची लढाई लढायची आहे. भाजपापासून देशाला वाचविण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल. नागरिकत्व सुधारणा विधेयक हे देशासाठी धोकादायक आहे. धर्माच्या नावावर देशाचं विभाजन केलं जात आहे. जे लोक आज आवाज उचलणार नाहीत त्यांना इतिहासात काही स्थान नसेल असं आवाहन प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांना केलं. 

महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या, आर्थिक मंदी अशाविविध मुद्द्यावरुन प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केलं. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. मोदींनी जनतेला वचन दिले की २०२४ पर्यंत ते देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सवर आणतील. आता हे सिद्ध झाले की ही आश्वासने खोटी होती आणि त्यांनी देशातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी जे आश्वासने दिली होती ती ती पूर्ण करण्यात अपयशी ठरले अस आरोप त्यांनी केला.  

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाRapeबलात्कार