शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

सतर्क राहा, पुढचे ४० दिवस महत्त्वाचे; जानेवारीत रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 06:05 IST

देशात जानेवारी महिन्याच्या मध्याला कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : आगामी ४० दिवस हे भारतासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत. देशात जानेवारी महिन्याच्या मध्याला कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचे केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी बुधवारी सांगितले. पूर्व आशियामध्ये कोरोनाची नवी लाट आली की तिचा प्रभाव भारतातही ३० ते ३५ दिवस राहतो, असे याआधी निदर्शनास आले होते. त्याच गोष्टीची पुनरावृत्ती आताही होऊ शकते.

भारतात समजा कोरोनाची नवी लाट आली तरी त्यांच्या संसर्गाची तीव्रता कमी असेल. त्यामुळे बाधितांना रुग्णालयात दाखल करण्याचे किंवा मृत्यूचे प्रमाणही कमी असणार आहे. गेल्या दोन दिवसांत विदेशातून भारतात आलेल्या सहा हजार प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील ३९ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. चीन व दक्षिण कोरियामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने केंद्र सरकार सतर्क झाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या