शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 11:45 IST

तब्बल १.७६ लाख कोटी रुपये पाठवले परदेशात

नवी दिल्ली: परदेशात शिक्षण घेण्यासाठी भारतीयांनी गेल्या १० वर्षात तब्बल १.७६ लाख कोटी रुपये परदेशात पाठवल्याची थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आरटीआयअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरानुसार, या प्रचंड रकमेचा वापर देशात नवीन शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी केला असता तर शिक्षणाचे चित्रच बदलले असते.

एका अहवालानुसार, एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) उभारण्यासाठी २०२५मध्ये सुमारे २,८२३ कोटी रुपये खर्च येतो. याचा अर्थ, गेल्या १० वर्षांत परदेशी शिक्षणावर खर्च झालेल्या १.७६ लाख कोटी रुपयांमध्ये भारतात तब्बल ६२ आयआयटी उभ्या राहू शकल्या असत्या.

काय सांगते आकडेवारी? 

केवळ २०२३-२४ या वर्षात भारतीयांनी परदेशातील शिक्षणासाठी २९,००० कोटी रुपये पाठवले. यातून १०पेक्षा अधिक आयआयटी उभारता आल्या असत्या. 

गेल्या १० वर्षांत परदेशी शिक्षणावर होणारा खर्च १,२०० टक्क्यांनी वाढला आहे. २०१४मध्ये हा आकडा फक्त २,४२९ कोटी रुपये होता, तोच खर्च २०२२-२३ मध्ये २९,१७१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. 

सरकारचे २०२५-२६ या वर्षासाठीचे परदेशातील उच्च शिक्षणाचे बजेट ५०,०७७.९५ कोटी रुपये आहे. मात्र, भारतीयांनी गेल्या १० वर्षांत परदेशी शिक्षणावर केलेला खर्च या बजेटच्या तिप्पट आहे.

देशातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

हे आकडे देशातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात.

टॅग्स :IndiaभारतEducationशिक्षण