शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

राज्यांना नागरिकत्व कायदा नाकारण्याचा अधिकार नाही, केंद्रातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 21:32 IST

राज्य सरकारांना नागरिकत्व संशोधन अधिनियम 2019ला नाकारण्याचा कोणताही अधिकार नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका उच्च अधिकाऱ्यानं केला आहे.

नवी दिल्लीः राज्य सरकारांना नागरिकत्व संशोधन अधिनियम 2019ला नाकारण्याचा कोणताही अधिकार नाही, असा दावा केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका उच्च अधिकाऱ्यानं केला आहे. घटनेच्या 7व्या अनुच्छेदामध्ये यासंदर्भात स्पष्ट करण्यात आल्याचाही त्या अधिकाऱ्यानं हवाला दिला आहे. राज्य सरकारांकडे हा कायदा नाकारण्याचा कोणताही अधिकार नाही. पश्चिम बंगाल, पंजाब, केरळ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांनी नागरिकत्व कायद्याला असंविधानिक असल्याचं सांगितलं होतं, त्यादरम्यान या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं हे विधान केल्यानं त्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, केंद्रीय कायद्याच्या चौकटीत येणारा प्रत्येक कायदा हा राज्य सरकारांना लागू करावाच लागतो, तो त्यांना नाकारता येत नाही. घटनेच्या 7व्या अनुच्छेदानुसार 97 गोष्टी येतात. संरक्षण, बाहेरची प्रकरणं, रेल्वे, नागरिकता अशा मुद्द्यांचा त्यात समावेश होतो. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन म्हणाले, असंवैधानिक कायद्याला आमच्या राज्यात कोणतंही स्थान नाही.तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, जाहीरनाम्यात विकासाच्या मुद्द्यांऐवजी तुम्ही देशाचं विभाजन करण्याचा उल्लेख केलेला आहे काय?, नागरिकत्व मिळण्यासाठी धर्माचा आधार कशासाठी पाहिजे?, मी याचा स्वीकार करणार नाही. मी या कायद्याला आव्हान देते. तुमच्याकडे आकडे असल्यामुळेच ते लोकसभा आणि राज्यसभेत विधेयक मंजूर करून घेऊ शकतात. पण आम्ही तुम्हाला देशाचं विभाजन करू देणार नाही. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी हा कायदा भारताच्या धर्मनिरपेक्षाच्या प्रतिमेला धक्का देणारा आहे. पंजाबमध्येही हा कायदा लागू होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर छत्तीसगडनंही हा कायदा लागू न करण्याचा निर्धार केला आहे.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक