शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणासाठी वटहुकूम, मंत्रिमंडळाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 06:19 IST

विद्यापीठ किंवा महाविद्यालय हे एकक मानून २०० अंकांच्या रोस्टरने आरक्षणाची पूर्वीची पद्धत पुन्हा लागू करण्यासाठी वटहुकूम काढण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली.

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणसंस्थांमध्ये अध्यापकांची पदे भरताना विद्यापीठ किंवा महाविद्यालय हे एकक मानून २०० अंकांच्या रोस्टरने आरक्षणाची पूर्वीची पद्धत पुन्हा लागू करण्यासाठी वटहुकूम काढण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. यामुळे अध्यापकांच्या सुमारे पाच हजार पदांची रखडलेली भरती सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे. हा वटहुकूम ‘केंद्रीय शिक्षण संस्था (अध्यापक कॅडरमधील आरक्षण) वटहुकूम, २०१९’ या नावाने ओळखला जाईल व राष्ट्रपतींची संमती मिळताच तो लागू होईल.केंद्रीय शिक्षणसंस्थांमध्ये अध्यापक पदांना आरक्षण लागू करताना विद्यापीठ किंवा महाविद्यालय हे एकक मानून त्यानुसार राखीव पदांची गणना करण्याचा नियमच पूर्वी लागू होता. मात्र, अलाहाबाद उच्च न्यायालयाने तो बेकायदा ठरवून रद्द केला व त्याऐवजी विषय किंवा विभाग हे एकक मानून आरक्षणाचे रोस्टर लागू करण्याचा आदेश दिला. याविरुद्ध मानवसंसाधन विकास मंत्रालयाने केलेले अपीलही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले. आता या वटहुकुमाने न्यायालयाचा हा निर्णय निष्प्रभ होईल व आरक्षणाची पूर्वीचीच पद्धत लागू करणे शक्य होईल.आरक्षणाच्या रोस्टरचा हा घोळ सुरू राहिल्याने केंद्रीय शिक्षणसंस्थांमधील अध्यापकांच्या सुमारे पाच हजार पदांची थेट सेवाभरती रखडली होती. आता ती विद्यापीठ किंवा कॉलेज या एककानुसार आरक्षण लागू करून केले जाईल. यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सामाजिक-आर्थिक दुर्बल घटकांसाठी योग्य आरक्षण मिळेल.शिवाय समाजाच्या सर्व स्तरांतील पात्र व बुद्धिमान उमेदवारांना संधी मिळून एकूणच शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होईल, अशी आशा या निर्णयानंतर सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात व्यक्त करण्यात आली.>राखीव जागा वाढतीलराखीव जागा एकूण पदांच्या ठराविक टक्केवारीत असतात. मुळात एकूण जागांची संख्या मोठी असली तर साहजिकच राखीव जागांची संख्याही मोठी येते. विद्यापीठ किंवा महाविद्यालय हे एकक मानून ठरणाऱ्या राखीव जागा विषय किंवा विभाग या एककानुसार येणाऱ्या राखीव जागांहून जास्तहोतात.न्यायालयाच्या निर्णयाने एकूण उपलब्ध राखीव जागा कमी होणार होत्या. त्यावरून मागासवर्गीय संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आंदोलनाचा इशरा दिला होता. त्यांना खुश करण्यासाठी आता हा वटहुकूम काढण्यात येत आहे.