शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणासाठी वटहुकूम, मंत्रिमंडळाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 06:19 IST

विद्यापीठ किंवा महाविद्यालय हे एकक मानून २०० अंकांच्या रोस्टरने आरक्षणाची पूर्वीची पद्धत पुन्हा लागू करण्यासाठी वटहुकूम काढण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली.

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणसंस्थांमध्ये अध्यापकांची पदे भरताना विद्यापीठ किंवा महाविद्यालय हे एकक मानून २०० अंकांच्या रोस्टरने आरक्षणाची पूर्वीची पद्धत पुन्हा लागू करण्यासाठी वटहुकूम काढण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. यामुळे अध्यापकांच्या सुमारे पाच हजार पदांची रखडलेली भरती सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे. हा वटहुकूम ‘केंद्रीय शिक्षण संस्था (अध्यापक कॅडरमधील आरक्षण) वटहुकूम, २०१९’ या नावाने ओळखला जाईल व राष्ट्रपतींची संमती मिळताच तो लागू होईल.केंद्रीय शिक्षणसंस्थांमध्ये अध्यापक पदांना आरक्षण लागू करताना विद्यापीठ किंवा महाविद्यालय हे एकक मानून त्यानुसार राखीव पदांची गणना करण्याचा नियमच पूर्वी लागू होता. मात्र, अलाहाबाद उच्च न्यायालयाने तो बेकायदा ठरवून रद्द केला व त्याऐवजी विषय किंवा विभाग हे एकक मानून आरक्षणाचे रोस्टर लागू करण्याचा आदेश दिला. याविरुद्ध मानवसंसाधन विकास मंत्रालयाने केलेले अपीलही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले. आता या वटहुकुमाने न्यायालयाचा हा निर्णय निष्प्रभ होईल व आरक्षणाची पूर्वीचीच पद्धत लागू करणे शक्य होईल.आरक्षणाच्या रोस्टरचा हा घोळ सुरू राहिल्याने केंद्रीय शिक्षणसंस्थांमधील अध्यापकांच्या सुमारे पाच हजार पदांची थेट सेवाभरती रखडली होती. आता ती विद्यापीठ किंवा कॉलेज या एककानुसार आरक्षण लागू करून केले जाईल. यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व सामाजिक-आर्थिक दुर्बल घटकांसाठी योग्य आरक्षण मिळेल.शिवाय समाजाच्या सर्व स्तरांतील पात्र व बुद्धिमान उमेदवारांना संधी मिळून एकूणच शैक्षणिक दर्जा सुधारण्यास मदत होईल, अशी आशा या निर्णयानंतर सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात व्यक्त करण्यात आली.>राखीव जागा वाढतीलराखीव जागा एकूण पदांच्या ठराविक टक्केवारीत असतात. मुळात एकूण जागांची संख्या मोठी असली तर साहजिकच राखीव जागांची संख्याही मोठी येते. विद्यापीठ किंवा महाविद्यालय हे एकक मानून ठरणाऱ्या राखीव जागा विषय किंवा विभाग या एककानुसार येणाऱ्या राखीव जागांहून जास्तहोतात.न्यायालयाच्या निर्णयाने एकूण उपलब्ध राखीव जागा कमी होणार होत्या. त्यावरून मागासवर्गीय संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आंदोलनाचा इशरा दिला होता. त्यांना खुश करण्यासाठी आता हा वटहुकूम काढण्यात येत आहे.