शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

पिकांच्या नुकसानीपोटी राज्याला मिळाले फक्त ६९.७६ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 06:47 IST

बोंडअळी तसेच अवकाळी पाऊस, वादळासह आदी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भभपाईपोटी महाराष्ट्राला राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक निधीतून (एनसीसीएफ) फक्त ६९.७६ कोटी रुपयेच मंजूर करण्यात आले आहेत.

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : बोंडअळी तसेच अवकाळी पाऊस, वादळासह आदी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भभपाईपोटी महाराष्ट्राला राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक निधीतून (एनसीसीएफ) फक्त ६९.७६ कोटी रुपयेच मंजूर करण्यात आले आहेत. महाराष्टÑ सरकारने केंद्राकडे ३३७३.३१ कोटींची भरपाई मागितली होती. राज्य सरकारने केंद्राला पाठविलेल्या दोन वेगवेगळ्या अहवालात भरपाईनिधीबाबत कमालीचा विरोधाभास असल्याने महाराष्टÑाच्या पदरात मागणीपेक्षा अत्यंत तोडका निधी पडला आहे.औरंगाबाद, जालना, बुलडाणा व अकोला या जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने शंभर टक्के भरपाईची मागणी केली होती; परंतु, वस्तुस्थितीच्या आकलनानुसार मागणीत तथ्य नसल्याचे आढळले. त्यामुळे केंद्र सरकारने ‘एनसीसीएफ’नुसार महाराष्टÑाच्या भरपाई निधीत कपात केली गेली, असे केंद्रीय कृषि मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले.महाराष्टÑ सरकारने पिकांच्या नुकसान भरपाईसंदर्भात सादर केलेल्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी केंद्रीय कृषि सचिव एस. के. पटनायक यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती स्थापन केली होती. या समितीने गृहमंत्र्याच्या नेतृत्वाखालील उच्चाधिकार समितीला अहवाल सादर केला होता. बोंडअळीने नोव्हेंबर-डिसेंबर २०१७ मध्ये कपाशी आणि २०१८ मध्ये धान पिकाच्या नुकसानीपोटी २४२५.५३ कोटींची भरपाई मागितली होती.कृषि मंत्रालयाच्या आक्षेपानंतर महाराष्टÑ सरकारने मार्च २०१८ मध्ये पुन्हा सुधारित अहवाल पाठविला. यात भरपाईची रक्कम वाढवून ३३७३.३१ कोटी नमूद करण्यात आली, असे या समितीने निदर्शनास आणून दिले.>१६,३३५ कोटींचा निधी मंजूरकपाशीचे जेवढे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले, तेवढे झालेले नाही, असे राज्य सरकारच्याच एका मंत्र्यांने स्पष्ट केले होते. कृषि मंत्रालयाच्या पाहणी पथकानेही महाराष्टÑातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना भेट दिली असता, खरीप हंगामात दोनदा कापूस वेचणी झाल्याचे निष्पन्न झाले होते. महाराष्ट्राला २०१७-१८ साठी महाराष्टÑाला राज्य आपत्ती निधीखाली १६३३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात केंद्राचा ७५ आणि राज्य सरकारचा २५ टक्के हिस्सा असतो.

टॅग्स :Farmerशेतकरी