शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

‘उमंग’च्या सुधारणेत राज्य सरकारांचा असहकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 03:45 IST

लोकांना एका क्लिकवर सरकारी खात्यांशी संपर्क साधता आला पाहिजे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शब्दांची आठवण ठेवून केंद्रीय माहिती तंत्रज्ञान खात्याने उमंग हे अ‍ॅप विकसित केले होते.

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : लोकांना एका क्लिकवर सरकारी खात्यांशी संपर्क साधता आला पाहिजे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शब्दांची आठवण ठेवून केंद्रीय माहिती तंत्रज्ञान खात्याने उमंग हे अ‍ॅप विकसित केले होते. मात्र, त्याचे कार्य हवे तितक्या वेगवान पद्धतीने होत नसल्याने त्यातील दोष दूर करून लोकसभा निवडणुकांआधी ते सुधारित स्वरूपात जनतेसमोर आणण्यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. मात्र, त्या प्रयत्नांना बिगरभाजपा व भाजपाशासित राज्य सरकारांकडूनही फारसे सहकार्य मिळत नसल्याचे चित्र आहे.केंद्र व राज्य सरकारच्या योजनांशी संबंधित सुमारे १,२०० सेवांची सुविधा उमंगमध्ये देण्यात येणार होती. त्यामुळे प्रत्येक सेवेसाठी वेगवेगळी अ‍ॅप वापरायची यापुढे लोकांना गरज उरणार नाही, असे सांगितले जात होते. मात्र, सध्या मंदगतीने चालणाऱ्या उमंगचे काम जलदगतीने व्हावे यासाठी चाललेल्या प्रयत्नांत केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी जातीने लक्ष घातले आहे.रविशंकर प्रसाद म्हणाले, वीज-पाण्याची बिले भरण्यापासून ते विद्यापीठाची फी, हाऊस टॅक्स, विविध स्पर्धा परीक्षांचे शुल्क आॅनलाईन भरण्याची सोय उमंग अ‍ॅपमध्येआहे.>मोदी सरकारला श्रेय मिळण्याची भीतीमाहिती तंत्रज्ञान खात्यातील एका अधिकाºयाने सांगितले की, उमंग अ‍ॅपवर आपल्या योजनांची माहिती व सेवा नसावी, असे काही राज्य सरकारांना वाटते. एकाच अ‍ॅपवरून सर्व योजनांची माहिती व सेवा मिळू लागल्या, तर त्याचा राजकीय लाभ मोदी सरकारला मिळेल, अशी भीती वाटल्याने आपल्या सेवांची माहिती या अ‍ॅपवर येऊ नये यासाठी ही राज्य सरकारे प्रयत्नशील आहेत.