शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

भूसंपादनानंतर जमिनीवर राज्य सरकारचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा निकाल, कुणीही ताबा घेणे हे अतिक्रमण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 06:10 IST

भूसंपादन कायद्यानुसार जमिनीचा मोबदला दिल्यानंतर या जमिनीवर सरकारचा अधिकार असतो, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

नवी दिल्ली :भूसंपादन कायद्यानुसार जमिनीचा मोबदला दिल्यानंतर या जमिनीवर सरकारचा अधिकार असतो, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. अलाहाबाद हायकोर्टाने याबाबत एका प्रकरणात निर्णय देताना म्हटले होते की, भूसंपादनानंतर जमिनीवर ताबा घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अनधिकृत अतिक्रमण करणारा समजला जाईल. याच निर्णयावर  सुप्रीम कोर्टाच्या पीठाने सहमती दर्शविली. 

उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ग्रेटर नोएडा औद्योगिक विकास प्राधिकरणकडून २ फेब्रुवारी रोजी जारी एका नोटिसीला आव्हान देण्यात आले होते. एका भूखंडावरील अतिक्रमण हटविण्यास सांगितले होते. 

हायकोर्टाने म्हटले की, भूसंपादन व निर्णयाला मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित जमीन सरकारच्या ताब्यात येते. उत्तर प्रदेश सरकारने सांगितले होते की, या जमिनीवर १९९६ मध्ये ताबा घेतला. महसूलच्या रेकॉर्डवरही त्यानुसार बदल करून घेण्यात आले; पण याचिकाकर्त्याने पुन्हा या जमिनीवर अतिक्रमण केले होते.

याचिका फेटाळली  ० न्यायालयाने स्पष्ट केले की, याचिकाकर्त्याची जमीन संपादित केली होती. ताबाही घेतला होता आणि भूसंपादन अधिनियम, १८९४ नुसार या जमिनीचा मोबदलाही दिला होता. ० याचिकाकर्त्याला ताबा घेणे, ताबा कायम ठेवण्याचा अधिकार नाही. भूसंपादनानंतर जमीन पूर्णपणे राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रात येते. ० हायकोर्टाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. आम्ही उच्च न्यायालयाच्या भूमिकेशी सहमत आहोत. त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात येत आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय