शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

४११ कोटींचे कर्जबुडवे फरार झाल्यावर स्टेट बँकेची तक्रार, ‘लॉकडाऊन’मुळे सीबीआय तपास थंडावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 01:51 IST

कर्ज बुडविल्याप्रकरणी ‘सीबीआय’कडे फिर्याद दाखल केली जाण्यापूर्वीच त्या कंपनीचे संचालक देश सोडून पसार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली : आखाती व युरोपीय देशांना बासमती तांदळाची निर्यात करणाऱ्या हरियाणातील एका कंपनीस स्टेट बँक आॅफ इंडियासह सहा सरकारी बँकांच्या ‘कन्सॉर्शियम’ने दिलेले ४११ कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याप्रकरणी ‘सीबीआय’कडे फिर्याद दाखल केली जाण्यापूर्वीच त्या कंपनीचे संचालक देश सोडून पसार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.मे. राम देव इंटरनॅशनल या कंपनीस स्टेट बँकेखेरीज कॅनरा बँक, युनियन बँक आॅफ इंडिया, आयडीबीआय, सेंट्रल बँक आॅफ इंडिया व कॉपोर्रेशन बँक या बँकांनी मिळून हे कर्ज दिले होते. यात स्टेट बँकेने दिलेल्या कजार्चा वाटा १७३ कोटी रुपयांचा होता. हे कर्ज २७ जानेवारी २०१६ रोजी बुड्त खात्यात टाकण्यात आले. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे यंदाच्या २० फेब्रुवारी रोजी स्टेट बँकेने या संदर्भात ‘सीबीआय’कडे फिर्याद दाखल केली.या कंपनीने हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यात आपल्या भाताच्या तीन गिरण्या, तांदळाची प्रतवारी व पॅकिंग करण्याची आठ केंद्रे व सौदी अरबस्तान व दुबईमध्ये कार्यालये असल्याची माहिती दिली होती. कर्ज बुडीत खात्यात गेल्यानंतर सात-आठ महिन्यांनी बँकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन तपासणी केली असता भात सडण्याच्या गिरणीतील सर्व यंत्रसामग्री तेथून हलविण्यात आली आहे.सीबीआयमधील सूत्रांनी सांगितले की, चौकशी केली असता या कर्जदार कंपनीचे प्रवर्तक संचालक नरेश कुमार, सुरेश कुमार व संगीता हे तिघेही फिर्याद दाखल होण्याच्या आधीच देशातून परागंदा झाल्याची माहिती मिळाली. फिर्याद दाखल झाल्यावर लगेचच ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्याने धाडी वगैरे टाकता आल्या नाहीत. आता कोर्टाकडून समन्स काढूनही आरोपी हजर झाले नाहीत तर पुढील कायदेशीर कारवाई करावी लागेल. 

टॅग्स :State Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाfraudधोकेबाजीIndiaभारत