शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राममंदिराचे काम लवकर सुरू करा - सुब्रमण्यम स्वामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 01:38 IST

पंतप्रधानांंना पत्र : सुप्रीम कोर्टाच्या परवानगीची गरज नाही, सरकारला कोणतीही संपत्ती ताब्यात घेण्याचा अधिकार

नितीन अग्रवाल नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे दुसरे पर्व सुरू होताच श्रीराम मंदिर उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजपचे वरिष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधानांंना पत्र लिहून मंदिर लवकर उभारण्याचे आवाहन केले आहे. यासाठी केंद्र सरकारला कोणाच्याही परवानगीची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयही याबाबत प्रश्न उपस्थित करू शकत नाही, असे स्वामी यांनी म्हटले आहे.

सरकारने सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी, हा चुकीचा कायदेशीर सल्ला आहे. नरसिंह राव यांनी त्या जमिनीचे राष्ट्रीयीकारण केले होते. तेव्हा अनुच्छेद ३००-अ तहत सर्वोच्च न्यायालय कोणताही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालय केवळ मोबादला ठरवू शकते. तेव्हा मंदिर उभारण्यासाठी आतापासूनच तयारी करण्यास सरकारपुढे कोणतीही अडचण नाही, असे स्वामी यांनी पत्रात म्हटले आहे.

चार पानी पत्रात त्यांनी म्हटले आहे की, राममंदिर उभारण्याचा मुद्दा महत्त्वपूर्ण आहे. सरकारने यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे (६७ एकरांपेक्षा जास्त) वादग्रस्त नसलेली जमीन परत मागितली आहे. सॉलिसिटर जनरल यांची याचिका चुकीची आहे. सरकारला आपल्या ताब्यातील जमीन सर्वोच्च न्यायालयाकडून परत मागण्याची गरज नाही. घटनेतील अनुच्छेद ३००-अ आणि भू-संपादनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सर्व निर्णयांचाही त्यांनी दाखला देत म्हटले आहे की, केंद्र सरकारला सार्वजनिक हितासाठी कोणतीही जमीन वा संपत्ती कब्जात घेण्याचा अधिकार आहे.

तत्कालीन नरसिंह राव सरकारच्या १९९३ च्या निर्णयाचा हवाला देत स्वामी यांनी या पत्रात म्हटले आहे की, सरकारने १९९३ मध्ये वादग्रस्त आणि वादग्रस्त नाही, अशा दोन्ही प्रकारच्या जमिनी कब्जात घेतल्या होत्या. १९९४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने ही कृती वैध ठरविली होती. त्यानंतर रामजन्मभूमी विश्वस्त समितीसोबत सर्व पक्षकारांनी सरकारी मोबदला मान्य केला. कायद्याबाबत मला असलेल्या माहितीनुसार सरकारला याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयासह कोणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही. तेव्हा सरकारने वेळ न दवडता अधिकाराचा वापर करून राममंदिरासाठी वादग्रस्त आणि वादग्रस्त नसलेले दोन्ही भूखंड द्यावेत.

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीRam Mandirराम मंदिर