शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

जतमध्ये खुल्या डाळिंब सौद्यांना प्रारंभ

By admin | Updated: December 5, 2015 00:41 IST

पतंगराव कदम : दुष्काळी उपाययोजनांकडे राज्य शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

जत : राज्यातील युती शासनाने दुष्काळी जनतेसाठी आजपर्यंत ठोस निर्णय घेऊन काहीच केले नाही. आमच्या कालावधित आघाडी शासनाने घेतलेले निर्णय कायम करून त्यांची अंमलबजावणी करावी, असे आदेश काढले आहेत, अशी माहिती माजी मंत्री व आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी दिली. ते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार जत येथे डाळिंब सौदा प्रारंभप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.जत तालुक्यात भयानक दुष्काळी परिस्थिती आहे. याची माहिती घेण्यासाठी व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी हिवाळी अधिवेशनानंतर दौरा केला जाणार आहे, असे सांगून डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, डाळिंब बाजाराचे सौदे खुल्या पद्धतीने होणार आहेत. यातून फसवाफसवी केली जाणार नाही. आठवड्यातून तीनवेळा सौदे केले जातील. याशिवाय शेतकऱ्यांना रोख पैसे दिले जाणार आहेत.जत तालुक्यात बाजार समितीच्या माध्यमातून परिवर्तन झाले आहे. निवडणूक प्रचारात आम्ही जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सहा महिन्याच्या आतच केली आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे व वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आणि जिल्हा कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहनशेठ कदम एकत्र बसून बाजार समितीच्या हिताचे निर्णय घेत आहेत. भविष्यात उमदी (ता. जत) येथे उपबाजार समिती, जत येथे शीतगृह बांधण्यासठी एकमताने निर्णय घेतले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. दुष्काळात शेतकऱ्यांना मदत म्हणून बाजार समितीने गरज असेल तेथे चारा छावणी सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, शासनाच्या आदेशाची वाट पाहू नये, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले की, जत बाजार समिती आता स्वयंपूर्ण झाली आहे. पाणी व माती परीक्षण प्रयोगशाळा जत येथे उभारण्यात येणार आहे. भविष्यात डाळिंब बियाणे पॅँकिंग करून ते परदेशात विक्रीसाठी पाठविण्याची व्यवस्था करून शासन शेती व्यवसाय निर्माण केला जाईल, असे त्यांनी सांगितले. विक्रम सावंत यावेळी म्हणाले की, शेतकरी व व्यापाऱ्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी बाजार समितीने जत तालुक्यात प्रथमच डाळिंब सौदे सुरू केले आहेत. उमदी येथे उपबाजार समिती निर्माण झाल्यास पूर्व भागातील शेतकऱ्यांची गैरसोय कमी होणार आहे. यावेळी वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, आकाराम मासाळ, पी. एम. पाटील, नामदेव बजबळकर, रायगोंडा बिराजदार सभापती संतोष पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. माजी आमदार उमाजी सनमडीकर, आप्पाराया बिराजदार, बाबासाहेब कोडग, मल्लेश कत्ती, पिराप्पा माळी, दिलीप सोलापुरे, नीलेश बामणे, सुजय शिंदे, मीनाक्षी आक्की, नीलाबाई कोळी, श्रीकांत शिंदे, जीवन पाटील, आय. जी. शेख आदी मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)आठवड्यात तीन सौदे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार जत येथे डाळिंब सौद्यास शुक्रवारी प्रारंभ झाला. डाळिंब बाजाराचे सौदे खुल्या पद्धतीने होणार आहेत. यातून फसवाफसवी केली जाणार नाही. आठवड्यातून तीनवेळा सौदे केले जातील. याशिवाय शेतकऱ्यांना रोख पैसे दिले जाणार आहेत.यामुळे डाळिंब विक्रीला प्रतिसाद मिळणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.