शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

किना-यावर उभे राहून लाटा बघू नका, समुद्रामध्ये उडी मारुन किनारा गाठा - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 13:11 IST

माझ्या सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. तरुणाईला कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडू नये यासाठी कौशल्य विकासाला सर्वात जास्त महत्व देत आहोत.

ठळक मुद्देकिना-यावर उभे राहून लाट बघू नका, समुद्रामध्ये उडी मारुन किनारा गाठा. भारतात प्रतिभेची अजिबात कमतरता नाही.

नवी दिल्ली, दि. 11 - माझ्या सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. तरुणाईला कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडू नये यासाठी कौशल्य विकासाला सर्वात जास्त महत्व देत आहोत. नोकरी मागणारा नाही तर, नोकरी देणारा तरुणवर्ग तयार झाला पाहिजे असे मोदी म्हणाले. स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागोमध्ये केलेल्या प्रसिद्ध भाषणाला आज 125 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने नवी दिल्लीत 'यंग इंडिया, न्यू इंडिया' थीमवर आधारीत विद्यार्थ्यांच्या परिषदेला मोदींनी  संबोधित केले. अपयशाशिवाय यश मिळत नाही. यशाचा रस्ता अपयश बनवत, म्हणून अपयशाला घाबरु नका. 

किना-यावर उभे राहून लाटा बघू नका, समुद्रामध्ये उडी मारुन किनारा गाठा. तरुणाईने नावीन्याचा शोध घेतला पाहिजे. भारतात प्रतिभेची अजिबात कमतरता नाही. आपल्या भाषणाता त्यांनी राष्ट्रपती भवनातील एका घटनेचे उदहारण दिले. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती असताना मी राष्ट्रपती भवनात विद्यार्थ्यांचा एक प्रकल्प पाहिला. त्या विद्यार्थ्यांनी कच-यामधून नवनिर्मितीचा प्रकल्प तयार केला होता. त्या मुलांच्या कल्पनाशक्तीचे मला खरोखर कौतुक वाटले. 

हा स्वच्छ भारताचा मोहिमेचा परिणाम होता असा मोदी म्हणाले. परराष्ट्र धोरणासंबंधी वन एशिया ही विवेकानंदांची संकल्पना होती. विश्व संकटात असताना त्याला मार्ग दाखवण्याची क्षमता वन एशियामध्ये आहे असे विवेकानंदांचे म्हणणे होते. आज 21 वे शतक आशियाचे खंडाचे असल्याची जगात चर्चा आहे असे मोदी म्हणाले. 

त्यांनी विद्यार्थी राजकारणावरही भाष्य केले. आज विद्यार्थी राजकारण ज्या दिशेने चालले आहे तो एक चिंतनाचा विषय आहे असे मोदी म्हणाले. कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका पार पाडल्यानंतर दुस-या दिवशी काय चित्र असते. सर्वत्र कच-याचा खच पडलेला असतो. आपण आपले महाविद्यालय, विद्यापीठ स्वच्छ करण्याची मोहिम कधी हाती घेतो का ? असा सवाल त्यांनी केला.

कॉलेजमध्ये जे वेगवेगळे डे साजरे होतात. त्यांना माझा विरोध नाही.  पण पंजाबच्या कॉलेजमध्ये कधी केरल डे साजरा होईल का ? जेव्हा एका राज्याचा दिवस दुस-या राज्यातल्या कॉलेजमध्ये साजरे होतील तेव्हा ख-या अर्थाने विविधतेली एकता अनुभवता येईल तसेच एक भारत, श्रेष्ठ भारत स्वप्नही साकार होईल असे मोदी म्हणाले. कल्पकतेशिवाय आयुष्य नाही, देशाची ताकत, गरज पूर्ण होईल असे काम करण्याचे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी