शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

किना-यावर उभे राहून लाटा बघू नका, समुद्रामध्ये उडी मारुन किनारा गाठा - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 13:11 IST

माझ्या सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. तरुणाईला कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडू नये यासाठी कौशल्य विकासाला सर्वात जास्त महत्व देत आहोत.

ठळक मुद्देकिना-यावर उभे राहून लाट बघू नका, समुद्रामध्ये उडी मारुन किनारा गाठा. भारतात प्रतिभेची अजिबात कमतरता नाही.

नवी दिल्ली, दि. 11 - माझ्या सरकारने कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. तरुणाईला कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडू नये यासाठी कौशल्य विकासाला सर्वात जास्त महत्व देत आहोत. नोकरी मागणारा नाही तर, नोकरी देणारा तरुणवर्ग तयार झाला पाहिजे असे मोदी म्हणाले. स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागोमध्ये केलेल्या प्रसिद्ध भाषणाला आज 125 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने नवी दिल्लीत 'यंग इंडिया, न्यू इंडिया' थीमवर आधारीत विद्यार्थ्यांच्या परिषदेला मोदींनी  संबोधित केले. अपयशाशिवाय यश मिळत नाही. यशाचा रस्ता अपयश बनवत, म्हणून अपयशाला घाबरु नका. 

किना-यावर उभे राहून लाटा बघू नका, समुद्रामध्ये उडी मारुन किनारा गाठा. तरुणाईने नावीन्याचा शोध घेतला पाहिजे. भारतात प्रतिभेची अजिबात कमतरता नाही. आपल्या भाषणाता त्यांनी राष्ट्रपती भवनातील एका घटनेचे उदहारण दिले. प्रणव मुखर्जी राष्ट्रपती असताना मी राष्ट्रपती भवनात विद्यार्थ्यांचा एक प्रकल्प पाहिला. त्या विद्यार्थ्यांनी कच-यामधून नवनिर्मितीचा प्रकल्प तयार केला होता. त्या मुलांच्या कल्पनाशक्तीचे मला खरोखर कौतुक वाटले. 

हा स्वच्छ भारताचा मोहिमेचा परिणाम होता असा मोदी म्हणाले. परराष्ट्र धोरणासंबंधी वन एशिया ही विवेकानंदांची संकल्पना होती. विश्व संकटात असताना त्याला मार्ग दाखवण्याची क्षमता वन एशियामध्ये आहे असे विवेकानंदांचे म्हणणे होते. आज 21 वे शतक आशियाचे खंडाचे असल्याची जगात चर्चा आहे असे मोदी म्हणाले. 

त्यांनी विद्यार्थी राजकारणावरही भाष्य केले. आज विद्यार्थी राजकारण ज्या दिशेने चालले आहे तो एक चिंतनाचा विषय आहे असे मोदी म्हणाले. कॉलेजमध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका पार पाडल्यानंतर दुस-या दिवशी काय चित्र असते. सर्वत्र कच-याचा खच पडलेला असतो. आपण आपले महाविद्यालय, विद्यापीठ स्वच्छ करण्याची मोहिम कधी हाती घेतो का ? असा सवाल त्यांनी केला.

कॉलेजमध्ये जे वेगवेगळे डे साजरे होतात. त्यांना माझा विरोध नाही.  पण पंजाबच्या कॉलेजमध्ये कधी केरल डे साजरा होईल का ? जेव्हा एका राज्याचा दिवस दुस-या राज्यातल्या कॉलेजमध्ये साजरे होतील तेव्हा ख-या अर्थाने विविधतेली एकता अनुभवता येईल तसेच एक भारत, श्रेष्ठ भारत स्वप्नही साकार होईल असे मोदी म्हणाले. कल्पकतेशिवाय आयुष्य नाही, देशाची ताकत, गरज पूर्ण होईल असे काम करण्याचे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी