शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

बिहारमध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नानादरम्यान चेंगराचेंगरी, तीन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 11:08 IST

बिहारच्या बेगूसरायमध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नानादरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली आहे.

ठळक मुद्देबिहारच्या बेगूसरायमध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नानादरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली आहे.सिमरियामध्ये कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने गंगास्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात.

पाटणा- बिहारच्या बेगूसरायमध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगास्नानादरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर दहा जण जखमी झाले आहेत. सिमरियामध्ये कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने गंगास्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करतात. याचदरम्यान काही अफवा पसरून मोठी चेंगराचेंगरी झाली. गंगाघाटावर होणारी लोकांची गर्दी पाहता प्रशासनाकडून आवश्यक सोयीसुविधा करण्यात आल्या नसल्याचा आरोप होतो आहे. ही दुर्घटना शनिवार सकाळी  घडली. या चेंगराचेंगरीत किमान १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येतं. सर्वांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. सिमारिया घाटावर अर्ध कुंभ सुरू आहे. कार्तिक पौर्णिमेसाठी तिथे भाविकांची मोठी गर्दी झाली असून त्याचवेळी ही दुर्घटना घडली

 

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये दोन वृद्ध महिलांचा समावेश आहे. लोकांनी या चेंगराचेंगरीसाठी पोलीस प्रशासनाला जबाबदार धरलं आहे. पोलिसांची व्यवस्था कुचकामी ठरल्याने ही घटना घडल्याचं उपस्थितांचं म्हणणं आहे. प्रशासनाने गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी कुठलिही व्यवस्था केली नसल्याचं उपस्थितांनी सांगितलं आहे.  

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रूपयांची मदर जाहीर केली आहे.