शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

८०० रेल्वे प्रवाशांचे वाचवले होते प्राण… आता केंद्र सरकारकडून होणार गौरव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:17 IST

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकार दरवर्षी रेल्वे क्षेत्रात विविध स्तरावर चांगले काम करणाऱ्या १०० जणांना अति विशिष्ट रेल सेवा पुरस्काराने सन्मानित करते. 

नवी दिल्ली : भारतात रेल्वे हे सर्वात मोठे वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे सर्व रेल्वे गाड्यांमध्ये सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अगदी थोडीशी चूकही अनपेक्षित अपघात आणि जीवितहानी होऊ शकते. अशा परिस्थितीत रेल्वे कर्मचारी खूप सतर्क असतात. त्यानुसार त्यांचे कार्य असते. दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकार दरवर्षी रेल्वे क्षेत्रात विविध स्तरावर चांगले काम करणाऱ्या १०० जणांना अति विशिष्ट रेल सेवा पुरस्काराने सन्मानित करते. 

यंदाही या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यात केंद्र सरकारने तामिळनाडूमधील श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्टर जफर अली यांना पुरस्कार जाहीर केला आहे. जफर अली यांनी  गेल्या वर्षी आलेल्या पुरातून जवळपास ८०० लोकांचे प्राण वाचवले होते. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवी हे २१ डिसेंबर रोजी साजरा होणारा अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार-२०२४ प्रदान करतील. दरम्यान, गेल्या वर्षी १७ डिसेंबर २०२३ रोजी मिक जॅम चक्रीवादळामुळे अचानक पूर आला होता. तिरुनेलवेली, तुतीकोरिन आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला होता. 

अशा स्थितीत सेंचर एक्सप्रेस ट्रेन नेहमीप्रमाणे तिरुचेंदूरहून चेन्नईसाठी रवाना झाली. ही ट्रेन श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर पोहोचली. त्यानंतर स्टेशन मास्टर जफर अली यांना अभियांत्रिकी अधिकाऱ्याकडून रेल्वे लाईन पुराच्या पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे स्टेशन मास्टर जफर अली यांनी तातडीने श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबवली होती. मुसळधार पाऊस आणि सर्वत्र अंधारामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने बराच वेळ ट्रेन एकाच ठिकाणी थांबल्याने संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्टर जफर अली यांच्याशी वादही घातला. 

अशा परिस्थितीत दुसरा दिवस उजाडला, तेव्हा रेल्वे स्थानकात सर्वत्र पाणी तुंबलेले पाहून सर्व प्रवासी आश्चर्यचकित झाले. जवळपास २ दिवस ट्रेन एका जागी उभी होती. आजूबाजूच्या गावकऱ्यांनी त्यांना अन्न व पाणी पुरवले. पूरसदृश परिस्थितीमुळे बचाव पथक सुमारे तीन दिवसांनी श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर पोहोचले. वेळेवर ट्रेन थांबवल्याने ८०० प्रवाशांचे प्राण वाचले. यानंतर स्टेशन मास्तर जफर अली यांचे विविध पक्षांकडून कौतुक करण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेTamilnaduतामिळनाडू