शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
2
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
3
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
4
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
5
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
6
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
7
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
8
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
9
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
10
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
11
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
12
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
13
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
14
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
15
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
16
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
17
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
18
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
19
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
20
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग

‘भारत जोडो’वर गुप्तचरची करडी नजर; काँग्रेसकडून हरयाणामध्ये तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 06:16 IST

केंद्र सरकारने ‘भारत जोडो यात्रा’ बदनाम करण्यासाठी व रोखण्यासाठी गुप्तचर अधिकाऱ्यांचा वापर करत आहेत, असा आरोप काँग्रेसने केला.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: केंद्र सरकारने ‘भारत जोडो यात्रा’ बदनाम करण्यासाठी व रोखण्यासाठी आधी निवडणूक आयोग व राष्ट्रीय बाल हक्क आयोग (एनसीपीसीआर) यासारख्या घटनात्मक संस्थांचा वापर केला व आता ते गुप्तचर अधिकाऱ्यांचा वापर करत आहेत, असा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. याप्रकरणी पक्षाने हरयाणातील सोहना पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘भारत जोडो’ यात्रेला बदनाम करण्यासाठी सरकारने घटनात्मक आणि कायदेशीर संस्थांचा वापर केला. आम्हाला निवडणूक आयोग व एनसीपीसीआर यांच्याकडून नोटिसा मिळाल्या. आम्ही तपशीलवार उत्तर दिले. ‘जेव्हा पंतप्रधानांनी गुजरात विधानसभेच्या प्रचारासाठी एका लहान मुलीचा वापर केला. आम्ही ते निवडणूक आयोग व एनसीपीसीआर यांच्या निदर्शनास आणून दिले, तेव्हा कोणतीही कारवाई झाली नाही,’ असे ते म्हणाले.

काँग्रेस म्हणते...

रमेश म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी हरयाणा सरकारचे काही अधिकारी यात्रेतील लोकांच्या विश्रांतीसाठी असलेल्या कंटेनरमध्ये आढळले होते. काय करत आहात असे विचारले असता त्यांनी स्वच्छतागृहाचा वापर करत असल्याचे सांगितले. ते हरयाणा सरकारचे गुप्तचर अधिकारी असल्याचे आम्हाला समजले आहे. दुहेरी इंजिनचे सरकार आहे. त्यामुळे हे सर्व वरून विचारल्यावर झाले असावे.’

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस