शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

क्रीडा मंत्रालयाचा डाव; कुस्ती महासंघ चितपट, नियमांचे पालन न केल्याने बरखास्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 05:54 IST

तीनच दिवसांत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ): तीनच दिवसांपूर्वी निवडून आलेल्या भारतीय कुस्ती महासंघाची (डब्ल्यूएफआय) कार्यकारिणी क्रीडा मंत्रालयाने पुढील आदेशापर्यंत बरखास्त केली. नवनिर्वाचित कार्यकारिणीने डब्ल्यूएफआयच्या घटनेचे पालन केले नाही. तसेच कुस्तीपटूंना तयारीसाठी पुरेसा वेळ न देता १५ आणि २० वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची घाईघाईने घोषणा केली होती, असा ठपका क्रीडा मंत्रालयाने ठेवला.

नवी कार्यकारिणी पूर्णपणे माजी पदाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे, जे राष्ट्रीय क्रीडासंहितेनुसार योग्य नाही. कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे विश्वासू संजय सिंह यांच्या पॅनलने विजय मिळविल्यावर त्याच दिवशी १५ आणि २० वर्षांखालील राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा उत्तर प्रदेशच्या नंदिनीनगरमध्ये घेण्याची घोषणा केली. ही घोषणा घाईघाईने करण्यात आली असून कुस्तीपटूंना पुरेशी सूचना न देता निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.

नव्या कार्यकारिणीने ब्रिजभूषण यांच्या बंगल्याच्या आवारातून काम सुरू केले आहे. याच ठिकाणी पूर्वीचे पदाधिकारी काम करत होते, तेथेच लैंगिक छळ झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत. नवी कार्यकारिणी माजी पदाधिकाऱ्यांच्या पूर्ण नियंत्रणाखाली आहे.  अध्यक्षांकडून होणारा मनमानीपणा दिसून येतो, असाही ठपका ठेवण्यात आला.

खेळाडूंनी केला होता निषेध

संजय सिंह हे कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी निवडून आल्याच्या निषेधार्थ कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्तीची, तर बजरंग पुनिया, वीरेंद्र सिंह यांनी पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली होती.  

कामकाजासाठी नवी समिती

भारतीय कुस्ती महासंघ निलंबित केल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघाला (आयओए) तातडीने निष्पक्ष समिती स्थापन करण्यास सांगितले. आयओएच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, डब्ल्यूएफआयच्या माजी पदाधिकाऱ्यांमुळे निर्माण झालेली सद्य:स्थिती पाहता महासंघाच्या प्रशासन आणि अखंडतेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. कुस्तीपटूंचे नुकसान होऊ नये यासाठी आयओएने तातडीने पावले उचलावीत.

मी निवृत्ती घेतली आहे...

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसह इतर अनेक जबाबदाऱ्या त्यांच्याकडे असल्याने त्यांनी महासंघातून निवृत्ती घेतली आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीनंतर ब्रिजभूषण यांनी ही टिप्पणी केली.

नव्याने निवडणुका घ्याव्यात...

द्रोणाचार्य पुरस्कार विजेते महावीर फोगाट म्हणाले की, या निर्णयामुळे खेळाडूंचे मनोबल वाढेल. सर्व राज्य संघटना बरखास्त करून नव्याने निवडणुका घ्याव्यात.

साक्षीने केले निर्णयाचे स्वागत 

क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयावर साक्षी मलिक म्हणाली की, काहीतरी चांगले घडण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. आम्ही कोणत्या उद्देशाने लढत आहोत हे सरकारला समजेल, अशी आशा आहे. 

पुरस्कार परत घेणार नाही : पुनिया  

पद्मश्री पुरस्कार परत करणारे बजरंग पुनिया म्हणाले, मी पुरस्कार परत घेणार नाही. आपल्या बहिणी आणि मुलींचा सन्मान हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा आहे. न्याय मिळाल्यानंतरच त्याबाबत निर्णय घेईल. 

टॅग्स :Wrestlingकुस्तीCentral Governmentकेंद्र सरकारbrij bhushan sharan singhब्रिजभूषण शरण सिंह