शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

पंडित नेहरु, इंदिरा गांधी अन् राजीव गांधींचा विशेष उल्लेख; मोदींनी भाषणात काय म्हटलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 12:14 IST

आज सर्वांचे कौतुक करण्याची वेळ आहे. सर्वांनी या सभागृहाला समृद्ध करण्यासाठी आणि देशातील सामान्य नागरिकांचा आवाज उठवण्याचे काम केले असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

नवी दिल्ली – संसदेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. ५ दिवसीय अधिवेशनाचा पहिला दिवस जुन्या संसदेतील शेवटचा दिवस ठरणार आहे. उद्यापासून संसदेचे कामकाज नव्या इमारतीतून सुरू केले जाईल. संसदेच्या या भावनिक क्षणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या संसद सभागृहाबद्दल अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी भाषणात पंतप्रधान मोदींनी पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचा विशेष उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पंडित नेहरू यांची प्रारंभिक मंत्रिपरिषद होती. बाबासाहेब आंबेडकर कायदेमंत्री होते. जगातील सर्वोत्तम संविधान निर्माण करण्यासाठी त्यांनी पाऊल उचलले. नेहरूंच्या कारकिर्दीत वॉटर पॉलिसी बनवण्यासाठी योगदान दिले. बाबासाहेबांनी सामाजिक न्यायासाठी सातत्याने प्रयत्न केले. लाल बहादुर शास्त्री यांनी १९६५ च्या युद्धात जवानांचे मनोबल याच सभागृहातून वाढवले होते. हरितक्रांतीसाठी याच सभागृहातून पहिले पाऊल उचलले. याच सभागृहात ग्रामीण विकास मंत्रालयाची स्थापना केली गेली. याच सभागृहात मतदानाचे वय १८ करण्यात आले. पंडित नेहरू, शास्त्री यांच्यापासून अटल बिहारी आणि मनमोहन सिंह यांच्यापर्यंत सर्वांनी देशाला नवीन दिशा दिली असं त्यांनी सांगितले.

तसेच आज सर्वांचे कौतुक करण्याची वेळ आहे. सर्वांनी या सभागृहाला समृद्ध करण्यासाठी आणि देशातील सामान्य नागरिकांचा आवाज उठवण्याचे काम केले. राजीव गांधी, इंदिरा गांधी यांना देशाने गमावले तेव्हा साश्रूनयनांनी श्रद्धांजली देताना याच सभागृहाने पाहिले. भारताच्या लोकशाहीत अनेक चढउतार पाहिले. हे सभागृह लोकशाहीची ताकद आहे. लोकशाहीचे केंद्रबिंदू हे सभागृह आहे. एका मताने याच सभागृहात सरकार कोसळले होते असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला कुणीही विसरू शकत नाही

संसदेच्या एकदा दहशतवादी हल्ला झाला, हा हल्ला संपूर्ण जगात एका इमारतीवर नव्हता, तर एक प्रकारे तो आपल्या आत्म्यावर हल्ला होता. ती घटना हा देश कधीही विसरू शकत नाही. पण आज ज्यांनी दहशतवाद्यांशी लढताना आपल्या सभागृहातील सदस्यांना वाचवण्यासाठी छातीवर गोळ्या झाडल्या त्यांनाही मी सलाम करतो. आज जेव्हा आपण या सदनातून बाहेर पडत आहोत, तेव्हा मला त्या पत्रकारांचीही आठवण करावीशी वाटते, ज्यांनी इथे वार्तांकन केले आहे, आतल्या बातम्या देण्याची त्यांची क्षमता होती आणि आत मधल्या आतच्या बातम्याही, त्यांचे कार्य विसरता येणार नाही. बातमीसाठी नव्हे, तर भारताच्या विकासाच्या प्रवासासाठी त्यांनी सर्वस्व खर्च केले, त्यांची आठवण ठेवण्याची वेळ आली आहे - इथल्या भिंतींची जशी ताकद आहे, तसाच आरसाही त्यांच्या लेखणीत आहे. आज हे सदन सोडणे हा अनेक पत्रकार बांधवांसाठी भावनिक क्षण असावा असंही मोदी यांनी सांगितले. आज आपल्याला इतिहास आणि भविष्य दोघांमधला दुवा बनण्याचं भाग्य मिळाले असंही त्यांनी आर्वजून सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदlok sabhaलोकसभाIndira Gandhiइंदिरा गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू