शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

'जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट, केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 15:05 IST

मावळ मतदारसंघातील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनीच संसदेत मोबाईल फोनला रेंज येत नसल्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.

ठळक मुद्देसंसद सत्र सुरु असताना संसदेचं काम व्यवस्थित चालण्यासाठी सर्वच कंपन्यांच्या मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क बंद करण्यात आले आहे. त्यासाठी, संसद सभागृहाच्या आवारात जामर बसिवण्यात आले आहेत

नवी दिल्ली - देशभरात अनेकदा विविध कंपन्यांच्या नेटवर्कला रेंज येत नसल्याची ओरड आपण ऐकतो, पाहतो. अनेकदा आपल्यालाही तसा अनुभव येतो. त्यातली त्यात बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी कंपन्यांची अनेकदा अडचण असते. मावळ मतदारसंघातील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनीच संसदेत मोबाईल फोनला रेंज येत नसल्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. विशेष म्हणजे संसद सभागृहात फक्त जिओ कंपनीच्या नेटवर्कलाच रेंज आहे. मात्र, सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनल आणि एमटीएनएल कंपनीच्या तसेच इतरही कंपन्यांच्या कंपन्यांच्या सीमला नेटवर्क मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला. 

संसद सत्र सुरु असताना संसदेचं काम व्यवस्थित चालण्यासाठी सर्वच कंपन्यांच्या मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क बंद करण्यात आले आहे. त्यासाठी, संसद सभागृहाच्या आवारात जामर बसिवण्यात आले आहेत. मात्र, जामर बसविण्यात आल्यानंतरही संसदेत केवळ एकाच कंपनीचे नेटवर्क चालते. एमटीएनएल आणि बीएसएनएल या सरकारी कंपन्यांचे नेटवर्क देशभरातही नीट-नीटके चालत नाही. मात्र, संसद सभागृहात जिओ कंपनीच्या नेटवर्कला रेंज कसकाय येते? असा सवाल खासदार बारणे यांनी उपस्थित केला आहे. त्यावर, सभापती महोदया रमा देवी यांनी अध्यक्ष महोदय यासंदर्भात लक्ष देतील, असे सांगितले. 

संसद आवारात जिओ कंपनीलाच जामरपासून बाहेर ठेवण्यात आलंय का? असा प्रश्न उपस्थित करत हे योग्य नसल्याचेही खासदार बारणे यांनी म्हटलं. बारणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, जीओ कंपनीला संसदेत विशेष सुट देण्यात आलीय. जीओचे नेटवर्क जामरच्या बाहेर असून केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान असल्याचा आरोपही बारणे यांनी केला आहे. यासंदर्भात आपण संसदेत प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधल्याचेही ते म्हणाले. 

नेटवर्कची समस्या गाव-खेड्यातही मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू असतानाही अनेकदा गावागावात नेटवर्कच्या समस्या जाणवतात. मात्र, खासदार बारणे यांनी थेट संसद सभागृहातच नेटवर्कच्या समस्येचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी, केंद्र सरकारचे जिओ नेटवर्कवर विशेष प्रेम असल्याकडे बारणे यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :JioजिओMobileमोबाइलmavalमावळMember of parliamentखासदारlok sabhaलोकसभा