शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

'जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट, केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 15:05 IST

मावळ मतदारसंघातील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनीच संसदेत मोबाईल फोनला रेंज येत नसल्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.

ठळक मुद्देसंसद सत्र सुरु असताना संसदेचं काम व्यवस्थित चालण्यासाठी सर्वच कंपन्यांच्या मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क बंद करण्यात आले आहे. त्यासाठी, संसद सभागृहाच्या आवारात जामर बसिवण्यात आले आहेत

नवी दिल्ली - देशभरात अनेकदा विविध कंपन्यांच्या नेटवर्कला रेंज येत नसल्याची ओरड आपण ऐकतो, पाहतो. अनेकदा आपल्यालाही तसा अनुभव येतो. त्यातली त्यात बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी कंपन्यांची अनेकदा अडचण असते. मावळ मतदारसंघातील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनीच संसदेत मोबाईल फोनला रेंज येत नसल्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. विशेष म्हणजे संसद सभागृहात फक्त जिओ कंपनीच्या नेटवर्कलाच रेंज आहे. मात्र, सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनल आणि एमटीएनएल कंपनीच्या तसेच इतरही कंपन्यांच्या कंपन्यांच्या सीमला नेटवर्क मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला. 

संसद सत्र सुरु असताना संसदेचं काम व्यवस्थित चालण्यासाठी सर्वच कंपन्यांच्या मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क बंद करण्यात आले आहे. त्यासाठी, संसद सभागृहाच्या आवारात जामर बसिवण्यात आले आहेत. मात्र, जामर बसविण्यात आल्यानंतरही संसदेत केवळ एकाच कंपनीचे नेटवर्क चालते. एमटीएनएल आणि बीएसएनएल या सरकारी कंपन्यांचे नेटवर्क देशभरातही नीट-नीटके चालत नाही. मात्र, संसद सभागृहात जिओ कंपनीच्या नेटवर्कला रेंज कसकाय येते? असा सवाल खासदार बारणे यांनी उपस्थित केला आहे. त्यावर, सभापती महोदया रमा देवी यांनी अध्यक्ष महोदय यासंदर्भात लक्ष देतील, असे सांगितले. 

संसद आवारात जिओ कंपनीलाच जामरपासून बाहेर ठेवण्यात आलंय का? असा प्रश्न उपस्थित करत हे योग्य नसल्याचेही खासदार बारणे यांनी म्हटलं. बारणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, जीओ कंपनीला संसदेत विशेष सुट देण्यात आलीय. जीओचे नेटवर्क जामरच्या बाहेर असून केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान असल्याचा आरोपही बारणे यांनी केला आहे. यासंदर्भात आपण संसदेत प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधल्याचेही ते म्हणाले. 

नेटवर्कची समस्या गाव-खेड्यातही मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू असतानाही अनेकदा गावागावात नेटवर्कच्या समस्या जाणवतात. मात्र, खासदार बारणे यांनी थेट संसद सभागृहातच नेटवर्कच्या समस्येचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी, केंद्र सरकारचे जिओ नेटवर्कवर विशेष प्रेम असल्याकडे बारणे यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :JioजिओMobileमोबाइलmavalमावळMember of parliamentखासदारlok sabhaलोकसभा