शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
4
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
5
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
6
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
7
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
8
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
9
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
10
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
11
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
12
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
13
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
14
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
15
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
16
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
17
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
18
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
19
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
20
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 

'जिओ कंपनीला संसदेत विशेष सूट, केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 15:05 IST

मावळ मतदारसंघातील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनीच संसदेत मोबाईल फोनला रेंज येत नसल्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला.

ठळक मुद्देसंसद सत्र सुरु असताना संसदेचं काम व्यवस्थित चालण्यासाठी सर्वच कंपन्यांच्या मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क बंद करण्यात आले आहे. त्यासाठी, संसद सभागृहाच्या आवारात जामर बसिवण्यात आले आहेत

नवी दिल्ली - देशभरात अनेकदा विविध कंपन्यांच्या नेटवर्कला रेंज येत नसल्याची ओरड आपण ऐकतो, पाहतो. अनेकदा आपल्यालाही तसा अनुभव येतो. त्यातली त्यात बीएसएनएल आणि एमटीएनएल या सरकारी कंपन्यांची अनेकदा अडचण असते. मावळ मतदारसंघातील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनीच संसदेत मोबाईल फोनला रेंज येत नसल्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. विशेष म्हणजे संसद सभागृहात फक्त जिओ कंपनीच्या नेटवर्कलाच रेंज आहे. मात्र, सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनल आणि एमटीएनएल कंपनीच्या तसेच इतरही कंपन्यांच्या कंपन्यांच्या सीमला नेटवर्क मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला. 

संसद सत्र सुरु असताना संसदेचं काम व्यवस्थित चालण्यासाठी सर्वच कंपन्यांच्या मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क बंद करण्यात आले आहे. त्यासाठी, संसद सभागृहाच्या आवारात जामर बसिवण्यात आले आहेत. मात्र, जामर बसविण्यात आल्यानंतरही संसदेत केवळ एकाच कंपनीचे नेटवर्क चालते. एमटीएनएल आणि बीएसएनएल या सरकारी कंपन्यांचे नेटवर्क देशभरातही नीट-नीटके चालत नाही. मात्र, संसद सभागृहात जिओ कंपनीच्या नेटवर्कला रेंज कसकाय येते? असा सवाल खासदार बारणे यांनी उपस्थित केला आहे. त्यावर, सभापती महोदया रमा देवी यांनी अध्यक्ष महोदय यासंदर्भात लक्ष देतील, असे सांगितले. 

संसद आवारात जिओ कंपनीलाच जामरपासून बाहेर ठेवण्यात आलंय का? असा प्रश्न उपस्थित करत हे योग्य नसल्याचेही खासदार बारणे यांनी म्हटलं. बारणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, जीओ कंपनीला संसदेत विशेष सुट देण्यात आलीय. जीओचे नेटवर्क जामरच्या बाहेर असून केंद्र सरकार अंबानीवर मेहरबान असल्याचा आरोपही बारणे यांनी केला आहे. यासंदर्भात आपण संसदेत प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधल्याचेही ते म्हणाले. 

नेटवर्कची समस्या गाव-खेड्यातही मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू असतानाही अनेकदा गावागावात नेटवर्कच्या समस्या जाणवतात. मात्र, खासदार बारणे यांनी थेट संसद सभागृहातच नेटवर्कच्या समस्येचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी, केंद्र सरकारचे जिओ नेटवर्कवर विशेष प्रेम असल्याकडे बारणे यांनी लक्ष वेधले. 

टॅग्स :JioजिओMobileमोबाइलmavalमावळMember of parliamentखासदारlok sabhaलोकसभा