शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

काेहळा, पॅरोल आणि साधूबाबा ​​​​​​​

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 09:44 IST

हिमालयातील एका साधूच्या सांगण्यावरून गेली वीस वर्षे राष्ट्रीय शेअर बाजारासंदर्भात निर्णय घेणाऱ्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांच्या उघडकीस आलेल्या कारनाम्यांनी सारेजण हबकून गेले आहेत; पण हे केवळ एकच उदाहरण नसून, अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून काही राजकारणीही साधू, बाबांच्या कच्छपी लागल्याचे दिसून येते.

रवींद्र राऊळ

कुठल्याही साधू, बाबाचे अनुयायीत्व स्वीकारणे ही वैयक्तिक बाब असेपर्यंत त्याला आक्षेप घेतला जात नाही. मात्र, महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती साधू अथवा बाबांच्या सल्ल्याने निर्णय घेऊ लागतात तेव्हा त्याचे परिणाम घातक होतात. चित्रा रामकृष्ण यांच्याबाबत हेच घडले. सीईओ पदावर असताना त्यांनी एनएसईतील नियुक्तीपासूनचे सगळे निर्णय साधूच्या सल्ल्याने घेतल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्यामागे सीबीआयचे शुक्लकाष्ट लागले आहे. या सगळ्यात तो साधू कोण हे अजूनही समोर आलेले नाही.

समाजकारणापासून राजकारणापर्यंत ठिकठिकाणी गुरू अथवा बाबांचा पगडा दिसून येतो. त्यांच्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्याही सांगितल्या जातात.  गल्लीबाेळात पसरलेल्या साधू, बाबांच्या दरबारात तर सरकार प्रशासनातील अनेक उच्चपदस्थ व्यक्ती दिसून येतात. मालाड येथील मलंग बाबा तर पोलिसांचा मार्गदर्शक म्हणूनच प्रसिद्ध होता. आरोपीला शोधून काढणे कठीण झाले की काही पोलीस अधिकारी या बाबाचा दरबार गाठीत. तो बाबाही मग हवा असलेला आरोपी अमूक दिवसांनी तमूक दिशेला सापडेल, असे ठणकावून सांगत असे आणि विशेष म्हणजे ते पोलीस अधिकारी त्याच दिशेने आपला तपास सुरू ठेवत. काही वेळा तर कोहळा कापण्यासारखे विधीही तो पोलिसांकडून करून घेई.   

हरयाणातील गुरूग्राम डेऱ्याचा प्रमुख गुरमीत राम रहीम बाबाच्या दरबारातही अनेक बड्या सरकारी अधिकाऱ्यांपासून नेत्यांची ऊठबस असे. हत्या आणि लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या राम रहिम बाबाला जन्मठेपेची सजा ठोठावण्यात आली. डेऱ्यातील साध्वीने बलात्काराचा आरोप केल्यावर तिच्यावर दबाव आणण्यासाठी कोणकोणते नेते आपले भक्त आहेत, याची यादीच त्याने सुनावल्याचे तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे पंजाबमधील  निवडणुकीच्या तोंडावर जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या राम रहिम बाबाची पॅरोलवर सुटका करण्यात आली. हा पॅरोलही कोर्टाने नव्हे तर सरकारने दिला आहे. अशा अनेक आरोपांच्या भोवऱ्यात अडकलेल्या बाबा, बुवांना अनेक राजकारणी आपले गुरू मानतात आणि उघडपणे त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थितीही लावतात. वादग्रस्त तांत्रिक तंद्रास्वामी यांचे अनुयायी  केवळ देशातील बडे नेतेच नव्हते, तर इतरही अनेक देशांचे प्रमुख त्यांच्या नादी लागले होते. त्यांच्या सल्ल्यानुसार ते राजकारणातील निर्णय घेत. चंद्रास्वामी यांनी दुबईत जाऊन दाऊद इब्राहिमचीही भेट घेतली होती.

मुलायमसिंह यादव हे इटावा येथील जय गुरूदेव बाबांचे भक्त होते, तर लालूप्रसाद यादव यांनी उत्तर प्रदेशातील मिर्जापूर येथील विभूती नारायण ऊर्फ नारायण पागल बाबाचे शिष्यत्व पत्करले होते. संकटसमयी अथवा यश मिळाले की ते या बाबाकडे जायचे. चारा घोटाळ्यात अडकल्यावर, पडल्यावर आणि तुरुंगात जाण्याआधी ते आशीर्वाद घेण्यासाठी याच पागल बाबाकडे गेले होते. अस्थीर जीवन, ताणतणाव आणि कमालीची स्पर्धा यामुळे महत्त्वाच्या पदांवरील कमकुवत मनाच्या व्यक्ती साधू, बाबांना शरण जातात आणि त्यांच्या सल्ल्याने आपला कारभार हाकू लागतात. पं. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, ए.पी.जे. अब्दुल कलाम यासारख्या प्रभूतींच्या देशात ही भोंदूगिरी कोणता आदर्श नव्या पिढीपुढे ठेवणार? 

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBaba Ram Rahimबाबा राम रहीमElectionनिवडणूक