शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

मुलाची सुटका करण्यासाठी नेत्याने केलं अपहरणकर्त्याच्या आई-वडिलांचं अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 11:36 IST

अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यासाठी समाजवादी पक्षाच्या नेत्याने अपहरणकर्ता दरोडेखोराच्या आई-वडिलांचं अपहरण केल्याची घटना समोर आली आहे

ठळक मुद्देसमाजवादी पक्षाचे नेते संतू सिंह यांच्या मुलाचं दरोडेखोर बबली कोल याने अपहरण केलं आहेसुत्रांच्या माहितीनुसार, बबली कोलच्या आई-वडिलांना संतू सिंह यांनी ताब्यात ठेवलं असून मुलाची सुटका करण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.संतू सिंह यांनी दरोडेखोराच्या आई-वडिलांचं अपहरण केल्याचं वृत्त खोटं असल्याचं सांगितलं आहे

भोपाळ, दि. 31 - आपल्या अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यासाठी समाजवादी पक्षाच्या नेत्याने अपहरणकर्ता दरोडेखोराच्या आई-वडिलांचं अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. आतापर्यंत एखाद्याचं अपहरण झालं असेल तर कुटुंब खंडणीची रक्कम देऊन सुटका करण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपण ऐकंल किंवा पाहिलं असेल. जास्तीत जास्त पोलिसांकडे जाऊन मदत मागून अपहरकर्त्याला बेड्या ठोकल्याचंही वाचलं असेल. पण अपहरणकर्त्याच्या कुटुंबाचं अपहरण केल्याचं कधी पाहिलं आहे का ? नसेलच...पण मध्यप्रदेशमधील सटाणा जिल्ह्यात हे पाहायला मिळालं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका दरोडेखोराने समाजवादी पक्षातील नेत्याच्या मुलाचं अपहरण करत खंडणीची मागणी केली. अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यासाठी नेत्याच्या नातेवाईकांनी दरोडेखोराच्या आई-वडिलांचं अपहरण करुन टाकलं. 

समाजवादी पक्षाचे नेते संतू सिंह यांच्या मुलाचं दरोडेखोर बबली कोल याने अपहरण केलं आहे. मात्र संतू सिंह यांनी दरोडेखोराच्या आई-वडिलांचं अपहरण केल्याचं वृत्त खोटं असल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनीदेखील हे आरोप चुकीचे असल्याचं सांगितलं आहे. मात्र स्थानिक सुत्रांच्या माहितीनुसार, बबली कोलच्या आई-वडिलांना संतू सिंह यांनी ताब्यात ठेवलं असून मुलाची सुटका करण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. 

टाईम्स ऑप इंडियाने संतू सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, 'मी दरोडेखोर, प्रशासन आणि पोलीस सर्वांनाच 24 तासांची वेळ दिली आहे'. मिळालेल्या माहितीनुसार बबली कोलने संतू सिंह यांचा मुलगा विजयची सुटका करण्यासाठी 50 लाखांची खंडणी मागितली आहे. 

विजयचं मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरुन अपहरण करण्यात आलं होतं. संतू सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विजय आपल्या मित्रांसोबत उत्तर प्रदेशमधील एका कार्यक्रमातून घऱी परतत असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. 30 जुलै रोजी हे अपहरण झालं'.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या खंडणीवरुन दोन्ही बाजूंकडून चर्चा सुरु आहे. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलाची सुखरुप सुटका झाल्यास आई-वडिलांनाही सुखरुप सोडण्यात येईल असं आश्वासन दरोडेखोराला देण्यात आलं आहे.