शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
5
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
6
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
7
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
8
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
9
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
10
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
11
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
12
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
13
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
14
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
15
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
16
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
17
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
18
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...
19
विराटनं केलं भारतीय महिला संघाचं कौतुक,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर  म्हणाला...
20
आईचं स्वप्न साकार, संघर्षातून लेक बनली IAS; पण मुलीचं यश पाहण्याआधीच आईनं घेतला जगाचा निरोप

मुलाची सुटका करण्यासाठी नेत्याने केलं अपहरणकर्त्याच्या आई-वडिलांचं अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2017 11:36 IST

अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यासाठी समाजवादी पक्षाच्या नेत्याने अपहरणकर्ता दरोडेखोराच्या आई-वडिलांचं अपहरण केल्याची घटना समोर आली आहे

ठळक मुद्देसमाजवादी पक्षाचे नेते संतू सिंह यांच्या मुलाचं दरोडेखोर बबली कोल याने अपहरण केलं आहेसुत्रांच्या माहितीनुसार, बबली कोलच्या आई-वडिलांना संतू सिंह यांनी ताब्यात ठेवलं असून मुलाची सुटका करण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.संतू सिंह यांनी दरोडेखोराच्या आई-वडिलांचं अपहरण केल्याचं वृत्त खोटं असल्याचं सांगितलं आहे

भोपाळ, दि. 31 - आपल्या अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यासाठी समाजवादी पक्षाच्या नेत्याने अपहरणकर्ता दरोडेखोराच्या आई-वडिलांचं अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. आतापर्यंत एखाद्याचं अपहरण झालं असेल तर कुटुंब खंडणीची रक्कम देऊन सुटका करण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपण ऐकंल किंवा पाहिलं असेल. जास्तीत जास्त पोलिसांकडे जाऊन मदत मागून अपहरकर्त्याला बेड्या ठोकल्याचंही वाचलं असेल. पण अपहरणकर्त्याच्या कुटुंबाचं अपहरण केल्याचं कधी पाहिलं आहे का ? नसेलच...पण मध्यप्रदेशमधील सटाणा जिल्ह्यात हे पाहायला मिळालं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, एका दरोडेखोराने समाजवादी पक्षातील नेत्याच्या मुलाचं अपहरण करत खंडणीची मागणी केली. अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यासाठी नेत्याच्या नातेवाईकांनी दरोडेखोराच्या आई-वडिलांचं अपहरण करुन टाकलं. 

समाजवादी पक्षाचे नेते संतू सिंह यांच्या मुलाचं दरोडेखोर बबली कोल याने अपहरण केलं आहे. मात्र संतू सिंह यांनी दरोडेखोराच्या आई-वडिलांचं अपहरण केल्याचं वृत्त खोटं असल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनीदेखील हे आरोप चुकीचे असल्याचं सांगितलं आहे. मात्र स्थानिक सुत्रांच्या माहितीनुसार, बबली कोलच्या आई-वडिलांना संतू सिंह यांनी ताब्यात ठेवलं असून मुलाची सुटका करण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. 

टाईम्स ऑप इंडियाने संतू सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की, 'मी दरोडेखोर, प्रशासन आणि पोलीस सर्वांनाच 24 तासांची वेळ दिली आहे'. मिळालेल्या माहितीनुसार बबली कोलने संतू सिंह यांचा मुलगा विजयची सुटका करण्यासाठी 50 लाखांची खंडणी मागितली आहे. 

विजयचं मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवरुन अपहरण करण्यात आलं होतं. संतू सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विजय आपल्या मित्रांसोबत उत्तर प्रदेशमधील एका कार्यक्रमातून घऱी परतत असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. 30 जुलै रोजी हे अपहरण झालं'.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या खंडणीवरुन दोन्ही बाजूंकडून चर्चा सुरु आहे. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलाची सुखरुप सुटका झाल्यास आई-वडिलांनाही सुखरुप सोडण्यात येईल असं आश्वासन दरोडेखोराला देण्यात आलं आहे.