शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सपा-काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून बिघाडी!

By admin | Updated: January 22, 2017 00:42 IST

उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपावरून तूर्त बिघाडी होण्याची चिन्हे असून, काँग्रेसने १२0 जागांची मागणी समाजवादी पक्षाकडे केली आहे.

- मीना कमल, लखनौ

उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपावरून तूर्त बिघाडी होण्याची चिन्हे असून, काँग्रेसने १२0 जागांची मागणी समाजवादी पक्षाकडे केली आहे. मात्र काँग्रेसला ९0 जागाच द्यायला अखिलेश यादव तयार आहेत.त्यामुळे काँग्रेस आपल्या उमेदवारांची यादी उद्या, रविवारी जाहीर करणार आहे. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी ही माहिती देताना सांगितले की, आघाडी होणार की नाही, हे तुम्हाला उद्याच कळेल. अर्थात दोघेही ताणून धरत असले तरी आघाडी दोघांना हवी असल्याचे सध्याचे चित्र आहे.काँग्रेसचा १२0 जागांचा आग्रह जसा कायम आहे, तसेच काही मतदारसंघांसाठीही काँग्रेस प्रयत्नशील आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या अनुक्रमे रायबरेली आणि अमेठीमधील सर्व विधानसभा मतदारसंघांत समाजवादी पक्षाने आपले उमेदवार जजाहीर केले आहेत. तिथे सपाचेच उमेदवार गेल्या वेळी विजयी झाले होते. त्या जागा काँग्रेसला हव्या आहेत. तसेच सपाच्या नेत्या अपर्णा यादव या जेथून निवडून आल्या, त्या जागेवरही काँग्रेस आग्रही आहे आणि ती मिळणार नाही, असे सपाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सपाच्या मेहरबानीवर आपण राहू नये, त्यापेक्षा सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करावेत, असे काही काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला २८ जागांवरच विजय मिळाला. मात्र पक्षाला ११.९ टक्के मते मिळाली होती. सपाशी आघाडी केल्याने ५ ते ८ टक्के मते वाढली, तरी आपल्या आमदारांची संख्या ६0 पर्यंत जाईल, असे काँग्रैसला वाटत आहे. काँग्रेसला जास्त जागा देता नयेत, असे सपा नेते जाहीरपणे म्हणत असले तरी त्या पक्षाच्या मतांवर सपाचीही भिस्त आहे. काँग्रेसची १0 ते ११ टक्के मते आपल्याला सत्तेपर्यंत नेतील, असे समाजवादी पक्षाचे नेते खासगीत बोलून दाखवत आहेत. एकीकडे भाजपा आणि दुसरीकडे बसपा यांना आजच्या स्थितीत तोंड देण्यासाठी काँग्रेसला सोबत घ्यायला हवे, असा मतप्रवास अखिलेश गटामध्ये आहे.मायावती यांची टीकाअखिलेशना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारून काँग्रेसने समाजवादी पार्टीपुढे लोटांगण घातल्याचा आरोप मायावती यांनी केला. काँग्रेस आणि सपात युतीची चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी बसपात प्रवेश केल्याचा दावाही त्यांनी केला. काँग्रेस पक्ष स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजत असेल, तर त्याने सपासोबत जाऊ नये, असा माझा त्या पक्षाला सल्ला आहे. आपले भविष्य डोळ्यासमोर ठेवून त्यांनी एकतर एकट्याने निवडणूक लढवावी किंवा छोट्या धर्मनिरपेक्ष पक्षांशी आघाडी करावी, असे मायावती म्हणाल्या. त्यांच्या पत्तकार परिषदेत मुलायमसिंह यादव यांचे सहकारी अंबिका चौधरी यांनी बसपात प्रवेश केला.