शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

सपा-काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून बिघाडी!

By admin | Updated: January 22, 2017 00:42 IST

उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपावरून तूर्त बिघाडी होण्याची चिन्हे असून, काँग्रेसने १२0 जागांची मागणी समाजवादी पक्षाकडे केली आहे.

- मीना कमल, लखनौ

उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपावरून तूर्त बिघाडी होण्याची चिन्हे असून, काँग्रेसने १२0 जागांची मागणी समाजवादी पक्षाकडे केली आहे. मात्र काँग्रेसला ९0 जागाच द्यायला अखिलेश यादव तयार आहेत.त्यामुळे काँग्रेस आपल्या उमेदवारांची यादी उद्या, रविवारी जाहीर करणार आहे. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी ही माहिती देताना सांगितले की, आघाडी होणार की नाही, हे तुम्हाला उद्याच कळेल. अर्थात दोघेही ताणून धरत असले तरी आघाडी दोघांना हवी असल्याचे सध्याचे चित्र आहे.काँग्रेसचा १२0 जागांचा आग्रह जसा कायम आहे, तसेच काही मतदारसंघांसाठीही काँग्रेस प्रयत्नशील आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या अनुक्रमे रायबरेली आणि अमेठीमधील सर्व विधानसभा मतदारसंघांत समाजवादी पक्षाने आपले उमेदवार जजाहीर केले आहेत. तिथे सपाचेच उमेदवार गेल्या वेळी विजयी झाले होते. त्या जागा काँग्रेसला हव्या आहेत. तसेच सपाच्या नेत्या अपर्णा यादव या जेथून निवडून आल्या, त्या जागेवरही काँग्रेस आग्रही आहे आणि ती मिळणार नाही, असे सपाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सपाच्या मेहरबानीवर आपण राहू नये, त्यापेक्षा सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करावेत, असे काही काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला २८ जागांवरच विजय मिळाला. मात्र पक्षाला ११.९ टक्के मते मिळाली होती. सपाशी आघाडी केल्याने ५ ते ८ टक्के मते वाढली, तरी आपल्या आमदारांची संख्या ६0 पर्यंत जाईल, असे काँग्रैसला वाटत आहे. काँग्रेसला जास्त जागा देता नयेत, असे सपा नेते जाहीरपणे म्हणत असले तरी त्या पक्षाच्या मतांवर सपाचीही भिस्त आहे. काँग्रेसची १0 ते ११ टक्के मते आपल्याला सत्तेपर्यंत नेतील, असे समाजवादी पक्षाचे नेते खासगीत बोलून दाखवत आहेत. एकीकडे भाजपा आणि दुसरीकडे बसपा यांना आजच्या स्थितीत तोंड देण्यासाठी काँग्रेसला सोबत घ्यायला हवे, असा मतप्रवास अखिलेश गटामध्ये आहे.मायावती यांची टीकाअखिलेशना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारून काँग्रेसने समाजवादी पार्टीपुढे लोटांगण घातल्याचा आरोप मायावती यांनी केला. काँग्रेस आणि सपात युतीची चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी बसपात प्रवेश केल्याचा दावाही त्यांनी केला. काँग्रेस पक्ष स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजत असेल, तर त्याने सपासोबत जाऊ नये, असा माझा त्या पक्षाला सल्ला आहे. आपले भविष्य डोळ्यासमोर ठेवून त्यांनी एकतर एकट्याने निवडणूक लढवावी किंवा छोट्या धर्मनिरपेक्ष पक्षांशी आघाडी करावी, असे मायावती म्हणाल्या. त्यांच्या पत्तकार परिषदेत मुलायमसिंह यादव यांचे सहकारी अंबिका चौधरी यांनी बसपात प्रवेश केला.