शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

सपा-काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून बिघाडी!

By admin | Updated: January 22, 2017 00:42 IST

उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपावरून तूर्त बिघाडी होण्याची चिन्हे असून, काँग्रेसने १२0 जागांची मागणी समाजवादी पक्षाकडे केली आहे.

- मीना कमल, लखनौ

उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यात जागावाटपावरून तूर्त बिघाडी होण्याची चिन्हे असून, काँग्रेसने १२0 जागांची मागणी समाजवादी पक्षाकडे केली आहे. मात्र काँग्रेसला ९0 जागाच द्यायला अखिलेश यादव तयार आहेत.त्यामुळे काँग्रेस आपल्या उमेदवारांची यादी उद्या, रविवारी जाहीर करणार आहे. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी ही माहिती देताना सांगितले की, आघाडी होणार की नाही, हे तुम्हाला उद्याच कळेल. अर्थात दोघेही ताणून धरत असले तरी आघाडी दोघांना हवी असल्याचे सध्याचे चित्र आहे.काँग्रेसचा १२0 जागांचा आग्रह जसा कायम आहे, तसेच काही मतदारसंघांसाठीही काँग्रेस प्रयत्नशील आहे. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या अनुक्रमे रायबरेली आणि अमेठीमधील सर्व विधानसभा मतदारसंघांत समाजवादी पक्षाने आपले उमेदवार जजाहीर केले आहेत. तिथे सपाचेच उमेदवार गेल्या वेळी विजयी झाले होते. त्या जागा काँग्रेसला हव्या आहेत. तसेच सपाच्या नेत्या अपर्णा यादव या जेथून निवडून आल्या, त्या जागेवरही काँग्रेस आग्रही आहे आणि ती मिळणार नाही, असे सपाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सपाच्या मेहरबानीवर आपण राहू नये, त्यापेक्षा सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करावेत, असे काही काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. गेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला २८ जागांवरच विजय मिळाला. मात्र पक्षाला ११.९ टक्के मते मिळाली होती. सपाशी आघाडी केल्याने ५ ते ८ टक्के मते वाढली, तरी आपल्या आमदारांची संख्या ६0 पर्यंत जाईल, असे काँग्रैसला वाटत आहे. काँग्रेसला जास्त जागा देता नयेत, असे सपा नेते जाहीरपणे म्हणत असले तरी त्या पक्षाच्या मतांवर सपाचीही भिस्त आहे. काँग्रेसची १0 ते ११ टक्के मते आपल्याला सत्तेपर्यंत नेतील, असे समाजवादी पक्षाचे नेते खासगीत बोलून दाखवत आहेत. एकीकडे भाजपा आणि दुसरीकडे बसपा यांना आजच्या स्थितीत तोंड देण्यासाठी काँग्रेसला सोबत घ्यायला हवे, असा मतप्रवास अखिलेश गटामध्ये आहे.मायावती यांची टीकाअखिलेशना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारून काँग्रेसने समाजवादी पार्टीपुढे लोटांगण घातल्याचा आरोप मायावती यांनी केला. काँग्रेस आणि सपात युतीची चर्चा सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी बसपात प्रवेश केल्याचा दावाही त्यांनी केला. काँग्रेस पक्ष स्वत:ला धर्मनिरपेक्ष समजत असेल, तर त्याने सपासोबत जाऊ नये, असा माझा त्या पक्षाला सल्ला आहे. आपले भविष्य डोळ्यासमोर ठेवून त्यांनी एकतर एकट्याने निवडणूक लढवावी किंवा छोट्या धर्मनिरपेक्ष पक्षांशी आघाडी करावी, असे मायावती म्हणाल्या. त्यांच्या पत्तकार परिषदेत मुलायमसिंह यादव यांचे सहकारी अंबिका चौधरी यांनी बसपात प्रवेश केला.