शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

ज्वारी, मूग, उडिदाचा पेरा घटणार

By admin | Updated: June 16, 2014 20:04 IST

मागील दोन वर्षांत अतिवृष्टी आणि वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे परिसरात ज्वारी, मूग आणि उडीद या पिकांच्या पेर्‍यात घट होण्याची शक्यता आहे.

भंडारज बु.: मागील दोन वर्षांत अतिवृष्टी आणि वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे झालेले नुकसान लक्षात घेता यावर्षी पातूर तालुक्यातील भंडारज बु. परिसरात ज्वारी, मूग आणि उडीद या पिकांच्या पेर्‍यात घट होण्याची शक्यता आहे. पातूर तालुक्यात गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. उडीद, मूग, ज्वारी अशी सर्वच खरीप पिके नेस्तनाबूद झाली. त्यातच वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे या पिकांचे अधिकच नुकसान झाले आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडला. शासनाच्या अजब निकषांमुळे अनेक शेतकर्‍यांना झालेल्या पीक नुकसानीसाठी आर्थिक मदतही मिळाली नाही. याच कारणांमुळे उडीद, मूग, ज्वारी या पिकांबाबत शेतकर्‍यांचा मोहभंगच झाल्याचे दिसत आहे. त्याउलट सोयाबीन हे कमी खर्चाचे आणि कमी वेळेत येणारे पीक असल्यामुळे यंदा सोयाबीनच्या पेर्‍यात वाढ होण्याची शक्यता आहे. पातूर तालुक्यात सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने प्रसंगी कपाशीला पाणी देणेही शेतकर्‍यांना शक्य होते, त्यामुळे काही प्रमाणात कपाशीचाही पेरा वाढू शकतो. दुसरीकडे पावसाचे प्रमाण थोडेही वाढले, तर उडीद, मूग या पिकांना फटका बसतो, त्यांचा दर्जा आणि उत्पादनही खालावते. त्याशिवाय परिसरात मोठ्या प्रमाणात असलेले रोही, हरीण, माकडे, रानडुकरे आदी वन्यप्राण्यांमुळेही मूग, उडीद या पिकांचे नुकसान होत असते. गत दोन-तीन वर्षांपासून परिसरातील शेतकर्‍यांना हा अनुभव येत असल्यामुळेच यंदा मूग, उडीद ही पिके पेरण्याचे धाडस शेतकरी करणार नसल्याचे दिसते.